Thursday, 13 February 2014

ANNACHI NASADI MHNJE PAAPCH!

काल सकाळी ब्रेकफास्ट साठी पोहे केले, आणि चव घेतली मात्र….
पोहे खारट झाले होते! मग  करता? पण मग माझं  kitchen मधलं  disaster management कधी का कामाला   येणार? तर संध्याकाळी त्याच पोह्यात थोडा उकडलेला  बटाटा, मिरची  तुकडे,कोथिंबीर,  कांदा, तिखट, मीठ आणि थोडेसे बेसन  कटलेट्स बनवले, आणि बघता बघता संपले की सर्व कटलेट्स!

पोह्याचे कटलेट्स
 खर तर,पदार्थ   बिघडला की मगच खरा challenge असतो! साधा सरळ, माहित असलेल्या पध्दतीने पदार्थ सगळेच करतात, पण बिघडलेल्या पदार्थातून नवीन आणि चविष्ट पदार्थ तयार करायचा आणि तो सर्व मंडळींनी शंका न येता नवीनच पदार्थ समजून खायचा ह्यासाठी खास प्राविण्य कमवावं लागतं हे मी अनुभवावरून सांगू शकते!

मी कुठलीच वस्तू   वाया घालवीत नाही, अगदी बिघडली तरी! कारण जिन्नस, वेळ, मेहनत, कष्टाचे पैसे वाया जातातच, शिवाय, अन्नाची नासाडी म्हणजे पाप हॊय. पण साधं  अन्न देखील दुरापस्त असणाऱ्या मंडळींचा नुसता विचार  जरी मनात आला, तरी आपण किती नशीबवान आहोत ह्याची जाणीव होते आणि मग समोरचा बिघडलेला पदार्थ देखील अमुल्य वाटायला लागतो.  करून!  

No comments:

Post a Comment