1992 च्या ऑगस्टमध्ये हैदराबादला पोस्टिंग झाली, आणि तिथे फक्त ६ महिने राहिलो होतो. पण हैदराबादच्या मुक्कामात खूप मजा आली. आम्ही सिकंदराबाद मध्ये एका भाड्याच्या घरात रहाणार होतो, कारण quarter मिळाले नव्हते. हैदराबाद आणि सिक्न्द्राबाद ह्या ट्विनसिटीज आहेत . आता मजा अशी झाली की, ज्या दिवशी सकाळी आम्ही हैदराबादला पोहोचलो,त्याच दिवशी दुपारी ह्यांना ऑफिस मधून टेलिग्राम मिळाला म्हणून लगेचच तिरुचिरापल्ली (तामिळनाडू ) इथे १ महिन्या साठी जावे लागणार होते. आणि त्याच दिवशी संध्याकाळी निघावे लागणार होते. अजून आमचे ट्रक मधून सामान देखील आले नव्हते! पण इलाज नव्हता. तर जेवण झाल्यावर सन्ध्याकाळी लगेच आम्ही बाहेर पडून जवळचा बाजार वगैरे पाहून आलो. आणि हे लगेच रात्रीच्या गाडीने निघून गेले. आमच्या घराच्या मालकीणबाई आणि वरच्या मजल्या वरचे २ भाडेकरू कुणालाच इंग्लिश किंवा हिंदी विशेष येत नव्हत आणि समजतही नव्हत! पण तरी त्यांनी आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, आणि आम्ही त्यांच्याशी! तेंव्हा 'रोजा' पिक्चर लागला होता, आणि त्या शेजारणीने मला विचारले तुम्ही येणार का? म्हणून! (आणि तिथे तेलगु सिनेमा लागलेला बर का!, हिंदी नाही !) आणि वर म्हणल्या "i tell you no, in english!(अरे देवा!) कठीणच आहे! मी काय म्हणणार? पण नंतर नंतर त्या बायका आणि त्यांच्या मुली आमच्याशी जमेल तस कधी इंग्लिश मध्ये ,कधी खुणेच्या भाषेत, कधी कधी समोर वस्तू दाखवून बोलायला लागल्या ना, तेंव्हा पटलं, की संवाद साधायला भाषाच पाहिजे अस नाही! फक्त एकमेकाचे विचार एकमेकाला पोहोचवता आले पाहिजेत! एक महिन्यात अस झालं की मी आणि त्या बायका सकाळी _ सन्ध्याकाळी एकमेकींशी बोलायचो! आपोआप एक नात निर्माण होत! खूप छान अनुभव होता तो!
तर, सांगत काय होते, की लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर पडले! अर्थात ह्यात नवल काय! मला तर शहर बघायची इच्छा होती, शिवाय भानूची शाळा पण शोधायची होती. मग काय मोटर सायकल घेवून बाहेर पडले! इथे पण नवलाने बघत होतेच! कारण तिथे अजून महिला पारंपारिकच होत्या! पण मजा यायची! २ दिवसात भानूची अडमिशन झाली, आणि तिला मी शाळेत मोटरसायकलवर घेवून जायची, तर शाळेतल्या बायका, मुल पण कुतुहलाने बघायची! ह्याच भानूच्या शाळेत मला एकदा रांगोळी, drawing वगैरेच्या स्पर्धा होत्या, त्यासाठी जज म्हणून पण मला बोलावल होत!
असो, पण गाडी ही माझी लाईफ लाईन होती! नंतर नंतर आम्ही दोघी हैदराबाद शहरात पण जायला लागलो, तिथे पण भरपूर फिरलो! मला हैदराबाद शहर इतक व्यवस्थित माहित झाल की, १ महिन्यानी हे आल्यावर मीच ह्यांना फिरवून, सगळे रस्ते दाखवून दिले!
हैदराबादच्या काही खास रेसेपी खाली देत आहे,,,,
हैदराबादी पुलाव: १ वाटी बासमती तांदूळ १/२ तास आधी धुवून निथळत ठेवावे. आलं ,लसूण, हिरवी मिरची. पुदिना, कोथिंबीर, सर्व एकत्र करून पेस्ट तयार करावी. तेल/तूप ३टेबलस्पून गरम करून दालचिनी,लवंग, ,छोटी वेलची,तमालपत्र, मोठी वेलची, घालून परतावे. नंतर लांब पातळ चिरलेला कांदा घालून परतावा. नंतर हिरवी सिमला मिरची लांब तुकडे, नंतर बीन्सचे लांब तुकडे , आणि मटार घालून परतावे. नंतर तांदूळ घालून परतावेत. वरील हिरवी पेस्ट घालून परतावी. गरम पाणी २ ते २ १/२ वाटी घालून भात मोकळा शिजवावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे . हा पुलाव मिर्च का सालन बरोबर सर्व्ह करावे.
मिर्च का सालन :१/४ वाटी तीळ आणि २ टेबल स्पून खसखस, आणि १/४ वाटी सुक खोबर वेगळ वेगळ थोड्या तेलावर परतू एकत्र पेस्ट करावी. तेल गरम करून मोहरी, मेथी दाणे, जिरे,हळद, हिंग, आणि नंतर आलं _लसूण पेस्ट घलावे परतावे . नंतर पाणी घालुन उकळावे. वरील पेस्ट घालावी.मीठ, चिंच पेस्ट घालावी. शेवटी लांब जाड हिरव्या मिरच्या मध्ये चीर पाडून त्या मिरच्या सोडाव्यात. २ गरम करून कोथिंबीर घालून परोठा, आणि हैदराबादी पुलाव बरोबर सर्व्ह करावे.
शामी कबाब : १ पाव मटन खिमा घ्यावा. १/२ वाटी हरबरा डाळ भिजवून जाडसर वाटावी. तेल गरम करून त्यावर मिरे, जिरे, आलं _लसूण पेस्ट आणि लाल मिरची पेस्ट घालून परतावे. त्यावर खिमा, डाळ घालून , परतावे. कोरडे करावे. बारीक वाटावे. नंतर ही पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, मीठ, तिखट घालून कबाब तळून घ्यावेत. किंवा shallow fry करावेत.
जानेवारी ९३ मध्ये आम्ही पुन्हा देवलालीला पोस्टिंगवर आलो. आणि हे जम्मू काश्मीरला duty वर दीड वर्षा साठी गेले.
तर, सांगत काय होते, की लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर पडले! अर्थात ह्यात नवल काय! मला तर शहर बघायची इच्छा होती, शिवाय भानूची शाळा पण शोधायची होती. मग काय मोटर सायकल घेवून बाहेर पडले! इथे पण नवलाने बघत होतेच! कारण तिथे अजून महिला पारंपारिकच होत्या! पण मजा यायची! २ दिवसात भानूची अडमिशन झाली, आणि तिला मी शाळेत मोटरसायकलवर घेवून जायची, तर शाळेतल्या बायका, मुल पण कुतुहलाने बघायची! ह्याच भानूच्या शाळेत मला एकदा रांगोळी, drawing वगैरेच्या स्पर्धा होत्या, त्यासाठी जज म्हणून पण मला बोलावल होत!
असो, पण गाडी ही माझी लाईफ लाईन होती! नंतर नंतर आम्ही दोघी हैदराबाद शहरात पण जायला लागलो, तिथे पण भरपूर फिरलो! मला हैदराबाद शहर इतक व्यवस्थित माहित झाल की, १ महिन्यानी हे आल्यावर मीच ह्यांना फिरवून, सगळे रस्ते दाखवून दिले!
हैदराबादच्या काही खास रेसेपी खाली देत आहे,,,,
हैदराबादी पुलाव: १ वाटी बासमती तांदूळ १/२ तास आधी धुवून निथळत ठेवावे. आलं ,लसूण, हिरवी मिरची. पुदिना, कोथिंबीर, सर्व एकत्र करून पेस्ट तयार करावी. तेल/तूप ३टेबलस्पून गरम करून दालचिनी,लवंग, ,छोटी वेलची,तमालपत्र, मोठी वेलची, घालून परतावे. नंतर लांब पातळ चिरलेला कांदा घालून परतावा. नंतर हिरवी सिमला मिरची लांब तुकडे, नंतर बीन्सचे लांब तुकडे , आणि मटार घालून परतावे. नंतर तांदूळ घालून परतावेत. वरील हिरवी पेस्ट घालून परतावी. गरम पाणी २ ते २ १/२ वाटी घालून भात मोकळा शिजवावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे . हा पुलाव मिर्च का सालन बरोबर सर्व्ह करावे.
मिर्च का सालन :१/४ वाटी तीळ आणि २ टेबल स्पून खसखस, आणि १/४ वाटी सुक खोबर वेगळ वेगळ थोड्या तेलावर परतू एकत्र पेस्ट करावी. तेल गरम करून मोहरी, मेथी दाणे, जिरे,हळद, हिंग, आणि नंतर आलं _लसूण पेस्ट घलावे परतावे . नंतर पाणी घालुन उकळावे. वरील पेस्ट घालावी.मीठ, चिंच पेस्ट घालावी. शेवटी लांब जाड हिरव्या मिरच्या मध्ये चीर पाडून त्या मिरच्या सोडाव्यात. २ गरम करून कोथिंबीर घालून परोठा, आणि हैदराबादी पुलाव बरोबर सर्व्ह करावे.
शामी कबाब : १ पाव मटन खिमा घ्यावा. १/२ वाटी हरबरा डाळ भिजवून जाडसर वाटावी. तेल गरम करून त्यावर मिरे, जिरे, आलं _लसूण पेस्ट आणि लाल मिरची पेस्ट घालून परतावे. त्यावर खिमा, डाळ घालून , परतावे. कोरडे करावे. बारीक वाटावे. नंतर ही पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, मीठ, तिखट घालून कबाब तळून घ्यावेत. किंवा shallow fry करावेत.
जानेवारी ९३ मध्ये आम्ही पुन्हा देवलालीला पोस्टिंगवर आलो. आणि हे जम्मू काश्मीरला duty वर दीड वर्षा साठी गेले.