तर, लखनौ बद्दल सांगत होते ना! उन्हाळ्यात तशी मजा तर थंडीची वेगळीच मजा!थंडीत 'कोहरा ' म्हणजे काय असते ते अनुभवायला मिळालं . म्हणजे डोळ्या समोर धुके आलेले पाहिलं आहे!थंडीतली उडालेली तारांबळ तुम्ही मागच्या लेखात वाचलीच ना! पण तरी, थंडीत सकाळी अकरा च्या सुमारास बाजारात जायचं! आहाहा! ठराविक मिठाईच्या दुकानांसमोर जमलेली गर्दी बघायची.
गर्दी कशा साठी ? तर, भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेला गरमा गरम गाजर का हलवा, वर्ख लावलेले गुलाबजामून, जलेबी, असे गोड पदार्थ,
किंवा मग कचौडी, पाकौडे, पुरी _सब्झी ह्या तिखट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी!आणि घरी पार्सल नेण्यासाठी! बघा, पुन्हा तोंडाला पाणी सुटले!ही अशी दृश्य आहेत जी "they are etched in my mind forever!मी कधी उदास वगैरे झाले, तर अशी दृश्य मनात आठवते, म्हणजे हसू पण येत आणि फ्रेश पण वाटत!
म्हणजे उन्हाळ्यात संध्याकाळी आणि थंडीत सकाळी हे बाजार गच्च भरलेले असतात! तिथे सलवार कुडता एकसे एक शिवून मिळतात!आणि बायका, मुली, कुणीही पहा, अगदी डोक्या पासून पाया पर्यंत matching करणार आणि मगच बाहेर पडणार! थंडीत तर, ड्रेस किंवा साडी बरोबर शाल, स्वेटर बरोबर match झाली पाहिजे! आणि दुपट्टा घ्यायची style वा!वा !शाल एका खंद्या वर घ्यायची style वा!म्हणजे महिला कोणत्याही सामाजिक, आर्थिक, धाटणीतली असो, नखशिखांत मेकअप आणिक कपडे!छानशौकी जे म्हणतात ते हे!मला तर वाटत त्यांच्या रक्तातच गुण असावा!मागे सांगितले तसे,सायकल रिक्षा मधून गेलं तरी हाच नखरा!तोच attitude!तोच तोरा! कारण सायकल रिक्षा हेच साधन. पण आता आणखी गम्मत अशी की, सामान्य वजनाची २ माणसं बसतील एवढी सीट असलेल्या सायकल रिक्षात किती जणांनी,आणि कसं बसावं ?ह्याला काही मर्यादा? बिलकूल नाही!
८० ते ९० किलो वजनाच्या जाडजूड २ बायका मेन सीटवर हं. मेनसीटच्या समोर १ फूट रुंदीच्या फाट्यावर ३ मुलं किंवा २ मोठी माणस बसणार, आणि रिक्षाच्या मागच्या बाजूला पण खाली आणखीन एक पट्टा, त्यावर पण २_३ मुलं बसू शकतात! म्हणजे बघा? आणि बरोबर सामान असणारच, ते वेगळ हं !ही जत्रा बाजारातून निवांत चाललेली असते. आता कदाचित हसू येईल हे वाचतांना, पण हे दृश्य जेंव्हा बघतो तेंव्हा हसू तर नाहीच येत,उलट , त्या काटकुट्या रिक्षा वाल्याची होणारी दमछाक आणि पोटासाठी, ते ओझं वाहून नेण्याची त्याची केविलवाणी धडपड बघून डोळ्यात पाणीच येत. हे आठवून सुद्धा डोळ्यात पाणी आलं.
आणि हो, एवढी मोठी जत्रा ओढून नेण्या साठी रिक्षावाल्याने मागितलेले पैसे द्यायला मात्र कुरकुर करणार, हुज्जत घालणार आणि दीडदमडी त्याच्या हातावर टेकवून निघून जाणार, परत "आम्ही तुझ्यावर उपकारच केलेत एवढे पैसे दिले ते!"हा भाव चेहऱ्यावर! हे मी स्वतः पाहिलंय म्हणून सांगते आहे. आणि आम्ही? २० रुपये झाले तर ३० देतो!
तर आणखी काही किस्से नंतर. पण मूड बदलण्यासाठी काही छान लखनवी रेसिपी:
दहीवाले आलू: तेलावर मोहरी,हिरवी मिरची, कढीपत्ता, आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतणे. बटाट्याचे मोठे तुकडे घालून परतणे.मीठ, तिखट, हळद घालून नंतर दही घालून नित परतावे. लिंबू रस, घालून वाढावे.
कैरीचे लोणचे: १ किलो कैरीचे मोठे तुकडे करून ३ ते ४ तास उन्हात वाळवावेत. थंड करून घ्यावेत . १/ २ किलो मोहरीचे तेल गरम करून हिंग घालून थंड करून घ्यावे. आता मसाला बनवावा_ १ tbsp मेथी दाणे तळून, १ tbsp बडीशोप भाजून पूड, १ tbsp मीठ, १ tbsp हळद,१ tbsp कलौंजी (कांद्याचे बी)भाजून पूड,१ tsp हिंग, सर्व एकत्र करावे. आता कैरीच्या फोडी, मसाला, तेल, आणि १ tbsp acetic acid सर्व एकत्र करून नीट कालवून लोणचे भरून ठेवावे.
![]() |
| खवैये खवैये मंडळी जमा झाली! |
![]() |
| छप्पनभोग मिठाई चे दुकान |
गर्दी कशा साठी ? तर, भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेला गरमा गरम गाजर का हलवा, वर्ख लावलेले गुलाबजामून, जलेबी, असे गोड पदार्थ,
किंवा मग कचौडी, पाकौडे, पुरी _सब्झी ह्या तिखट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी!आणि घरी पार्सल नेण्यासाठी! बघा, पुन्हा तोंडाला पाणी सुटले!ही अशी दृश्य आहेत जी "they are etched in my mind forever!मी कधी उदास वगैरे झाले, तर अशी दृश्य मनात आठवते, म्हणजे हसू पण येत आणि फ्रेश पण वाटत!
म्हणजे उन्हाळ्यात संध्याकाळी आणि थंडीत सकाळी हे बाजार गच्च भरलेले असतात! तिथे सलवार कुडता एकसे एक शिवून मिळतात!आणि बायका, मुली, कुणीही पहा, अगदी डोक्या पासून पाया पर्यंत matching करणार आणि मगच बाहेर पडणार! थंडीत तर, ड्रेस किंवा साडी बरोबर शाल, स्वेटर बरोबर match झाली पाहिजे! आणि दुपट्टा घ्यायची style वा!वा !शाल एका खंद्या वर घ्यायची style वा!म्हणजे महिला कोणत्याही सामाजिक, आर्थिक, धाटणीतली असो, नखशिखांत मेकअप आणिक कपडे!छानशौकी जे म्हणतात ते हे!मला तर वाटत त्यांच्या रक्तातच गुण असावा!मागे सांगितले तसे,सायकल रिक्षा मधून गेलं तरी हाच नखरा!तोच attitude!तोच तोरा! कारण सायकल रिक्षा हेच साधन. पण आता आणखी गम्मत अशी की, सामान्य वजनाची २ माणसं बसतील एवढी सीट असलेल्या सायकल रिक्षात किती जणांनी,आणि कसं बसावं ?ह्याला काही मर्यादा? बिलकूल नाही!
८० ते ९० किलो वजनाच्या जाडजूड २ बायका मेन सीटवर हं. मेनसीटच्या समोर १ फूट रुंदीच्या फाट्यावर ३ मुलं किंवा २ मोठी माणस बसणार, आणि रिक्षाच्या मागच्या बाजूला पण खाली आणखीन एक पट्टा, त्यावर पण २_३ मुलं बसू शकतात! म्हणजे बघा? आणि बरोबर सामान असणारच, ते वेगळ हं !ही जत्रा बाजारातून निवांत चाललेली असते. आता कदाचित हसू येईल हे वाचतांना, पण हे दृश्य जेंव्हा बघतो तेंव्हा हसू तर नाहीच येत,उलट , त्या काटकुट्या रिक्षा वाल्याची होणारी दमछाक आणि पोटासाठी, ते ओझं वाहून नेण्याची त्याची केविलवाणी धडपड बघून डोळ्यात पाणीच येत. हे आठवून सुद्धा डोळ्यात पाणी आलं.
आणि हो, एवढी मोठी जत्रा ओढून नेण्या साठी रिक्षावाल्याने मागितलेले पैसे द्यायला मात्र कुरकुर करणार, हुज्जत घालणार आणि दीडदमडी त्याच्या हातावर टेकवून निघून जाणार, परत "आम्ही तुझ्यावर उपकारच केलेत एवढे पैसे दिले ते!"हा भाव चेहऱ्यावर! हे मी स्वतः पाहिलंय म्हणून सांगते आहे. आणि आम्ही? २० रुपये झाले तर ३० देतो!
तर आणखी काही किस्से नंतर. पण मूड बदलण्यासाठी काही छान लखनवी रेसिपी:
दहीवाले आलू: तेलावर मोहरी,हिरवी मिरची, कढीपत्ता, आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतणे. बटाट्याचे मोठे तुकडे घालून परतणे.मीठ, तिखट, हळद घालून नंतर दही घालून नित परतावे. लिंबू रस, घालून वाढावे.
कैरीचे लोणचे: १ किलो कैरीचे मोठे तुकडे करून ३ ते ४ तास उन्हात वाळवावेत. थंड करून घ्यावेत . १/ २ किलो मोहरीचे तेल गरम करून हिंग घालून थंड करून घ्यावे. आता मसाला बनवावा_ १ tbsp मेथी दाणे तळून, १ tbsp बडीशोप भाजून पूड, १ tbsp मीठ, १ tbsp हळद,१ tbsp कलौंजी (कांद्याचे बी)भाजून पूड,१ tsp हिंग, सर्व एकत्र करावे. आता कैरीच्या फोडी, मसाला, तेल, आणि १ tbsp acetic acid सर्व एकत्र करून नीट कालवून लोणचे भरून ठेवावे.








No comments:
Post a Comment