Thursday, 23 May 2013

खूप दिवस नानाविध  विचारांमध्ये गेले. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होत. प्रश्न भरपूर होते पण उत्तर एकाही प्रश्नाला नव्हत. अभिषेक १ १ /२  महिन्याचा होता तेंव्हा त्याला मी घरच्यांबरोबर देवदर्शनाला घेवून गेले होते. कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, सर्व करून आलो. गाडीतून जातांना त्याला पूर्ण वेळ हातात वरच्या वर धरून प्रवास केला, त्याला मानेला, पाठीला धक्का बसू नये म्हणून!   शिवाय श्रीनगरहून परत येताना आम्ही वैष्णोदेवीला पण जाऊन  आलो. घोड्यावरून वैष्णोदेवीला जाताना आणि येताना अभिषेकला मी backsack मध्ये घालून अगदी घट्ट  धरून बसले होते, त्याला धक्के बसू नये म्हणून! मी अगदी दमून गेले होते, पण मला त्याचे काहीच वाटले नाही .

तर, ह्या सगळ्यातून मी स्वतः ची   ही समजूत करून घेतली, की तो बहुधा देवदर्शना साठीच आला होता, ते झालं, आणि तो निघून गेला. पण, आज सुद्धा एकही  क्षण असा नाही की त्याचे  नाव   माझ्या  डोक्यात, मनात, नाही, किंवा त्याचा विचार माझ्या मनात नाही.


त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही उपक्रम करते आणि त्याची आठवण ठेवते.कधी लहान मुलांना कपडे, कधी कुणाची शाळेची फी भरणे,  किंवा असे  काहीही ज्यामुळे मला आनंद आणि समाधान दोन्ही मिळेल
.





प्रमोदिनीला माझ्या नंतर एक महिन्यानीच मुलगा  झाला.  आदित्य!. त्यामुळेच की काय, माझा आदित्यवर जास्त जीव आहे, आणि त्याच्या प्रगतीत मी मनातल्या मनात अभिषेकची पण प्रगती बघते.
अभिषेक आणि आदित्य!
.आता आदित्य मोठा झाला आहे. त्याच्याशी बोललं  की छान  वाटत. त्याला बघीतलं की आनंद वाटतो. त्याला काही गिफ्ट दिलं, की मनाला समाधान मिळत!
थोडे मोठे ८ _ ९ महिन्याचे आदित्य आणि अभिषेक !
असो, सगळ दुःख आता मागे टाकले आणि फक्त छान  आठवणी समोर ठेवून पुढे निघाले.  
         .         

No comments:

Post a Comment