Tuesday, 28 January 2014

PHASLELE PADARTH AANI TYACHE DISASTER MANAGEMENT

पाककला हे  शास्त्र आहे असं  मानलं जातं  ते उगीच नाही. But  still,  it  is not rocket science! कला आणि शास्त्र  ह्यांच्या सुरेख संगमातून होणारा हा रसना रंजन करणारा अविष्कार म्हणावा लागेल. पण  त्यामुळेच की   काय, कधी कधी शास्त्रात चूक नसतांनाही कलेचा अविष्कार मात्र  मनासारखा होत नाही! अहो, म्हणजे सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगायचं तर आपण केलेला पदार्थ फसतो!!!!

अनेक वेळेला व्यवस्थित केलेला एखादा पदार्थ एखादवेळी मात्र सपशेल फसतो, हे कितीतरी लोकांनी अनुभवलं असणार, नाही का? मला तर असा पदार्थ फसला, की अगदी depression च येतं. म्हणजे मन एकदम उदास होऊन जातं, निराश वाटतं. मग पुन्हा हा पदार्थ नीट झाला की मगच हे नैराश्य दूर होतं. आणि हा पदार्थ परत करे पर्यंत हे माझ्या डोक्यातून जात नाही.

माझ्यासाठी baking म्हणजे theraputic आहे. If I am feeling low, I start baking a  cake, and if   it turns out well baked, I feel happy! केक  चांगला  झाला, मनासारखा झाला, तर मी तो खात  सुध्दा नाही! very funny na?  पण चांगला झालेला पदार्थ पाहूनच मला समाधान होतं.  specially विथ केक. 

एवढं सगळं सांगायचं कारण असं की,परवा   छान Peanut Butter cake बनवायला घेतला, बनवला आणि हायरे देवा! केक फुलायच्या ऐवजी बसला! आणि त्याबरोबरच माझा मूड पण बसला!म्हणजे ingredients तेच, माप तेच, microwave तोच, सगळं काही तेच, मग का बर बिघडला केक? नो idea!(get idea!) just  joking यार!

तर Peanut Butter cake साठी:

१०० grms मैदा, १५०gms पिठी साखर, ११/२ टीस्पून बेकिंग पावडर, १/२ टीस्पून सोडा, १०० gms peanut butter, १०० gms बटर, १ संत्र्याची  किसलेली साल, ५० gms melted white chocolate,
१ टीस्पून vanila essence, आणि २ अंडी नीट whisk करून १८० degrees वर ३० मिनिटे बेक करावा.

आता हा केक फसला! मग disaster management! ह्याच केकचा चुरा केला, त्यात गोल्डन सिरप,( किंवा थोडा साखरेचा पाक करून) थोडं मेल्ट केलेलं व्हाईट चोकलेट, आणि हवी असल्यास थोडी रेड वाईन  घालून,छोटे छोटे balls तयार करायचे. वरून व्हाईट चोकोलेटने आणि चेरीजने   सजवायचे.झाले …. chocolate balls ready!

chocolate balls
तर  महत्वाचे काय की , वस्तू वाया घालवायची नाही, तर तिचं स्वरूप बदलून पुन्हा खाण्या योग्य बनवायची. म्हणजे केक बनवला तो शास्त्रा प्रमाणे, पण हे chocolate balls बनवले ते कलेने! म्हणजेच शास्त्र आणि कलेचा संगम म्हणतात तो असा!

        

Saturday, 18 January 2014

SUCCESSFUL RECIPE KASHI OLKHAYCHI?

'कुणी बघणार असेल….  तर दाढी करण्यात अर्थ आहे…….
कुणी बघणारच  नसेल, तर अंघोळ देखील करणे व्यर्थ आहे !'

आलं ना हसू?  म्हणजे बघा, मनुष्य किती 'attention seeking' असतो ते. प्रत्येकाला वाटतं की   आपल्याकडे कुणी तरी बघावं, कुणीतरी आपलं  कौतुक करावं, कुणीतरी smile द्यावं , कुणीतरी जवळ बसून चार गप्पा माराव्यात……

अर्थात काहींना हे सुख मिळत नाही असं होतं, पण बहुतेकांना   ते कमीजास्त प्रमाणात मिळतंच. काय आहे न, आपण कुणाकडे सुख मागतो, किंवा कुणाकडून सुखाची अपेक्षा करतो हे महत्वाचे नसते.  आपल्याला कोण सुख देतो किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण करतो हे महत्वाचे असते.   अपेक्षा केली की अपेक्षाभंग आलाच, आणि अपेक्षाभंग झाला की दुःख आलंच! त्यामुळे अपेक्षा न ठेवता सुख मिळालं तर त्या सुखाची किंमत कळते! पण अपेक्षा नाही ठेवल्या तर मग तो   माणूस कसला?

आता आपण एखादा  पदार्थ करायला घेतो, तेंव्हा हा पदार्थ चांगलाच होईल ही अपेक्षा ठेवून केला, आणि तो पदार्थ फसला, तर आपल्याला खूपdemotivated व्हायला होतं, खर ना?  पुढचे काही तास, दिवस त्यातल्या चुका शोधण्यात आणि हळहळ व्यक्त करण्यात जातात. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख ते हेच.

तेंव्हा कोणताही पदार्थ करतांना पहिले प्रथम ती रेसिपी मनातल्या मनात करून बघायची, म्हणजे सर्व जिन्नस आपल्या मनातून घालीत जाऊन पदार्थ तयार करायचा. ह्या procedure मुळे   प्रथम पदार्थ बनवण्यात काही त्रुटी आहेत का ते लक्षात येतं. मग त्यांची नोंद करून ठेवायची.  मग ह्या त्रुटी   कमी करून पुन्हा  procedure करून बघायची मनातल्या मनात, आणि तयार पदार्थाचा अंदाज घ्यायचा, नाकानी  सुवास घ्यायचा, जिभेने चाखायचा, तो देखील मनातल्या मनात  बर का!  मग एवढे केल्यावर आपल्याला तो पदार्थ actually  करण्यास योग्य आहे किंवा नाही ते लक्षात येतं. त्यानुसार मग तयारी करून पदार्थ करावा, शक्यतोवर बिघडत नाही, किंवा फारच थोडे बिघडते! हा माझा अनुभव आहे, तुम्ही पण try करून बघा आणि तुमचा experience मला जरूर कळवा.

एक चिकनची मस्त रेसिपी…. ही मी अशीच आधी मनात करून बघितली आणि तोंडाला पाणी सुटल! म्हणजे its a  sure sign of a  successful recipe!  मग केली!

नारळाच्या दुधातली चिकन:

१ चमचा तेल आणि १ चमचा  तूप दोन्ही एकत्र    गरम करायचे. त्यात मोहरी, सुकी लाल  मिरची , आणि लांब चिरलेला कांदा १ वाटी टाकून ब्रोव्न करून घ्यावे . २ वाट्या boneless चिकन चे तुकडे टाकून परतावे. आधी १/२ वाटी नारळाचे पातळ दूध   घालून,झाकण   ठेवून ४ ते ५ मिनिटे चिकन शिजवावे. नंतर नारळाचे घट्ट दूध घालून  शिजवावे. gas  बंद करून  मीठ,तिखट किंवा हिरवी मिरची तुकडे, चिंच कोळ १टीस्पून, आणि रसम पावडर घालावी.
तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची तुकडे घालून फोडणी चिकनवर ओतून,  कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह   करावी.

    

Friday, 17 January 2014

AAJCHA SOUTH INDIAN MENU

 शायर  ने कहा…

हमें तो अपनोंने  लूटा, ग़ैरोंमें कहाँ दम था.।
हमारी कश्ती वहाँ   डूबी , जहाँ पानी कम था ।'

इसपर शायर  की बिवीने कहा.....

'तुम तो थे ही गधे, तुम्हारे भेजेमें कहाँ  दम था.।
वहाँ कश्ती लेके गए ही क्यूँ, जहाँ पानी कम था।'

 
खरं म्हणजे बायकांना जरा जास्तीचा म्हणजे सगळ्या लोकांना ६वा सेन्स असतो ना? तर त्यांना ७ वा
सेन्स असतो! असं  म्हणतात बर! पण मग ,आपला नवरा 'गधा' आहे हे त्यांना लग्न व्हायच्या आधीच  का बरं  कळत नाही? बर आणि सारखं असं  त्याला म्हणत राहायचं म्हणजे मेलेल्याला किती  मारायचं हो? असो.

काल डोसा आणि सांबार केलं आणि त्याच बरोबर इडीय्प्पम   बनवलं  होतं,  टेस्टी झाले होते! तसं  मला साऊथ इंडिअन डिशेस जरा जास्तच आवडतात. आणि ही इडीयाप्पाम ची रेसिपी देते आहे, ती जरूर try   करण्या सारखी आहे….

इडीयाप्पाम:


किंचित मीठ आणि १ चमचा  तेल किंवा तूप घालून २ वाट्या पाणी उकळावे . त्यात १ वाटी मोदकाची पिठी (किंवा साधी तांदुळाची पिठी पण चालेल ),घालून, थोडे मिक्स करावे. २ मिनिटांनी पिठी शिजली की gas बंद करावा, पिठी झाकून  ठेवावी. २ मिनिटांनी पिठी तेलाच्या हाताने नीट  मळून घ्यावी. मोदकपात्रात पाणी भरून गरम करावे. इडली stand वर, सोऱ्याला तेल लावून, पिठी भरून, जाड शेवेच्या चकतीने शेव पाडावी.  stand मोदकपात्रात ठेवून ३ ते ४ मिनिटे उकडावे. गरम गरम इडीयाप्पाम डिश मध्ये  केळीच्या पानावर घेवून, त्यावर गरम सांबार आणि चटणी सोबत द्यावे.
variation:  हे इडीयाप्पाम चण्याच्या कोरमा बरोबर पण सर्व्ह करतात.




Thursday, 16 January 2014

TEELGUL GHYAA, GOAD GOAD BOLAA!

मित्रहो,
 'तिळगुळ घ्या, गोड बोला'

मध्यंतरी बरेच दिवस काही लिहिले नाही कारण घराचे रेनोव्हेशन करत होते.  आता काम पूर्ण झाले त्यामुळे परत लिहायला सुरुवात केली आहे.  मकर संक्रांत झाली, तिळगुळ खाऊन  झाला आणि बऱ्याच  मंडळींचे  गुळाच्या पोळ्या पण खाऊन पोट भरले   असेलच. गुळाची पोळी फक्त थंडीतच खाता येते कारण ती उष्ण असते, आणि इतर वेळी खाल्लेली पचणार नाही, तोंड येईल, उष्णता वाढेल असे त्रास होण्याची शक्यता असते.

त्यामुळे मी जे नेहमी माझ्या  ब्लॉगमधून सांगत असते ते असे की भारतीय संस्कृती मध्ये सण,उत्सव आणि त्यावेळचा आहार ह्याचे नाते असते. ह्या उत्सवाचा आपल्या  भावनिक, शारीरिक,  सामाजिक, आणि इतर काही अध्यात्मिक, किंवा वैज्ञानिक   घडामोडींशी संबंध  असतो, आणि तो संबंध आपल्या त्या ऋतूतल्या आहारातून व्यक्त होतो.

संक्रांति च्या सुमारास पतंग उडविण्याचे कारण पण तसेच आहे. ह्यावेळी हवा छान असते, दुपारचे ऊन   आल्हाददायक असते, म्हणून मग सगळ्यांनी पतंग उडवायचे, त्यासाठी गच्चीत किंवा मोकळ्या पटांगणात जायचे, वातावरणाचा  मनसोक्त आनंद घ्यायचा, मजा करायची!

उंधियो, मिक्स भाज्यांचे पदार्थ, गरम गरम हलवा, खीर, गुलाबजाम अशा गोड पदार्थांचा भरपूर साजूक तूप घालून   आस्वाद घ्यायचा, आणि मग भरपूर exercise पण करायचा आणि तब्येत उत्तम ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे!

संक्रांतीच्या आदल्या दिवशी 'भोगी' , भोगी च्या दिवशी घरातील अडगळीच्या, नको असलेल्या वस्तू फेकून देवून नवीन   खरेदी करावी.म्हणजे जुने  हेवेदावे, भांडणे,रुसवेफुगवे सोडून नव्याने प्रेम वाटावे हा संदेश! ह्या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत किंवा भाजी, आणि साधी तांदूळ_मुगडाळीची खिचडी करतात.

मकर संक्रांतीला तीळगुळाच्या वड्या, लाडू करतात.
ते तिळगुळ एकमेकांना देऊन "तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणण्याची प्रथा आहे. गुळाच्या पोळ्या भरपूर तूप घालून खाव्यात.
भरपूर रानमेवा म्हणजे बोरं, ऊस, मटार, हरबरा, गाजर, इत्यादी खावे. शिवाय सुकामेवा,  चिक्की,गजक सारखे पदार्थ पण भरपूर खावेत.

आणि संक्रांत म्हटली की काटेरी हलवा आलाच! तीळ  फोडून हलवा केला जातो. नंतर त्या हलव्याचे दागिने केले जातात आणि लहान मुलांचे बोरनहाण केले जाते!


म्हणजे छोट्या मुलांना काळ्या रंगाचे पण सुंदर सुंदर   कपडे आणि हलव्याचे दागिने, मुकुट वगैरे घातला जातो,  आणि त्याच्या डोक्यावर रानमेव्याचा पाऊस पाडतात! आणि त्याच्या ह्या बोरनहाणसाठी आलेल्या बालमित्रांना तो सर्व मेवा लुटू द्यायचा! काय मज्जा! पोरं खुश होतात अगदी!

नववधुंसाठी देखील ह्या सणाचे महत्व आहे बर का!


पहिल्या संक्रांतीला  सुनेला हलव्याच्या दागिन्यांनी सजवतात, तिचे लाड पुरवतात! शिवाय त्यांना काही भेटवस्तू  पण देतात.

 संक्रांतीचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे 'संक्रांतीचे वाण' लुटणे! महिला वर्गाचा हा आवडता भाग! सवाष्णींना  हळदी  कुंकू, तिळगुळ, काटेरी हलवा आणि वस्तू 'वाण' म्हणून  लुटायची! पुढे वर्षभर येणाऱ्या  सुबत्ते साठी हे 'वाण' द्यायचे. ह्यात महिला चमचे, बाउल, रुमाल ह्या सारख्या छोट्या वस्तू, किंवा धान्याची पाकिटे, सुबक कुंकवाचे करंडे, किंवा अनेक विध वस्तू लुटतांना दिसतात. कल्पकतेने वाण देणे ही सुध्दा एक कला आहे.

पौष शुध्द चतुर्दशी म्हणजे मकर संक्रांत आणि संक्रांतीचा हा सण  माघ शुध्द सप्तमी पर्यंत चालतो. म्हणजे बोरनहाण, हळदीकुंकू,  वगैरे सर्व उत्सव ह्या २१ दिवसात केंव्हाही करता येतात.

संक्रांत स्पेशल गुळाची पोळी ……

२ वाट्या बेसन कोरडे भाजून ठेवावे. १ वाटी गुल पाघळून घ्यावा. २ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून खसखस कोरडी भाजून घ्यावी, आणि भरड कुटावे. सर्व वस्तू एकत्र कराव्यात, त्यात वेलची पूड घालून सारण तयार   करावे. गव्हाची कणिक तेल आणि किंचित मीठ घालून घट्ट  मळून घ्यावी.

कणकेची छोटी गोळी घेऊन, उंडा  करावा, सारण भरावे, आणि हलक्या हाताने पोळी लाटावी. तव्यावर भाजून घ्यावी . थंड झाली की पोळी कडक होते, ती  थंडच खायची असते. पण खातांना भरपूर   तूप घालून खावी.
     

Friday, 22 November 2013

DIWALICHYA DIVASANCHE MAHATV

 दिवाळीची धूम सुरु होते शुक्ल पक्षातल्या द्वादशी पासून. द्वादशीला   म्हणतात 'गोवत्स द्वादशी' किंवा 'वसू बारस.'  वसू बारस म्हणजे गाई_वासराची पूजा करणे.  गाय आणि वासराला कुंकू लावतात, फुलांनी सजवतात, त्यांची ओवाळणी करतात, आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.
वात्सल्याचे प्रतीक असते गाय आणि बालपणाची निरागसता दिसते वासरामध्ये, त्या वात्सल्याचे आणि निरागसतेची ही आराधना!

दुसरा दिवस 'धनत्रयोदशी' चा. धनत्रयोदशीला  आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरीची पूजा करण्याचा दिवस.
धन्वंतरी
आरोग्य सेवा आणि संबंधित सेवा पुरविणारे किंवा त्यात सहभागी असणारे लोक धन्वंतरीची पूजा करतात. डॉक्टर्स, medical practitioners या सर्वांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आणि भक्तीसाठी अगदी खास दिवस.  .भगवान धन्वंतरी म्हणजे सर्व देव देवतांचे वैद्य  मानले जातात, आणि ते आयुर्वेदाचे जनक म्हणून त्यांची पूजा करून आपण दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याची त्यांच्या पाशी प्रार्थना करायची.

 ह्याच दिवशी संध्याकाळी यम दीप दान करतात, म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक पणती लावायची जिची ज्योत दक्षिणेला असेल अशी ठेवायची, पणतीला हळदी कुंकू वाहायच, फुल वाहायच, आणि दक्षिण  दिशा ही यमाची   दिशा असल्यामुळे,तिकडे हात जोडून, अपमृत्यू पासून अभय मागायचे, घरात सुख शांती मागायची.

तिसऱ्या दिवशी असते 'नरक चतुर्दशी'.  ह्या दिवशी  उठून उटणे लाऊन स्नान करून, सर्वांनी मिळून दिवाळीचा फराळ करायचा, फटाके उडवायचे, आणि घरात, भोवतीने भरपूर पणत्या लावायच्या.   नरकासुराचा वध झाला तो हा दिवस म्हणून आनंद साजरा करतात.

नंतरचा दिवस 'लक्ष्मीपूजा' म्हणजे कार्तिकातली अमावस्या. ह्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतात.  व्यापारी मंडळी त्यांच्या हिशोबाच्या चोपड्यांचे पूजन करतात.
लक्ष्मी माता
 
लक्ष्मीच्या प्रतिमेची, किंवा लक्ष्मीच्या चांदीच्या टाकाची पूजा केली जाते, लाह्या बत्तासे नैवेद्य म्हणून दिला जातो. लक्ष्मी बरोबरच धनाची देवता' म्हणून कुबेर'  ह्याचेही पूजन होते.
कुबेर _धनाची देवता
  सोबतच सोन्याच्या दागिन्यांची, आणि पैशांची पूजा केली जाते.

त्यानंतरचा दिवस मात्र खास बर का! कारण 'बळी प्रतिपदा' ह्या दिवशी पाडवा म्हणजे बायकोने नवऱ्याला ओवाळण्याचा आणि नवऱ्याने बायकोला छानशी ओवाळणी देण्याचा दिवस!!   

आणि द्वितीयेला सर्व बहिणींचा आवडता दिवस___ भाऊबीज!!
भाऊबीज
भावाने बहिणीला ओवाळणी देण्याचा हा दिवस. बहिण पण भावाला प्रेमाने घरी बोलावते, त्याला ओवाळते, आणि मग मनासारखी वस्तू ओवाळणी म्हणून घेते!

.
त्यानंतर एकादशीला तुळशीचे लग्न लागले की दिवाळी संपन्न होते!

तुळशी विवाह
 
 

Monday, 28 October 2013

DIWALICHI MAJA AANI MASTI!!!!

दिन दिन दिवाळी!
'दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी.
गाई म्हशी कुणाच्या?
लक्ष्मणाच्या .
लक्ष्मण कुणाचा?
आई बाबांचा!'
असं  म्हणत, फटाके, फराळ आणि पाहुण्यांच्या बरोबर धमाल मस्ती करत दिवाळी  साजरी झाली!

काही दिवसांपूर्वी देव  दिवाळी साजरी झाली, तुळशीचे लग्न लागले, आणि लगेचच पाठोपाठ  घरातली लग्नकार्य हाती घेण्याची लगबग सुरु  झाली! पुढील काही महिने भरपूर मुहूर्त  आहेत, त्यामुळे आता घरात निमंत्रण पत्रिकांचा ओघ वाढणार,(दोन already येउन पडल्या सुध्दा!) आणि सतत लग्नाला जावे लागणार, तिथले जड जेवण जेवावे लागणार! मग काय, acidity वगैरे त्रास उदभवणारच! 

अर्थात, त्रास होतो म्हणून काही कोणी खायचं थांबत नाही ना! आतां चातुर्मास संपला, त्यामुळे strictly non   vegetarian असणाऱ्या मंडळींनी सुटकेचा निःश्वास सोडला   असणार! chicken, mutton वगैरे भरपूर ताव मारून खाल्लं असणार!

अर्थात  मी पण चिकन केलंच  की! ते पण थाई स्टाईल! पण थोड fusion! दही,  मीठ,तिखट, चिकन मसाला, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण,लांब कापलेला कांदा, थोडे तेल आणि हवा असल्यास लाल रंग घालून ३ ते ४ तास चिकन marinate  करून, नंतर तेलावर छान परतून   घेतली. शेवटी, थाई रेड चिली पेस्ट पातळ करून घातली, आणि नीट शिजवून घेतले. कोथिंबीर आणि पुदिना घालून गरम गरम सर्व्ह केलं! मुलीनं ताव मारून खाल्लं की!

नंतर मूगडाळीचा शिरा खाल्ला! खाल्ला म्हणजे काय, फस्त केला!!!!
मूग डाळीचा शिरा
  

DIPAWALI ANANDACHI KARUYAA!

परवा बाजारात गेले होते. बाजाराचे रुपडे पाहून आनंदून गेले! अर्थात प्रत्येक सणाच्या प्रसंगी बाजार असाच  नटलेला असतो म्हणा! दिवाळी निमित्त बाजारपेठ नुसती फुलली होती, शृंगारली होती! रोषणाई, सजावट, आकर्षकपणे मांडलेल्या वस्तू, ग्राहकांना प्रलोभन दाखविणाऱ्या   खरेदीच्या नव्या नव्या आकर्षक योजना, भेटवस्तू, scratch card ,  काय नि काय! अशा वेळी  , 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी!' ह्या म्हणीच्या धरतीवर 'विकणाऱ्याच्या  वस्तू हजारो रे, परी, रिकामे माझे पाकीट रे!'असा  दुबळा विचार मनात येतो, पण क्षणभरच, की पुन्हा आपली shopping  सुरु! असो.

पण ह्या खरेदीच्या धुमश्चक्रीत दीपावली खऱ्या अर्थाने साजरी व्हायची तर राहून जात नाही ना,ह्याचे भान  मात्र ठेवायला हवे आपण सर्वांनी.दीपावलीच्या पाच दिवसांचे आपापले महत्व आहे, त्याप्रमाणे त्या दिवशी आचरण करावे.,थोडी का होईना  काही पूजा अर्चा करावी, आणि मग मजामस्ती! ह्यातूनच आपण आपले संस्कार पुढच्या पिढीला देणार आहोत, ह्याचे भान राहू द्यावे, अन्यथा, संस्कारांच्या रूपाने फक्त 'shop till you drop' एवढेच राहील!

दिवाळीच्या आपल्या घरातील झगमगाटात,   रोषणाईत, फराळाच्या सुगंधात, पाहुण्यांच्या सरबराईत, एकमेकांना शुभेच्छा देण्यात, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत, आणि ह्या सर्व धामधुमीत, थोडा वेळ काढून एखाध्या उपेक्षित तान्हुल्याला काही खेळणं, खाऊ देवून, त्याच्या चेहऱ्यावरचे निर्व्याज्य हसू पहा, किंवा एखाद्या दुःखी जीवाला त्याच्या दुःखद प्रसंगी देखील दोन घटका गोड करून द्या, एखाद्या मुक्या प्राण्याला ताज्या पोळीचा घास घालून पहा,   त्याची आनंदाने गोलगोल फिरणारी शेपटी तुम्हाला किती आनंद देऊन जाईल! ह्यामुळे तुमची दिवाळी  आनंदमय होईलच, आणि त्यांच्या आशीर्वादाने भरभराटीची पण होईल हे नक्की!

दिवाळी अशीच गोड करण्यासाठी एक खास   वडी तुमच्या साठी……

काजूवडी: १ कप मिल्क पावडर, १ कप काजुपुड, ११/२ ते १३/४ कप पिठी साखर, गुलाबी रंग,१/२ कप  बटर,१/२ कप  दूध 

मिल्क पावडर, काजुपुड, पिठी साखर, रंग,बटर  आणि अंदाजाने दूध मिक्स करून pan मध्ये low heat वर शिजत ठेवावे. घटत गोळा झाला, की थापून वड्या कापाव्यात.

हवा असल्यास खवा घालता येतो. १/२ कप मिल्क पावडर कमी करून १/२ कप खवा गुठळ्या मोडून, थोडा भाजून घ्यावा.  

चला, फराळ बनवायचा आहे, तेंव्हा घाई  करायला हवी, नाही का?