आषाढ महिना संपता संपता आता श्रावणाचे वेध लागायला लागलेले आहेत. पाउस दाखल झाला आहे, सगळीकडे मस्त हिरवेगार झालेले आहे आणि पानाफुलांनी डवरलेले वृक्ष बघितले की मूड पण मस्त होतो नाही का?
'मनीं धरावें तें होतें | विघ्न अवघेचि नासोन जातें |
कृपा केलिया रघुनाथे | प्रचित येते ||'
हे समर्थांचे वचन अगदी खरे आहे, प्रचीती घेण्या सारखे आहे. म्हणजे भगवंताचे अधिष्ठान ठेऊन कोणतेही कार्य केले तर कार्यातील विघ्ने नष्ट होतात आणि सफलता मिळते, हे नक्की. थोडक्यात, भगवंताची कृपा झाल्याची प्रचीती येते! आयुष्यात इतर अनेक प्रसंगी देखील भगवंताची कृपा आपल्यावर कशी असते ह्याची प्रचीती येते...
माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगते. मी लखनौला असतांना, एकदा मोटरसायकल चालवीत असतांना, मागून वेस्पाने धडक दिली. चालवणारे दोघे 10 वीचे विद्यार्थी होते,त्यांच्याकडे लायसेन्स देखील नव्हते., आणि गाडीचे ब्रेक फेल होते!(हे त्यांनी नंतर काबुल केले ) तर माझ्या गाडीने एकदम वेग पकडला, आणि डावीकडे वळली, आणि रस्त्याच्या कडेला जे नाले असतात, त्या नाल्याकडे निघाली! तिथेच दोन माणसं मोटरसायकल पार्क करून गप्पा मारीत होते. मी गाडी सोडून दिली, आणि त्यातल्या एकाला घट्ट पकडले. आम्ही दोघे पडलो, पण मी वाचले, कारण पुढे नाल्यात बघितले, तर फक्त मोठे मोठे दगड होते, आणि मी जर तिथे पडले असते तर काय झाले असते ह्याची कल्पना न केलेलीच बरी! तर मला नंतर असं वाटलं, की मला गाडी सोडून देण्याची बुद्धी त्या भगवंतानेच दिली, आणि ते दोन गृहस्थ देखील तिथे बहुधा मला वाचवण्यासाठीच उभे होते! भगवंताची कृपा म्हणते ती हीच!
मला आजही हा प्रसंग आठवला तर मी लगेच हात जोडून भगवंताचे आभार मानते!
असो, आता महत्वाचा मुद्दा असा की पाउस पडत असतो तेंव्हा आपल्याला काहीतरी चटपटीत खावेसे वाटते, आणि तयारी पण जास्त असू नये असे वाटते नाही का? आजकाल बऱ्याच बसिक वस्तू रेडीमेड मिळतात त्यामुळे काहीतरी झटपट बनवणे सोपे झाले आहे,
मी परवा ' शेझवान चटणी ' चे रेडीमेड पाकीट आणले, आणि नूडल्स शिजवून त्यात ही पेस्ट घालून फटाफट नूडल्स बनवले होते. आणि गरम गरम खायला काय मजा येते, वाह! , हेच नूडल्स घरी मसाला करून बनवायचे ठरवलं तर किती काम असतं मला माहिताय ना. म्हणून हे रेडीमेड पाकीट आणून केल्या नूडल्स . जुन्याच गोष्टीं मध्ये अडकून न पडता बदलणाऱ्या जमान्या बरोबर आपण चालायला शिकलं पाहिजे .
पालकाची मोठी जुडी स्वस्त मिळाली म्हणून आणली,पण एवढ्या पालकाचे करायचे काय?
मग आठवलं , पालकच्या पुऱ्या ! पुऱ्या करून लोणचं आणि दह्या सोबत खाऊन फस्त केल्या!
'मनीं धरावें तें होतें | विघ्न अवघेचि नासोन जातें |
कृपा केलिया रघुनाथे | प्रचित येते ||'
हे समर्थांचे वचन अगदी खरे आहे, प्रचीती घेण्या सारखे आहे. म्हणजे भगवंताचे अधिष्ठान ठेऊन कोणतेही कार्य केले तर कार्यातील विघ्ने नष्ट होतात आणि सफलता मिळते, हे नक्की. थोडक्यात, भगवंताची कृपा झाल्याची प्रचीती येते! आयुष्यात इतर अनेक प्रसंगी देखील भगवंताची कृपा आपल्यावर कशी असते ह्याची प्रचीती येते...
माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगते. मी लखनौला असतांना, एकदा मोटरसायकल चालवीत असतांना, मागून वेस्पाने धडक दिली. चालवणारे दोघे 10 वीचे विद्यार्थी होते,त्यांच्याकडे लायसेन्स देखील नव्हते., आणि गाडीचे ब्रेक फेल होते!(हे त्यांनी नंतर काबुल केले ) तर माझ्या गाडीने एकदम वेग पकडला, आणि डावीकडे वळली, आणि रस्त्याच्या कडेला जे नाले असतात, त्या नाल्याकडे निघाली! तिथेच दोन माणसं मोटरसायकल पार्क करून गप्पा मारीत होते. मी गाडी सोडून दिली, आणि त्यातल्या एकाला घट्ट पकडले. आम्ही दोघे पडलो, पण मी वाचले, कारण पुढे नाल्यात बघितले, तर फक्त मोठे मोठे दगड होते, आणि मी जर तिथे पडले असते तर काय झाले असते ह्याची कल्पना न केलेलीच बरी! तर मला नंतर असं वाटलं, की मला गाडी सोडून देण्याची बुद्धी त्या भगवंतानेच दिली, आणि ते दोन गृहस्थ देखील तिथे बहुधा मला वाचवण्यासाठीच उभे होते! भगवंताची कृपा म्हणते ती हीच!
मला आजही हा प्रसंग आठवला तर मी लगेच हात जोडून भगवंताचे आभार मानते!
असो, आता महत्वाचा मुद्दा असा की पाउस पडत असतो तेंव्हा आपल्याला काहीतरी चटपटीत खावेसे वाटते, आणि तयारी पण जास्त असू नये असे वाटते नाही का? आजकाल बऱ्याच बसिक वस्तू रेडीमेड मिळतात त्यामुळे काहीतरी झटपट बनवणे सोपे झाले आहे,
रेडीमेड शेझवान चटणी चे नूडल्स |
पालकाची मोठी जुडी स्वस्त मिळाली म्हणून आणली,पण एवढ्या पालकाचे करायचे काय?
पालकाच्या पुऱ्या |