परवा बाजारात गेले होते. बाजाराचे रुपडे पाहून आनंदून गेले! अर्थात प्रत्येक सणाच्या प्रसंगी बाजार असाच नटलेला असतो म्हणा! दिवाळी निमित्त बाजारपेठ नुसती फुलली होती, शृंगारली होती! रोषणाई, सजावट, आकर्षकपणे मांडलेल्या वस्तू, ग्राहकांना प्रलोभन दाखविणाऱ्या खरेदीच्या नव्या नव्या आकर्षक योजना, भेटवस्तू, scratch card , काय नि काय! अशा वेळी , 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी!' ह्या म्हणीच्या धरतीवर 'विकणाऱ्याच्या वस्तू हजारो रे, परी, रिकामे माझे पाकीट रे!'असा दुबळा विचार मनात येतो, पण क्षणभरच, की पुन्हा आपली shopping सुरु! असो.
पण ह्या खरेदीच्या धुमश्चक्रीत दीपावली खऱ्या अर्थाने साजरी व्हायची तर राहून जात नाही ना,ह्याचे भान मात्र ठेवायला हवे आपण सर्वांनी.दीपावलीच्या पाच दिवसांचे आपापले महत्व आहे, त्याप्रमाणे त्या दिवशी आचरण करावे.,थोडी का होईना काही पूजा अर्चा करावी, आणि मग मजामस्ती! ह्यातूनच आपण आपले संस्कार पुढच्या पिढीला देणार आहोत, ह्याचे भान राहू द्यावे, अन्यथा, संस्कारांच्या रूपाने फक्त 'shop till you drop' एवढेच राहील!
दिवाळीच्या आपल्या घरातील झगमगाटात, रोषणाईत, फराळाच्या सुगंधात, पाहुण्यांच्या सरबराईत, एकमेकांना शुभेच्छा देण्यात, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत, आणि ह्या सर्व धामधुमीत, थोडा वेळ काढून एखाध्या उपेक्षित तान्हुल्याला काही खेळणं, खाऊ देवून, त्याच्या चेहऱ्यावरचे निर्व्याज्य हसू पहा, किंवा एखाद्या दुःखी जीवाला त्याच्या दुःखद प्रसंगी देखील दोन घटका गोड करून द्या, एखाद्या मुक्या प्राण्याला ताज्या पोळीचा घास घालून पहा, त्याची आनंदाने गोलगोल फिरणारी शेपटी तुम्हाला किती आनंद देऊन जाईल! ह्यामुळे तुमची दिवाळी आनंदमय होईलच, आणि त्यांच्या आशीर्वादाने भरभराटीची पण होईल हे नक्की!
दिवाळी अशीच गोड करण्यासाठी एक खास वडी तुमच्या साठी……
काजूवडी: १ कप मिल्क पावडर, १ कप काजुपुड, ११/२ ते १३/४ कप पिठी साखर, गुलाबी रंग,१/२ कप बटर,१/२ कप दूध
मिल्क पावडर, काजुपुड, पिठी साखर, रंग,बटर आणि अंदाजाने दूध मिक्स करून pan मध्ये low heat वर शिजत ठेवावे. घटत गोळा झाला, की थापून वड्या कापाव्यात.
हवा असल्यास खवा घालता येतो. १/२ कप मिल्क पावडर कमी करून १/२ कप खवा गुठळ्या मोडून, थोडा भाजून घ्यावा.
चला, फराळ बनवायचा आहे, तेंव्हा घाई करायला हवी, नाही का?
पण ह्या खरेदीच्या धुमश्चक्रीत दीपावली खऱ्या अर्थाने साजरी व्हायची तर राहून जात नाही ना,ह्याचे भान मात्र ठेवायला हवे आपण सर्वांनी.दीपावलीच्या पाच दिवसांचे आपापले महत्व आहे, त्याप्रमाणे त्या दिवशी आचरण करावे.,थोडी का होईना काही पूजा अर्चा करावी, आणि मग मजामस्ती! ह्यातूनच आपण आपले संस्कार पुढच्या पिढीला देणार आहोत, ह्याचे भान राहू द्यावे, अन्यथा, संस्कारांच्या रूपाने फक्त 'shop till you drop' एवढेच राहील!
दिवाळीच्या आपल्या घरातील झगमगाटात, रोषणाईत, फराळाच्या सुगंधात, पाहुण्यांच्या सरबराईत, एकमेकांना शुभेच्छा देण्यात, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत, आणि ह्या सर्व धामधुमीत, थोडा वेळ काढून एखाध्या उपेक्षित तान्हुल्याला काही खेळणं, खाऊ देवून, त्याच्या चेहऱ्यावरचे निर्व्याज्य हसू पहा, किंवा एखाद्या दुःखी जीवाला त्याच्या दुःखद प्रसंगी देखील दोन घटका गोड करून द्या, एखाद्या मुक्या प्राण्याला ताज्या पोळीचा घास घालून पहा, त्याची आनंदाने गोलगोल फिरणारी शेपटी तुम्हाला किती आनंद देऊन जाईल! ह्यामुळे तुमची दिवाळी आनंदमय होईलच, आणि त्यांच्या आशीर्वादाने भरभराटीची पण होईल हे नक्की!
दिवाळी अशीच गोड करण्यासाठी एक खास वडी तुमच्या साठी……
काजूवडी: १ कप मिल्क पावडर, १ कप काजुपुड, ११/२ ते १३/४ कप पिठी साखर, गुलाबी रंग,१/२ कप बटर,१/२ कप दूध
मिल्क पावडर, काजुपुड, पिठी साखर, रंग,बटर आणि अंदाजाने दूध मिक्स करून pan मध्ये low heat वर शिजत ठेवावे. घटत गोळा झाला, की थापून वड्या कापाव्यात.
हवा असल्यास खवा घालता येतो. १/२ कप मिल्क पावडर कमी करून १/२ कप खवा गुठळ्या मोडून, थोडा भाजून घ्यावा.
चला, फराळ बनवायचा आहे, तेंव्हा घाई करायला हवी, नाही का?
No comments:
Post a Comment