एकदा देवांचा दरबार भरला होता, आणी त्यांची वाहने, म्हणजे गणपतीचा उंदीर, सरस्वतीचे वाहन मोर, विष्णूचे गरुड, आणि महादेवाचा नंदी, असे सगळे बाहेर देवांची प्रतीक्षा करीत होते. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या, आणि प्रत्येक जण आपल्या मालकाची स्तुती करीत होता.
![]() |
| महादेवाचा नंदी |
![]() |
| ऋषी नारदमुनी |
हे ऐकून नंदी घाबरला, आणि त्याने देवांची माफी मागितली, पण महादेव काही ऐकेनात. तेंव्हा मग नारद मध्ये पडले, आणि त्यांनी सांगितले की, ' नंदीचे गर्वहरण करण्यासाठीच मी ही चाल खेळली होती. तेंव्हा त्याला उःशाप द्यावा. ' महादेवांनी त्याला सांगितले, ' माझ्या देवळात माझे दर्शन घेण्याआधी भक्त तुझे दर्शन घेतील आणि मगच आत येतील. तसेच, वर्षातून एकदा लोक तुझी पूजा करतील, त्या दिवशी तुला फटके मारणार नाहीत, तर, तुला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतील. ' तेंव्हा पासून, श्रावणी अमावास्येला 'बैलपोळा' सण साजरा करतात. त्या दिवशी बैलांना नटवून, सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते, त्यांना कामाला जुंपले जात नाही, फटके मारले जात नाहीत., आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हा सण शेतकरी वर्गासाठी खास महत्वाचा आहे.
![]() |
| बैलपोळा |
पुरणपोळी करतांना १०० ग्रॅम चण्याची डाळ शिजवून घ्यावी.नंतर त्यात ७५ ग्रॅम गूळ किंवा साखर घालून नीट शिजवावे. पुरणयंत्रातून किंवा स्टीलच्या बारीक जाळीच्या गाळणीतून गाळून घ्यावे. थंड करून, त्यात वेलचीपूड, जायफळपूड घालून मिक्स करावे.
१ कप कणिक आणि १/४ कप मैदा, थोडेसे मीठ, तेल घालून सैलसर मळून घेवून थोड्या वेळ ठेवावी. नंतर छोटी गोळी बनवून, त्यात पुरण भरून, पोळी लाटावी, आणि तव्यावर भाजून घ्यावी.तूप घालून सर्व्ह करावी.
दुसरी पद्धत अशी की, वरील कणकीच्या दोन लाट्या घेवून, दोन छोट्या पोळ्या लाटाव्यात. एकावर थोडे तेल आणि कोरडी कणिक भुरभुरावी, पुरणाचा गोळा नीट पसरावा, दुसरी पोळी वरून ठेवून, कडा बंद कराव्यात. पोळी लाटून, भाजावी.
![]() |
| पुरणपोळी |




No comments:
Post a Comment