Tuesday, 4 December 2012

NELLORE CHE COLLEGE DAYS AANI GAMAATEE

त्रिची मधील मुक्काम हलवून आम्ही १९७८ मध्ये आंध्रा प्रदेश मधील नेल्लोर येथे गेलो. मी १०वी करून आल्यामुळे मी कॉलेज मध्ये admission साठी गेले तो  हा किस्सा फार रंजक आहे. मला खरतर ११वी ला admission  मिळायला हवी पण नजर चुकीने मला फ  स्ट  ईयर  B .com  साठी adm  दिली गेली. मी दुसऱ्या  दिवशी कॉलेज ला  गेले, आणि f .y  च्या वर्गात जावून बसले. मला तिथली सर्व मुल मुली निरखून पहात होती, आणि थोडी   विचित्र पणे observe  करतांना जाणवली, पण मी विचार केला, आपले दिसणे, ड्रेस, बरेच वेगळे असावे, म्हणून बघत असतील.  कारण, मी पाहिलं तेव्हां सगळ्या मुली तिकडच्या पारंपारिक Half -sari  किंवा साडी नेसलेल्या होत्या, आणि मी जीन्स ! आणि त्यांचे तिथले  वावरणे बरेचसे अंग चोरल्या सारखे, आणि संकोच्लेले वाटले. म्हणजे, त्या मुली अगदी जीव मुठीत धरून, भेदरलेल्या अशाच वाटत होत्या, निदान मला तरी . कारण मी म्हणजे एकदम बिंधास ! आणि त्रिची मध्ये co -ed  school  मध्ये शिकल्या मुळे , मुलांची भीती वगैरे वाटण, म्हणजे हास्यास्पदच!
V  R College नेल्लोर


माझं  कॉलेज VR college,  पहिल्या दिवशीच, पहिलेचदोन तास  accounts  चे ! सर आले आणि नवीन मुलांची  introduction  झाली, त्यात मीही आले. पण, माझी जरा जास्तच  माहिती घ्यावी लागली. पण त्यांनी मला विचारले की १०  वी तून f .y  मध्ये कशी काय आली ! पण माझ्या कडे काहीच उत्तर नव्हते! i  was  clueless ! त्या वेळी मला पण काही तरी खटकल. असो, सर क्लास घ्यायला लागले, आणि ते म्हणायचे, 'we  have  learnt  this  last  year ! आणि पुढे जात होते. असा गोंधळ झाला! मग ऑफिस मध्ये   पुन्हा गेलो तेंव्हा  कळले की, चुकीची  adm  दिली गेली.! jr  college  ला पुन्हा adm  घ्यावी लागणार.! पण बाबांनी आणि मी प्रिन्सिपल ना भेटून हा प्रश्न कसा सोडवायचा हे विचारले. तर ते म्हणाले, की bright  student  आहे, तर, तिला  १२ th  std मध्ये adm देतो,आणि  ११ th  ची exam   internal  देणार , पण,अभ्यास खूप करावा लागणार! मी काही वेळ न घालवता  हो म्हणाले  पण त्यानंतर संपूर्ण  वर्ष म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास! पण आधीच सांगितलेले सरांचे मार्गदर्शन मिळाले आणि  माझी नैया ११ वी आणि  १२ वीची  परीक्षा पार करून पुढे निघाले !
कामाक्षी मंदिर नेल्लोर

आंध्र प्रदेश ची एक पारंपारिक पाककृती - हैद्राबादमधील ईद निमित्त बनवला  जाणारा 'शीर कुर्मा '
शीर कुर्मा :

बदाम, काजू, खारीक, पिस्ते, १ वाटीभर घेवून, २ तास पाण्यात भिजवून ठेवावेत, आणि नंतर पातळ काप करून तळून घ्यावेत.   १/४ वाटी   सुके खोबरे काप किंवा कीस कोरडा भाजावा. २ tbsp खसखस कोरडी भाजावी.
शीर कुर्मा  बनवायच्या वेळी, २ tbsp  तुपावर १ १/२ वाटी  बारीक शेवया परतून घ्या काढून ठेवा .. ड्राय फ्रुट्स घाला. दूध गरम करून, त्यात शेवया, ड्राय फ्रुट्स,खसखस, खोबर , घालून नीट   शिजू  द्या. चारोळ्या, वेलची दाणे, केशर घालून   सर्व्ह  करावे. २ tbsp  खवा घातला तर आणखी स्वादिष्ट होतो

आणखी काही आठवणी,  पण पुन्हा केव्हा तरी! अरे हो, आजच मूगडाळीचे  लाडू केले होते. मस्त झाले!.

ह्याची रेसिपी पुन्हा केंव्हातरी!

No comments:

Post a Comment