Friday, 30 September 2016

पितरांचे पुण्यसमरण...चालीरितींच्या आणि रूढींच्या विळख्यात...


 आजकाल माणसं फार असंवेदनशील व्हायला लागली आहेत खरी... आजच पेपरमध्ये बातमी वाचली... तीर्थक्षेत्री पितरांना दिलेल्या नैवेद्याला काकस्पर्श व्हावा ह्यासाठी लोक काय काय करतील ह्याचा नेम नाही! एका ठिकाणी काकस्पर्श व्हावा ह्यासाठी बराच वेळ मंडळी ताटकळत बसली होती. आणि तिथेच थोड्या अंतरावर एका झाडावरून एक अडकलेला कावळा खाली काढला गेला होता, तो जखमी आणि निष्प्राण अवस्थेत होता. तर  हीच मंडळी ते नैवेद्याचे ताट घेऊन तिकडे धावली, कि उपाशी कावळा अन्नाला खाईल तर काकस्पर्श होईल... पण तो कावळा त्या मनःस्थितीतच नव्हता, आणि तेवढी ताकदही त्याच्यात नव्हती. मग मंडळींनी काय शक्कल लढवली बघा हं... कावळ्याची चोच पकडून त्यांनी अन्नाला लावली... काकस्पर्श झाला... मंडळी खुश!

पण कुणी त्या कावळ्याला  पाणी दिले नाही,  त्याची काळजी  केली  नाही, फक्त आपला स्वार्थ बघितला...

ह्याच संदर्भातला दुसरा किस्सा असाच... विचार करायला लावणारा..

आजकाल वृक्ष तोडीमुळे आणि नवीन वृक्ष लागवड न झाल्यामुळे, पक्ष्यांची आणि पर्यायाने कावळ्यांची संख्या कमी  झाली  त्यामुळे काकस्पर्श करून घेण्यासाठी लोकांना अक्षरशः अथक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे काही लोकांनी   तोडगा असा काढला काढला की, कावळ्या ऐवजी गाईलाच नैवेद्य दिला!

मग असं वाटतं  की आधीच्या बेरहम लोकांपेक्षा ही मंडळी बरीच म्हणायला हवी! निदान कुणाच्या मुखी अन्न लागले तरी...

तर परंपरांचा अवास्तव अट्टाहास सोडून द्यायला  हवा ,नवीन विचार हवेत, नवीन कल्पनेतून देखील पितृदान   करता येते हे बघितले पाहिजे. साधनांच्या पूर्ती मध्ये न अडकता' साध्य'   साधले पाहिजे!

आपल्याला पूर्वजांची आठवण राहिली पाहिजे ह्यासाठी हा संस्कार आहे तर मग काही क्षण स्वस्थ बसून आपल्या आईवडिलांची, इतरेजनांची आठवण काढा, चांगल्या गोष्टी आठवा, त्यांचे जगणे   कसे तुमच्या आयुष्यात सुख देऊन गेले हे त्यांच्या पाशी व्यक्त करा, आणि मग बघा, इतर कोणत्याच  साधनांची आवश्यकता पडणार नाही... आणि ह्या दिवशी कोणतेही सोपस्कार न करता, पितरांच्या शांतीसाठी दान करावे म्हणजे सर्व काही साध्य होते.. दान म्हणाल, तर दान हे प्रेमळ अंतःकरणाने, पितरांच्या मायेची, त्यांच्या ऋणाची आठवण ठेवून व्हावे आणि मुख्य म्हणजे दान हे सत्पात्री व्हावे ह्याची दक्षता घेतली, तर दान हे पुण्यकारक ठरते.  

Tuesday, 20 September 2016

डाएट आणि मी?????




आजकाल डाएटचे इतके फॅड झाले आहे, आणि इतके स्तोम माजवले जाते, की काही विचारू नका! रकानेच्या रकाने भरून लिहिलं जातं, तेवढंच ते वाचलं जातं, पण प्रत्यक्ष कृती? काहीच नाही... हसू नका , हे सत्य आहे.अनेक   जातात पण किती पाळले जातात ते त्या मंडळींनीच माहित!

पण एक मुद्दा मात्र मला नेहमी पटतो, तो हा की आपल्या पूर्वजांनी जे अन्न खाल्ले, तेच आपल्याला पण पोषक नक्कीच आहे. साधं, सकस, पौष्टिक आणि चौरस आहार हाच  शरीराला, मनाला, बुद्धीला, आत्म्याला, आणि पर्यायाने आपल्या संपूर्ण  जीवनाला तृप्तता देतो.

पण जीभ हा अवयव असा आहे की ज्यामुळे ह्या भूतलावर खवैय्ये कालही  होते,आजही आहेत, आणि येणाऱ्या काळात पण असणार! मी पण त्यातलीच एक खवैय्या! माझ्या मनात सतत खाण्यापिण्याचे विचार, नवीन रेसिपी, असे  फिरत असतात. म्हणजे हे नका समजू की मला दुसरे काही उद्योग नाहीत.. पण खवैय्येगिरी करणं हे माझं  अत्यंत आवडीचं काम आहे. मी कुठेही काही खाल्लं, आणि तो पदार्थ नवीन असो वा जुना, पारंपरिक किंवा इतर प्रांतातला, मला तो नेहमी भुरळ पडतो, आणि त्याचे विश्लेषण करते, जमल्यास रेसिपी विचारून घरी ट्राय करण्याचा प्रयत्न करते जो कधी जमतो कधी फस्तो ... तरी पण माझ्या ज्ञानात भर नक्कीच पडते!

माझं सांगू का काय होतं ? मी घरी जेंव्हा एखादा पदार्थ करते, आणि तो  उत्तम होतो, तेंव्हा मी खुश होते! पण फसला तर मी कधी कधी डिप्रेस होते, नाही असे नाही, पण मग चुकीचे  विश्लेषण आणि पुन्हा कधीतरी तो प्रयत्न करायचा, तेंव्हा हमखास यश मिळते! खास करून केक बनवते तेंव्हा असे होते की केक जर उत्तम, म्हणजे स्पॉंजी, आणि सुंदरसा बेक होऊन बाहेर आला, त्याचे  मनासारखे काप झाले, तर मी त्याकडे समाधानाने बघते, आणि केक डब्यात भरून ठेवते! मला मग तो खायची इच्छाच होत नाही! तो दुसऱ्यांना  खिलवण्यात जाम मजा येते, खरं सांगते! अजबच आहे ना असे होणे? पण माझे असेच होते खरे... हेच केक बिघडला, तर पुढे बरेच दिवस तो माझ्या समोर फिरत राहतो, डिवचत राहतो.. मग पुन्हा विश्लेषण, पुन्हा प्रयत्न.... पण त्या आधी बिघडलेल्या केक मधून नवीन काहीतरी पुडिंग तयार करते! मग हीच नवीन डिश माझ्या रेसिपी बुक मध्ये घाईघाईने लिहून ठेवली जाते. मग एखादे दिवशी, चांगल्या जमलेल्या केकचे हेच पुडिंग बनवून खातो आम्ही दोघी! भानू आणि मी!

 

भुकेचे संकेत आणि आपला आहार





मंडळी, बऱ्याच दिवसांपासून मी कोणतीच रेसिपी टाकली नाही   .... माझ्या ब्लॉगचे नाव फूड इज लाईफ असे आहे, पण  आता कसे आहे पहा, आपण जसे अन्न घेतो   तसे आपण वागतो, बोलतो,जगतो असे म्हणतात. आता आयुष्याच्या  ह्या टप्प्यावर येऊन मी थोडे निर्बंध आपणच घातले  आहेत. म्हणजे गोडावर, साखरेवर, मिठावर नियंत्रण ,तसेच मैदा,चीझ,बटर, ह्यासारख्या वस्तूंवर तर संपूर्ण बंदी!(म्हणजे शक्यतोवर बरं का...हसू नका... )  एन्जॉय केलं  इतके दिवस आता बास!!  आणि असे अनेक संकेत  आपले शरीर  आपल्याला वेळोवेळी देतच असते, फक्त आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो ,किंवा आपल्याला समजतच नाहीत ते इशारे... आणि  एखाद्या बेसावध क्षणी एखादा आजार आपल्याला पकडतोच... मग  ते इशारे, ते संकेत लक्षात  येतात,आणि  संबंध कळतो, पण मग उशीर झालेला  असतो ना...मग  धावाधाव,पळापळ, डॉकटर, औषधं  वगैरे,वगैरे... तब्येत ठीक झाली की पुन्हा तेच ..  येरे माझ्या मागल्या...  असो.

तर कालच मी वरील सर्व नियम धाब्यावर बसवून पास्ता बनवलाच...,

पास्ता उकडून ठेवला.भांड्याला तेलाचा हात लावला म्हणजे पास्ता चिकटत नाही. उकडताना पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल आणि मीठ टाकले, पास्ता उकडून गाळणीतून गाळून  पाण्याखाली मोकळा करून घेतला. ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उकडलेल्या भाज्या   घालून फ्राय केले. नंतर पास्ता घालून नीट मिक्स केले.
एका बाऊल मध्ये thai  green curry paste, टोमॅटो सॉस, मिक्स्ड हर्ब्स, मीठ, क्रीम, दूध, कोथिंबीर घालून, पाणी घालून पेस्ट तयार केली, ती घातली. मिक्स केले. शेवटी  कॉर्नफ्लोर पाण्यात मिक्स करून ते घालून नीट करायचे, वरून चीझ किसून घालायचे, आणि   गरम गरम सर्व्ह करायचे... म्हणजे मी ते लगेच मट्ट केले!

टीप: पास्ताच्या आकारा प्रमाणे भाज्या कापाव्यात, म्हणजे डिश  छान दिसते.. म्हणजे लांब पास्ता असेल तर भाज्यांचे लांब तुकडे करायचे, आणि शॉर्ट पोस्ट असेल तर भाज्यांचे चौकोनी तुकडे करायचे..

हे सगळं असलं तरी आपल्या वयानुसार, प्रकृतीनुसार, हवामानानुसार, ऋतूनुसार,जेवणाच्या वेळेनुसार आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीराचे संकेत ऐकून खावे, म्हणजे मग त्रास होत नाही, हे मात्र खरं!   
 

Sunday, 18 September 2016

पूर्वजांचे समरण करू यात....



 पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांना आठवावे, त्यांच्यासाठी काही गोडधोड नैवेद्य अर्पण करावा, त्यांना तृप्त करावे. ह्यामुळे त्यांचे आशीर्वाद द्विगुणित होऊन आपल्या पाठीशी राहतात. त्यांचे ऋण  मानावे, त्यांनी एकोप्याने, आनंदाने, एकमताने त्यांच्या लोकी राहावे, आणि आपल्याला इहलोकी समृद्धी, प्रगती, आणि यश द्यावे म्हणून त्यांच्याकडे मागणे मागावे. तसा  हा फक्त एक संस्कार असला  तरी  त्यात फार मोठा अर्थ आहे, तो समजून   घेतला तर मग ह्या संस्काराचं  महत्व कळतं.

खरं तर आपण आपल्या आई वडिलांचे, पूर्वजांचेच काही काही गुणधर्म आत्मसात करून जन्माला येत असतो. मग त्यात गुण, अवगुण, सर्वकाही आले. पण आपण एक करू शकतो, की ह्या सर्व गोष्टींचे अवलोकन करून, आपल्यातले दुर्गुण थोडे कमी, किंवा नष्ट करून, थोडे सद् गुण अंगीकारण्याचा प्रयत्न तर करूच शकतो. त्यातून आपण आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी  नवीन,चांगले देऊ शकतो.

अनेक वेळा आपण काही काही अंधश्रद्धा बाळगून असतो. पण आता आपल्याला माहित झालंय की ह्या अंधश्रद्धा आहेत, तर मग त्याच पुढे मुलांना पाळायला न सांगता, त्यांना इथेच मोडून टाकू यात, खरं ना?   खूप फरक पडतो...' मांजर आडवं गेलं तर...' ह्या शीर्षकाचं  पुस्तक नुकतंच वाचण्यात आलंआणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.   तसं मी पण बऱ्याच गोष्टी नाही पाळत... शनिवारी नखं  कापू नयेत, शनिवारी तेल आणू नये वगैरे वगैरे... आणि एवढे कोण लक्षात ठेवतो हो? असं करीत  बसलो,तर आयुष्य ह्यातच निघून जाईल, आणि मनातल्या गोष्टी मनातच राहून जातील.

तेंव्हा माणुसकी आणि नीतिधर्माला अनुसरून आपले काम करावे, आणि निश्चिन्त मनाने, मोकळेपणे जगावे, जगू द्यावे!

Sunday, 4 September 2016

स्वतःला शोधा...

हरितालिका पूजा
 मंडळी, हरितालिका पूजन झाले, आता  गणेश स्थापना झाली, दहा दिवस नुसती धूम!!! गणपती, मग गौरी...आनंदाचा, खवैयेगिरी करण्याचा सण! कारण बाप्पाच मुळी खवैया! मग भक्त मागे कसे  राहतील? पूजा, आरास, देखावे, मित्र मैत्रिणी,  नातेवाईक,आप्तेष्ट सर्वांसोबत दहा दिवस आनंदाने घालवायचे, बाप्पाचा आशीर्वाद घ्यायचा, त्याला भावपूर्ण निरोप द्यायचा आणि पुन्हा त्याच्या आगमनाची वाट पाहायची!

ह्या दिवसात वातावरण मंगलमय असते, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद तर आपण मागतोय, पण त्या उद्दिष्टाच्या पूर्तीकडे जाणारी वाट आपणच शोधायची, मार्गक्रमण आपणच करायचे असते. तो आपले प्रयत्न, निष्ठा, सातत्य, सचोटी, आणि मुख्य म्हणजे आपण आपल्याला हवे असलेले इप्सित साध्य करण्यासाठी स्वतःशीच  किती वचनबद्ध आहोत ते  बघत असतो. आणि त्यावर यशाची मात्रा अवलंबून असते.

हे साध्य ठरवण्यासाठी आधी आपल्याला स्वतःला ओळखावे लागते. आपल्या जमेची बाजू, आपल्या कमतरता, आपल्याला उपलब्ध असलेली साधनसामग्री, आणि अशा अनेक तरतुदींची पूर्तता करण्यासाठी लागणारा वेळ, श्रम, आणि मुख्य म्हणजे इतरांची मिळणारी साथ ह्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर,  योग्य वेळी, योग्य रितीने योग्य दिशेने पाऊल उचलावे.

कधी कधी एवढे सगळे करूनही यश मिळत नाही... मग निराशा येते... पण हार नाही मानायची. पुन्हा आढावा घ्यायचा आणि काही वेगळे करून मार्गक्रमण करायचे. असे असूनही यश मिळत नाही, तेंव्हा विचार करावा की आपण चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो आहोत का? तसे असेल तर आणखीन वेगळ्या विचाराने,  वेगळ्या  दिशेने पुन्हा प्रयत्न करावेत. कुठे ना कुठे तरी आपल्याला आपण' सापडतोच! जशी  मला ह्या लिखाणात मी गवसले तसेच तुम्हाला पण तुमच्यातला 'मी' गवसू शकते... 

Thursday, 1 September 2016

HOW MANY PEOPLE ARE YOU LIVING WITH?...talk by Osho

This is an article published in the Times of India, which is a talk given by Osho.It is deep, profound knowledge told in simple words, a guideline to find yourself, your identity, and an answer to the perinnial question everybody asks ,as to  how to find my inner voice, MY VOICE! After reading it carefully, I think atleast I have found an answer to my query. I have done this in my life... I am an individual with my own identity, and cannot just live life following somebody's guidance or instructions for ever! I should be able to do whatever I want to do, albeit with some restrictions, which is a rule that applies to each and every person. So, we should be able to listen to our own mind, think, and make decisions for ourself, not completely disregarding the advice of our wellwishers..our near and dear ones!

HOW MANY PEOPLE ARE YOU LIVING WITH? 

Everybody is born as one single individual, but by the time he is mature enough to participate in life, he has become a crowd. This is almost the case with everybody. Become aware of it.

If you just sit silently and listen to your mind, you will find so many voices. You will be surprised;you can recognize those voices very well. Some voice is from your grandfather, another is from your grandmother., your father, mother, priest, teachers, neighbours, friends and enemies too.All these voices are jumbled up in a crowd within you. And if you want to find your own voice, it is almost impossible, the crowd is too thick.

Infact, you may have forgotten your own voice long before. You were never given freedom enough to voice your opinions. You were always taught OBEDIENCE..to say 'yes'to everything that your elders were saying to you. You were taught that you have to follow whatever your teachers or priests are saying or doing. Nobody ever told you to search for your own voice -Have you got a voice of your own or not?

So, your voice has remained very subdued, asnd other voices are very loud, commanding, because they were orders and you had followed them_despite yourself. Naturally, only one voice is missing in you, only one person is missing in you and that is YOU. Otherwise, there is a whole crowd. And that crowd is constantly driving you mad, because one voice says, "Do this", another says, "Never do that"! "Dont listen to that voice!" And you are torn apart.

This whole crowd has to be withdrawn. It has to be told, "Now please leave me alone!"Those who went away to the mountains or secluded forests, were really not going away from society; thery were trying to find a place where they can disperse their crowd inside. And those who have made a place within you are obviously reluctant to leave.

But if you want to become an individual in your own right, get rid of this continuous conflict and mess within you; then you have to say goodbye to them_even when they belong to your respected father, mother anyone else dear to you. It does not matter; One thing is certain; they are not your voices. They are the voices of people who have lived in their time, and they had no idea what the future was going lto be. They have loaded their children with their own experience; and their experience is not going to match with the unknown future.

Their child is going to face new storms, new situations, and he needs a totally new conscicousness to respond. Only then is his respsonse going to be fruitful; only then can he have a life that is not just a long drawn-out despair, but a dance from moment to moment, which goes on becoming more and more deep to the last breath.

So, dont create any fight with the crowd. Let them fight amongst themselves.  Meanwhile, you must  try to find YOURSELF. The man who is HIMSELF... , unburdened of the past, Original, strong as a lion and innocent as a child...he can reach  the stars, or even beyond; His future is golden.

'पोया सन मोठा, नही आनंदले तोटा'




खानदेशात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा साजरा केला जातो. तिथे बैल देव म्हणून त्यांना 'नंदी' म्हणतात. नंदीची पूजा करून त्यांच्याविषयीचा कृतज्ञतापूर्वक असा श्रद्धाभाव व्यक्त केला जातो. या दैवताचे ऋण मान्य केले जाते.

काही अहिराणी भाषेतील ओव्या आहेत, त्या आताच एका लेखात वाचल्या...खूप सुंदर आणि पोळ्याचे नेमके दर्शन घडवणाऱ्या आहेत ह्या ओव्या...

'फूटनं  तांबडं तांबडं, ऊन पडनं पिवय पिवय
आज पोया भागना , नंदीस्ले घाल आंघोय' ,... नंदीला पहाटे  अंघोळ घालायची


'धवया पिवया वाघ डकारे गल्लीत
भाऊ तुन्ह धवय धन, गोठानं घरात
भाऊ धवय धन तुन्ह, असामानना तारा,
या दैवतेस्नी नही, लागू दिन्हा ऊनवारा'... नंदीच्या ढवळ्या पिवळ्या रंगावरून नावं पडलेले हे नंदी गल्लीत मात्र वाघासारखे असतात. बहीण  म्हणते भाऊराया, तुझ्या गोठ्यातले हे' धवल धन'  असेच आसमंतातला तारा राहो, ह्या दैवताला कधीही ऊन, वारा, पाऊस न लागो, म्हणजे त्याची तब्येत उत्तम राहो!

'मन्हा धवया पवया, शमी शिंगडे पितयनी
संगे रेशमन दोर, बाशिंग मोरखी आरसानी'..... पोळ्याच्या दिवशी गावाच्या वेशीवर नारळाचे तोरण, आणि नोटांचे तोरण बांधतात. 'पोयना बाजार' भरतो, त्यात बैलांना सजवायची वस्तू मिळतात.. रंग, भिंगाच्या कलाकृती, भरतकाम केलेल्या झूल, नथी, दोर, गोंडे, घुंगुरमाळा, घाट्या , शाम्या अशा वस्तू असतात. त्याचे हे मायमाउलीने केलेले वर्णन!

ह्या दिवशी बैलांची शर्यत पण होते, ज्यात गावच्या पाटलांच्या बैलांचा मान मोठा असतो. पाटलांनी मारुती समोर नारळ वाढवला की 'पोळा फुटला' असे म्हणतात आणि मग मिरवणुकीला सुरुवात होते. पाटलांची बैल पहिले दरवाज्याचे तोरण भेदून पुढे जाणार! 'दरवाजानं तोडतस' असे अहिराणी भाषेत माउली म्हणते''


'सनमान सन, शिजे पोयानं पुरनं,
भाऊना नंदी, फ़ंदी तोडी उना, दरवाजानं तोरन'... पाटलाची लेक कौतुकाने सांगते की हा मानाचा सण, त्यासाठी शिजवले पुरण ...  माझ्या भावाचा नंदी भेदिलं तोरण!


पाटलाच्या बैलांचे कोण कौतुक !.. लेक म्हणते..
. 'आयबा पोलीसपाटील, दोधान्ना मौजना,
आठ हजारनी जोडी, साज तिले सोनाचांदीना'...बाप पोलीसपाटील, घरात दूध, अन्नाची काही मोजदाद नाही! आठ हजाराची जोडी त्याला सोन्याचांदीचे दागिने!

बागलाणातील खापरावर शिजवलेल्या सुवासिक खान्देशी पुरणपोळी बैलांना खायला देतात, अंगण सजलेले, बैल सजलेले, गृहलक्ष्मी सजलेली ... अप्रतिम ;अशा ह्या देखण्या सोहळ्याचे वर्णन करतांना माउली म्हणते...
'जोडी उभी आंगन मा, आंगन त्यास्लेच वडे,
लावू कपायी तांदूय, आरतीमा तेज पडे'.... अंगणात उभ्या बैलजोडीला कपाळाला तांदूळ लावते तेंव्हा आरतीचे तेजच वाढते!

गावात जतिभेद न बाळगता बैलांना प्रत्येक घरात ओवाळले जाते, पुरणपोळी दिली जाते. अहिराणी संस्कृतीने ही एकात्मता आजही सांभाळली आहे.  मुक्या प्राण्यांसाठी उदात्तता आणि उत्कटता दिसते ती अशी'''
'आज पोयाना सन, खाऊ पोटाले काहीमाही
धवया पवया देव मन्हा, तुम्हले देस  पुरणपोयी'

बैलजोडीवर पुत्रवत माया करणारी माउली पुढे म्हणते..
. 'वाज वाज रे मांग भाऊ, नाचू दे रे धवया पवया,
तुन्हा डफडाना जोडले, खुय खुय करे घुंघुरमाया'... ढवळ्या पवळ्याला डफ तुतारीचंता तालावर नाचू दे, तेंव्हा त्यांच्या गळ्यातल्या घुंघुरमाळा खूळ खूळ आवाज करतील, ते कानाला किती गोड वाटते!

आणि शेवटी...
'पोया पोया करू, पोया कुणबीना आसरा
नंदिले ववायाले, सन नही ना दुसरा
देशी देवराया धनसम्पत्ती थोडी थोडी
पायनामा हरी, अंगनी नंदीस्नी जोडी'.... कुणबी लोकांचा खरा आधार असलेल्या ह्या नंदीला ओवाळायचे , आणि देवाकडे मागणे मागायचे, की देवा, धनसम्पत्ती थोडी थोडी दे, पण अंगणी  माझ्या बैलजोडी नांदू  दे!