Wednesday, 31 August 2016

बैलपोळा...बळीराजाच्या बैलजोडीचा मानाचा दिवस!

बैल पोळा

बैल पोळा च्या सणाचे महत्व शहरातल्या मंडळींना फारसे कळणार नाही, कारण तिथे शेतकरी नाही. मलाही काही वर्षां पूर्वी पर्यंत ह्या सणाचे खरे रूप कळले नव्हते. पण इथे अवतीभवती अशी वस्ती आहे की जे शेतकरी वर्गाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतात प्राणी भरपूर! बैल, गाई, म्हशी, डुकरं, कोंबड्या, कुत्री मांजरी, कधी कधी गाढव, घोडे देखील! ह्या मंडळींच्या घरी बैलपोळा सण साजरा होतांना दिसतो आणि त्याचे महत्व पण कळते.

कधी कधी आपण पालक म्हणून मुलांना एक्दम म्हणून जातो बघा , 'बैल आहेस नुसता' म्हणजे थोडक्यात मठ्ठ, उनाड, बिनकामाचा, बेअक्कल वगैरे वगैरे... पण ज्याने बैल आणि त्याचे योगदान जवळून बघितले किंवा माहित करून घेतले तर तो मात्र असे म्हणणार नाही. म्हणजे मुळात आपल्या मुलाला बैल किंवा कोणताही अपशब्द वापरणे म्हणजे त्याच्या ह्या गुणांची अंशतः जबाबदारी आपलीच असल्याचे मान्य  करण्यासारखे आहे ना? हे  कळलं तर मग कधीही आपण अपशब्द बोलणार नाही  हे नक्की!

तर सांगायचं मुद्दा हा की बैल हा फार मेहनती,  न डगमगता तासांच्या तास कष्ट करणारा प्राणी आहे. कधी आजारी पडला तर शेतकऱ्याच्या जीवाची दैना होते, जीव थोडा थोडा होतो,काम थांबून जाते, पण जेंव्हा बैल  तंदुरुस्त असतो तेंव्हा शेतकऱ्याच्या गळ्यातला ताईत असतो! ह्याच्यावर सर्व शेतीची कामे अवलंबून असतात. त्यामुळेच तो शेतकऱ्याचा मित्र असतो.लाडाने  ढवळ्या पवळ्या, सरजू बिरजू काळू  बाळू, शिरप्या हणम्या आणि आणखीन अशाच छान नावांनी संबोधल्या जाणाऱ्या अशा बहुमोल मित्राचे आभार मानायचा दिवस म्हणजे बैलपोळा!

मग ह्या मित्रासाठी काय करतात? सकाळी बैलाच्या जोडीची पूजा  करतात,त्यांना  ओवाळतात,  पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्याला  आराम असतो  ह्या  दिवशी...त्याचा मनाचा दिवस असतो तो! मग संध्याकाळी त्याला छान सजवून मिरवणूक काढतात...रंगबिरंगी  झूल, गळ्यात रंगीत माळा, शिंगांना रंगरंगोटी करून पायात घुंगरू, रंगीत धाग्याचे तोडे, आणि कपाळी  कुंकवाचा टिळा अशी ही बैलांची जोडी ढोल ताशांच्या गजरात गावात फिरून येते, आणि विश्रांतीनंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने, हा शेतकऱ्याचा मित्र कामाला लागतो!





       

Friday, 26 August 2016

GOD-CONSCIOUSNESS- Way to Eternal bliss!!

I came across an article which I had pasted onto my book's back page. A very interesting article on how to learn to take a back seat, in short lessen your ego and LET GO of things, emotions, hatred, possessions, negative energies which abound in our body, mind, heart, soul and our aura. These negative emotions place unnecessary burdens on our souls and if we do not let them go and harbour all kinds of egos within us for longer than they ought to be within us,and with no respite from such feelings, ther is more hatred, bad blood and yet more hatred. We are slowly killing ourselves and our souls will not rest in peace anytime soon. Its written by  Sadhu Vishwamurtidas.


LEARNING TO TAKE A BACK SEAT 

Some people are compulsive exhibitionists. You can find them almost everywhere, they would do anything to get noticed. At a weddding, they want to be the bride and at a funeral, the corpse.

Julius Caesar, who was an incorrigible egotist, was kidnapped when he was a child. He was held for a ransom of 11,000 gold pieces. Horrified, he exhorted his captors to raise the ransom amount to 2,50,000 gold pieces so as to preserve his prestige!

William Shakespeare said; "Praises are my wages." Agreed American writer Mark Twain. "I can live an entire week on compliments alone." More recently, musician Elton John said; 'Even if I had only a single finger left, I would play the piano to be loved.'

There are very few people who don't like to be the centre of attraction. They are the ones who are able to derive their nourishment from within. They are the true giants of humanity; the others are insignificant.

It is said that a famous boxer once refused to tie his seat-belt aboard a plane. "Superman doesn't need a belt." Tying his belt for him, the airhostess replied,"Superman doesn't need a plane either."

The truly great are those who know their weaknesses and aren't afraid to admit them. They accept their limitations and blend with the  crowd because they know that when it comes to the basics, everyone is the same.

Whether rich or poor, American, Afghan or Indian, we all have the same emotions deep within us- to protect the family, educate children, provide for healthcare, to be free to walk the streets in safety, to have time for oneself, to contribute to the good of the world and to leave one's mark, however small, on history. And the last is something all human beings do-for better or for worse. Even an ant does not go through this world without affecting its outcome in some way.

 From the worldly perspective, humility can be imbibed by realising that the population of the planet is six billion. If there was only one person on earth, he would have all the rights of law, legislation, amendment and ownership.

Today, six billion people share equal rights - that is just one six billionth rights per person! Yet, unable to come to terms with this reality, some people behave as though they are the owners of the planet.

They are unable to take a back seat in any subject. They demand to be consulted before any decisions are made. They demand to be glorified and welcomed at every meeting. To sustain their narcissitic belifs, some can go to the extend of humiliating others under any banner or disguise, whether it be religion, country or justice or anything else.

God-consciousness is the permanent cure for ego-mania. Ego usually translates into 'he-go' or 'she-go' With God-consiousness, it transforms into 'I-go'. Explains Lord Swaminarayan: "When one realises the infinite greatness and glory of God, where is there any room for self-pride?"







S

Thursday, 25 August 2016

गोविंदा आला रे आला!!!


 आज गोपाळकाला, आणि दही हंडी फोडण्याची धावपळ! कृष्णाला आवडणारा गोपाळकाला बनवायला   सोप्पा, रुचकर आणि पौष्टिक देखील! गोपालकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत रानात गाई चरायला न्यायचा, मग एकत्र बसून खायचे.  तर प्रत्येक गोपालाची जशी परिस्थिती, तशी न्याहारी त्याच्या शिदोरीत असायची. पण मग उच्च नीच, गरीब श्रीमंत, असे कोणतेही भेद राहिले तर इतर गोपाळांना वाईट वाटते. म्हणून मग हा भेदभाव दूर करण्यासाठी सर्वांची शिदोरी एकत्र करून मग सगळे गोपाळ त्या काल्याचा आस्वाद घ्यायचे! तो कला किती चविष्ट लागत असेल ह्याचा  अंदाज हा गोपाळकाला  खाल्ल्यानंतरच येईल!

 गोपींच्या घर जाऊन, मटकी फोडून दही, लोणी, दूध खायचं, बाळगोपाळांना  वाटायचं हा कृष्णाचा आवडता छंद! गोपींना द्वारकेबाहेर दूध, दही, लोणी विकायला कृष्णाची  बंदी होती . मग वाटेत  त्यांची मटकी फोडून बालगोपाळ  सर्व काही खाऊन घेत असतं! पण ह्यामागचा मोठा हेतू लक्षात  घेण्यासारखा आहे. आपल्या मुलाबाळांना,  किंवा आपल्या शहरातल्या लोकांना पुरेसे दूध,दही न देता  बाहेरच्यांना विकायचे हे कृष्णाला मान्यच नव्हते. म्हणून हा खटाटोप! मॅनेजमेंटचा हा फ़ंडा आजही लागू होतो, नाही का? स्वतःच्या जिल्ह्याचे पाणी कमी करून दुसऱ्या जिल्ह्याला द्यायचे, किंवा आणखीन पुढे जाऊन   सांगायचे तर आपल्या देशात पिकणारी उत्तम दर्जाची फळफळावळ, भाजीपाला हे परदेशात पाठवायचे, आणि इथे निकृष्ट दर्जाचे विकायला ठेवायचे.

इथे एक चातुर्मासातली गोष्ट आठवते आहे... एका राज्याचा राजा मोठा शिवभक्त होता. एकदा त्याच्या मनात आले, की महादेवाचा गाभारा दुधाने भरावा. पण हे कसं  व्हावं? प्रधानाने सुचविले की नगरातील प्रत्येक   घरातून सर्वच्या सर्व दूध ह्या गाभाऱ्यात  ओतले जावे . झालं...  सगळ्या लोकांनी दूध आणायला सुरुवात केली . सर्व दूध ओतलं , पण गाभारा काही भरेना. शेवटी एक म्हातारी  आली,छोट्या तांब्यात दूध भरून आणले होते ते तिने गाभाऱ्यात भरले, आणि काय चमत्कार! गाभारा दुधाने तुडुंब भरला की!

राजाला आश्चर्य वाटलं!  विचारलंच की हा चमत्कार कसा झाला. म्हातारी म्हणाली... अरे राजा तुझा आदेश झाला आणि सगळ्या लोकांनी घरातल्या मुलाबाळांच्या, लहान मोठ्यांच्या, म्हाताऱ्या कोताऱ्याच्या तोंडचे दूध  गाभाऱ्यात  आणून ओतले,  त्या सर्वांची, गाई वासरांची हाय तुला  लागली,आणि असे करणे हे देवाला आवडले   नाही...  

मी काय केले? घरचं  काम आटोपलं, मुलाबाळांना खाऊ पिऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा दिला ,त्यांना तृप्त केलं. मग मी हातात  फुलं,अक्षता,बेल आणि खुलभर दूध घेऊन इकडे आले, आणि  गाभाऱ्यात दूध ओतल्या बरोबर गाभारा भरला! बाकी काही नाही.

आजकाल दहीहंडी हे एक राजकारणाचे, व्यापाराचे, अहमिकेचे, वर्चस्व सिधद करण्याचे, थोडक्यात मसल पॉवर दाखवायचे मोठे व्यासपीठच बनले आहे.. श्रीकृष्णाने दही हंडी रचून दूध लोणी खाऊन मुलांसाठी एक खेळ म्हणून त्याचा वापरकेला . एक चेष्टा मस्करी करण्याचे साधन . त्यात कुणाचेही नुकसान नाही, अवहेलना नाही, वर्चस्व सिधद करण्याची अहमिका नाही...होता फक्त विरंगुळा आणि बालिश चेष्टा! आता तर दही हंडीचे प्रकरण थेट कोर्टातच गेले आहे...काय म्हणावे ह्याला? होतं काय, झालं काय? कुणी विचार करतोय का?

 माणसांचे मनोरे रचून  दही हंडीवर केलेला कब्जा ह्यातून श्रीकृष्णानी कदाचित असे दाखवले असावे की मनुष्याने नवविधा भक्तीतून, अष्टांग योगसाधनेतून पुढे जात, साता जन्माच्या  पलीकडे जाणारी वाट धारावी. ह्यासाठी षडरिपू  म्हणजे काम,क्रोध,लोभ, मद , मोह ,मत्सर ह्या सहा दुर्गुणांवर मात  करीत,पंचेंद्रियांना वंश करीत, चौफेर उधळलेले मनाचे दोर  आवळून ,सत्व रज आणि तम ह्या त्रिगुणांच्या पलीकडे  जाऊन, ज्ञान आणि वैराग्य ह्या दोहोंची कास धरीत आत्मज्ञान  मिळवावे,आणि शेवटी अहंकार रुपी हंडी फोडून, त्यातील लोणीरूपी परमात्म्याशी एकरूप होऊन सायोज्यमुक्ती मिळवावी.

तर समाजाने ह्या दही हंडीच्या ओंगळ, बीभत्स आणि प्रसंगी घातक,जिवघेणा किंवा त्याहूनही क्लेशलकारक असे अपंगत्व आणि लाचारी ओढवून आणणाऱ्या स्वरूपाचे पुनरावलोकन करून, पुन्हा  ह्या खेळाला  आनंदाचे रूप बहाल करावे. ह्या सर्वांसाठी मिळणाऱ्या निधीचा समाजोपयोगी कार्यात उपयोग करावा हा निर्धार केला तर काहीच अशक्य नाही.

असो. आता थोडे अवांतर . म्हणजे आज श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून पंचामृताचे घारगे केले   होते.
पंचामृताचे घारगे
 त्यासाठी : १/२ वाटी दूध, २ टेबलस्पून दही, २ टेबलस्पून  मध, १ टेबलस्पून तूप, २ टेबलस्पून  साखर सर्व एकत्र करून,त्यात थोडी वेलची पावडर घालावी. त्यात बसेल एवढी कणीक घालून घट्टसर भिजवावे.  हळदीच्या किंवा केळीच्या पानावर पातळसर  थापून,दुसरे त्यावर दुमडून तव्यावर शेकावे. नंतर पान  काढून तूप घालून खरपूस भाजून घ्यावे. साजूक तूप आणि लोणच्यासोबत गरम गरम वाढावे..

Wednesday, 24 August 2016

कृष्णजन्माष्टमी... बालपण नव्याने अनुभवण्याची एक संधी!!




आज कृष्णजन्माष्टमी! कृष्णाचा जन्मदिवस! बर्थडे!
 आपली गम्मत हो! आजकाल सगळं इंग्लिश मध्ये सांगावं लागतं, नाहीतर पूर्ण समजत नाही! असो, तर आज रात्री अनेक  ठिकाणी कृष्णजन्म साजरा केला जातो. कृष्णाचा पाळणा सजवून, त्याला झोका द्यायचा, श्रीकृष्णाचा  जन्म झाल्याचा आनंदोत्सव साजरा करायचा. आज कृष्णाला  लोण्याचा नैवेद्य  दाखवायचा,दिवसभर उपवास करायचा, रात्री भजनकीर्तन करीत रात्र  जगवायची, दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा.

हे सर्व झाले, पण मुख्य श्रीकृष्णाची लीला  साध्या सोप्या शब्दात  कळली  पाहिजे. श्रीकृष्णाची अनेक रूपे आहेत... नटखट बालक, सुमधुर बासरी वादन करून सर्वांना मंत्रमुग्ध करणारा   कलाकार ,गीतेतून तत्वज्ञान आणि जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा तत्वज्ञ, रणभूमीवर अर्जुनाचे सारथ्य करणारा, त्याला गीता आणि त्यातला अभिप्रेत असलेला   कर्मयोग योग्य तऱ्हेने सम्पन्न करायला प्रवृत्त करणारा रणधुरंधर, नीतिशास्त्राला अनुसरून , आणि  बहुतेक वेळा मनुष्य स्वभावानुसार डावपेच खेळत बाजी तर मारणारच , पण त्यासोबत समोरच्या व्यक्तीला आपला असीम भक्त ही  बनवणारच पण त्याला  त्याच्या पापांपासून मुक्त करून मोक्ष   प्राप्त करून   देणारा  चतुर, चाणाक्ष राजकारणी, कुशल  व्यूहरचनाकार, नीतिज्ञ, बालगोपाळांचा, गोपींचा, आणि विशेष करून राधेचा हा सखा... ही  आणि आणखी  बरीच काही रूपे! ज्याला तो जसा दिसतो,त्याला तो त्या स्वरूपात भावतो!

अतुल्य शौर्य, धैर्य, बुद्धिमत्ता, निःस्पृहता, स्थितप्रज्ञ, तपस्वी,  अलौकिक वक्ता, आणि कर्मसिद्धान्त सांगणारा तरीही अलिप्त राहणारा असा हा श्रीकृष्ण... आत्ताच वृत्तपत्रात वाचलेले लेख आणि त्यातील लेखकांनी नमूद केलेले श्रीकृष्णाचे गुण...जे त्यांना भावले ते त्यांनी लिहिले!

सुदाम्याचे पोहे  आणि बालगोपाळांनी आणलेला खाऊ एकत्र करून गोपाळकाला खाऊन समानतेचे धडे देणारा, कालियामर्दन करून दुष्ट प्रवृत्तींना आळा  घालणारा, अहंकार आणि लालसा हे दुर्गुण आहेत त्यांना लांब ठेवा असा संदेश देणारा, सत्यवचनी असा हा कृष्ण!

उत्तम व्यवस्थापन कौशल्य श्रीकृष्णाचा आणखीन एक गुण! योग्य निर्णय घेणे आणि त्यांची  अंमलबजावणी करणे हे शिकण्यासारखे आहे.

मला विशेष आवडलेला भाव म्हणजे श्रीकृष्णाचा लढाऊबाणा! ह्याच लेखात पुढे वीरचक्र विजेते कर्नल. साळुंखे लिहितात की, वेगवेगळ्या व्यूहरचना करून शत्रूंचा नाश केलेल्या ह्या लढवय्याच्या अनेक रणनीती भारतीय सैन्याने देखील अंगिकारल्या आहेत, ज्यायोगे अनेक वेळा शत्रूला नामोहरम केले आहे.अवघ्या ५८ भारतीय  सैनिकांनी दोन हजाराहून अधिक संख्येने आलेल्या शत्रूला नामोहरम केले होते. अर्थात असे अनेक किस्से आहेत भारतीय सैन्याचे.. पण मग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील पुढे जायचे ह्या श्रीकृष्णाच्या सिद्धान्तावरच तर सैन्याला प्रशिक्षण दिले जाते. त्याचाच  हा परिणाम असतो! 'आगे बढो' हाच मंत्र  भारतीय सैनिकांनी  जपला आहे असे देखील साळुंखे आपल्या लेखात म्हणतात.

पण श्रीकृष्ण म्हटला की क्षणात डोळ्यासमोर छबी उभी राहते   ती गोपाळकृष्णाची... लोणी खाणारा नटखट छोटा कृष्ण! हीच छबी जास्त लोकप्रिय आहे. आणि असावी पण. कारण इतर अनेक गुणांसोबतच जीवनात थोडे बाल्य हवे, नाहीतर मग आपल्या जगण्यातली   निरागसता, हसू, आणि गोडवा निघून जाईल...राहील ते निरस, कंटाळवाणे आयुष्य.. उगीच जगायचं म्हणून जगायचं   झाल ... म्हणूनच कदाचित प्रत्येक घरातील देव्हाऱ्यात लंगड्या बाळकृष्णाचा टाक किंवा मूर्ती असते... घरात लहान   मुलांच्या रूपाने बालपणाचे चैतन्य आणि नखळ आनंद सदैव राहो हीच त्यामागची भावना असावी!

 

Friday, 19 August 2016

उत्तम शिष्य... आणि एकलव्य सुद्धा!

 
गुरु शिष्य संवाद

गुरु कसा असावा हे कळलं, पण गुरु उत्तम हवा तर मग आपणदेखील शिष्य  म्हणून उत्तमच असायला हवे , नाही का? मग उत्तम गुरु आपला उत्तम शिष्य कसा ओळखणार? किंबहुना आपण ज्या गुरुकडे विद्या ग्रहण करणार आहोत, त्यांचे शिष्य जसे असावेत तसे आपण आहोत का? ह्याचा विचार व्हायला हवा.

शिष्याचे ध्येय निश्चित  पाहिजे.  ध्येयपूर्ती साठी उचित  बुद्धिमत्ता, त्या अभ्यासाची रुची, कुशाग्र ग्रहणशक्ती आणि त्यासोबतच कष्ट, चिकाटी आणि मेहनत घेणे पण तितकेच जरुरी आहे. आणि हे सर्व असले तरी आपल्या गुरूंवर अनन्य भक्ती आणि सम्पूर्ण  श्रद्धा हवी, म्हणजे मग विद्या संपादनात आणखी गती येते गुरूंवर पूर्ण विश्वास असला म्हणजे मग शिष्याचा स्नेह आणि प्रेम पाहून गुरु समाधान पावतो हे नक्कीच. आपला शिष्य हा आपल्या पुढे प्रगती करतो आहे, आपल्या पेक्षा जास्त चांगले काम करतो आहे ह्यासारखे समाधान गुरूंना  दुसरे नाही. गुरु शिकवायला तयार असतात, पण शिष्य जर शिकायला तयार नसेल तर मग अशा शिष्याचा काय उपयोग?

अर्थात, गुरूंनी नाकारल्या नंतरही, केवळ ' हाच गुरु हवा' म्हणून, त्यांची प्रतिमा समोर ठेवून विद्या संपादन करणारा एकलव्य घडलाच  की! पण मग त्याची अपार निष्ठा कामी आली हे सत्य आहे. असे अनेक एकलव्य  असतात, पण गुरूंचे महत्व अनन्यसाधारण आहे हे नक्की.


आजकाल शिक्षणाचा बाजार झाला आहे. त्याला इलाज नाही, कारण वाढती लोकसंख्या,घटणारी साधनसंपत्ती, भ्रष्टाचार,अनाचार, आणि उत्तम विचारांची, चांगल्या माणसांची, दर्जेदार मूल्यांची पायमल्ली! तरीसुद्धा ज्याला कोणतीही गोष्ट साध्य करायची असते, तो अनेकानेक संकटांना सामोरे जात यश सम्पादन करतोच! आजच्याच olympics  चे उदाहरण घ्या ना... निकृष्ट दर्जाची साधन सामग्री, चांगल्या मार्गदर्शकांचा अभाव, आणि असे चांगले मार्गदर्शक असूनही राजकारणाचे बळी, खेळाडू निवडीतील राजकारण, कमकुवत नियमावली, कमकुवत राज्य व्यवस्था आणि नियोजनाचा अभाव...आपल्या खळाडूंच्या निकृष्ट दर्जाच्या परफॉर्मन्सला कारणीभूत आहेत आणि तरी सुद्धा ह्या सर्वांवर मात करून काही खेळाडू निव्वळ आपल्या जिद्दीवर पदक मिळवून आणतात! अशी जिद्द असेल तर काय असाध्य आहे, बोला?  अशा शिष्यांना, अशा गुरूंना, आणि अशा एकलव्यांना माझे प्रणाम!  




Thursday, 18 August 2016

गुरुविण मुक्ती नाही!






 'गुरुविरहित असो नये ।नीच यातीचा गुरु करो नये। '


 गुरु शिवाय ज्ञान  नाही...   ज्ञाना शिवाय  भक्ती नाही, भक्तीशिवाय वैराग्य नाही आणि वैराग्याशिवाय  मुक्ती नाही. तर सायोज्य मुक्ती कडे नेणारा, वाट दाखवणारा सद्गुरूच असतो.  आयुष्यात गुरु अनेक असतात. आई वडील, शिक्षक, आपल्या कार्यक्षेत्रातील आपले सिनियर्स, असे इतर अनेक लोक ज्यांच्या कडून  आपण कोणतीही जीवनोपयोगी कला शिकतो  ते सर्व लोक आपले त्या क्षेत्रातले गुरु असतात. आणि आपण निःसंकोचपणे   त्यांचे योगदान मान्य  केले पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण हे ऋण मनातच नाही. संकोच  असेल किंवा  ते गुरु आहेत ह्याबाबत अज्ञान असेल, किंवा हे मान्यच नाही करायचे असे असेल तर मग हे आपल्या गुरूला  सांगायचे राहूनच  जाते. पण असे होऊ देऊ नये. कधीतरी गुरूला नमन करून त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान मान्य  करावे, त्याला वंदन करावे. म्हणून गुरु पौर्णिमेला गुरूंना वंदन करण्याची प्रथा आहे.

मी तर अनेक वेळा लहान मुलांकडून देखील काही शिकले  आहे. कधी कधी  येणारा एखादा प्रसंग  देखील आपल्याला काहीतरी शिकवून जातो ,  तर तो प्रसंग  देखील आपला गुरु बरं!  एखादा सिनेमा, नाटक, एखादे दृश्य, एखादी जीवाचा ठाव घेणारी घटना, अशा अनेक गोष्टीं मधून काही ना काही शिकायला मिळतं! तर कधी कधी एखाद्या आपत्तीमध्ये आपल्याला एक संधी चालून येते.. ती आपत्ती म्हणजे देखील गुरूच की!

तर गुरु कसा ओळखावा?  शास्त्रात लिहिल्या प्रमाणे, ज्यात्या शास्त्रातला गुरु हा सर्व ज्ञान सम्पन्न असावा, त्याच्यात  अहंकार,असूया,मानसिक विकृती, क्रोध नसावा, तो दृढवृत्तीचा  आणि निरपेक्ष असावा, स्वतः कर्तृत्ववान असला तरी गर्व नसावा. आणि  योग्य शिष्य ओळखण्याची अपार  क्षमता गुरुमध्ये हवी. तरच एक उत्तम गुरु एक उत्तम शिष्य घडवू शकतो.  उत्तम शास्त्र जरी  निवडले,तरी उत्तम गुरु नाही मिळाला तर उत्तम फलप्राप्ती म्हणजे ज्ञानर्जन होत नाही आणि मग जीवनात उत्तम प्रगती होणे नाही. समर्थांनी म्हटल्या प्रमाणे, नीच यातीतील म्हणजे नीच कुळातला, किंवा अयोग्य माणूस  गुरु करू नये.

आपल्याला ज्ञान आणि मनःशांती देणाऱ्या गुरूंना त्रिवार वंदन!      



Wednesday, 17 August 2016

राखी आणि रक्षा बंधन


'मेरे भैय्या, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन
तेरे बदले मैं जमानेकी कोई चीज न लूं ।'

 मंडळी, उद्या राखी पौर्णिमा! म्हणजे सर्व बहिणींना आपल्या भावांची आठवण होणार! नाही म्हणजे आठवण व्हायला विसरतात थोडीच बहिणी आपल्या भावांना? पण ह्या दिवसाची विशेष आठवण असते हो बहिणीला! नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा दोन गोष्टी ह्या दिवशी.

श्रावण महिन्यात मध्यावर  येणारी नारळी पौर्णिमा... ह्या दिवशीचे शास्त्रीय महत्व म्हणजे   ह्या दिवशी   जलतत्वाची पूजा करायची.. म्हणजे सृष्टीत ओलावा,स्नेह टिकून रहवा म्हणून जलाची पूजा. शिवाय ह्या दिवसात समुद्र खवळलेला असतो, म्हणून त्याला नारळ वाहून,त्याचे पूजन करून त्याला शांत करणे हा देखील यामागचा हेतू होय. कोळी  लोकांचा हा महत्वाचा सण कारण त्यांचे जीवनच मुळी ह्या समुद्रावर आणि त्याच्या लहरींवर(पाण्याच्या आणि समुद्राच्या स्वभावाच्या दोन्ही) अवलंबून !नारळ रसधातू वाढवतो, तहान भागवतो, वात आणि पित्त दोषांचे शमन करतो.  म्हणून त्याचे ह्या पावसाळ्यातले महत्व. जेवणात, नैवेद्यात नारळाचा पुरेपूर वापर ह्या चातुर्मासात होतांना दिसतो तो ह्या कारणानेच.आणि नारळाचे पीक होतेच मुळी 'आनूप देशात' म्हणजे भरपूर पाणी असलेल्या देशात! नारळीभात केला जातो राखी पौर्णिमेला ते ह्याच साठी.

तर राखी ही  मूलतः नाजूक, रेशीम धाग्याची असायची, कारण रेशीम हे घट्ट विणीचे, म्हणून बहीण भावातील नाजूक नात्यात स्नेह देखील घट्ट राहावा ही भावना.

हे झाले राखी बांधणे. परंतु त्यामागची रक्षणाची भावना देखील योग्य रीतीने समजून घेतली पाहिजे. संरक्षण  म्हणजे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक संरक्षण, विचारांचे कोंदण करून दिलेले संरक्षण  हे देखील महत्वाचे आहे. हा सण  कुटुंबातल्या सर्व सदस्यां मधील  स्नेह टिकवून ठेवण्याची जणू आपल्याला आठवण करून देतो. एकमेकांचे रक्षण करू, एकमेकांना अडीअडचणीत साथ  करू, वाट चुकली असेल त्याला समजुतीने योग्य वाटेवर आणू, असे वचनच जणू ही राखी आपल्याकडून मागते!

सर्व कुटुंबाला, आणि पर्यायाने समाजाला स्नेहाच्या बंधनात बांधू शकते   ही राखी!

 सध्या पावसाळा आहे, भाज्या अनेक आहेत, तेंव्हा ह्या भाज्या वापरून एक डिश करूयात! आजकाल डाएट चा जमाना आहे तर करूयात डाएट पोहे....
डाएट पोहे:

१ वाटी जाडे पोहे ५ मिनिटांसाठी भिजवून ठेवावेत. सिमला मिरची,गाजर,कोबी, फ्लॉवर,अशा मिक्स भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. एका बाऊल मध्ये भाज्या, पोहे,  मीठ, साखर, कोथिंबीर, चाट मसाला, भाजलेले किंवा तळलेले  दाणे, फुटण्याचे डाळे, आणि लिंबाचा रस घालून सर्व्ह करावेत डाएट पोहे.