Wednesday, 20 August 2014

श्रवणाची सार्थकता प्रत्यंतर घेण्यातच असते!

श्रावण मासी हर्ष मानसी!!!!
'जें जें काहीं श्रवणी पडिलें । तितुकें समजोन विवरलें ।
तरी च कांहीं सार्थक जालें । निरूपणी  ।।'

समर्थ म्हणतात की  आपण जे काही चांगले श्रवण करतो, चांगले ऐकतो,  ते सर्व आपण नीट  समजून घेतले पाहिजे.  आणि फक्त समजूनच  घ्यायचं नाही,  तर त्याचे आपल्या आयुष्यात प्रत्यंतर  करावे, शिकून घ्यावे, आत्मसात करावे. तेंव्हाच त्या निरुपणाचे सार्थक झाले असे होईल.
म्हणजे कुणी काही चांगले सांगितले, तर  ते फक्त ऐकले आणि सोडून दिले  असे केल्याने  त्या सांगण्याचा काहीच उपयोग होत नाही. तेंव्हा उत्तम गोष्टींचे किंवा तुम्हाला उपयोग होईल असे ज्ञान जर कुणी तुम्हाला दिले, तर त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या  कल्याणासाठी करून घेतला म्हणजे सांगितल्याचे सार्थक होते .

पावसाळा आला, श्रावण सुरु   झाला आहे, आणि  चातुर्मास सुरु झाला आहे . अनेकविध  सण वार, व्रतवैकल्य  आहेत. त्या निमित्ताने गोड धोड पदार्थ होतात,  भाज्या, फळ  वापरून अनेक पदार्थ करून देवाला नैवेद्य   दाखवला जातो.  मला परवाच माझ्या काही मैत्रिणी म्हणाल्या की तु केलेल्या  केळ्याच्या पुऱ्या छान झाल्या  होत्या, तर आम्हाला त्याची रेसिपी दे. म्हणून त्या सर्व मैत्रिणीं साठी ही केळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी…
केळ्याच्या  पुऱ्या


पिकलेली केळी  घेऊन,कुस्करून  घ्यावीत.  १ वाटी गर असेल तर १/२ वाटी  साखर,किंवा गूळ जे आवडेल ते  घालून, शिजवून घ्यावे. gas  वर तर करता  येतेच,पण  microwave मध्ये १०० % वर ३ ते ४ मिनिटे शिजवले की मिश्रण तयार होते. हे मिश्रण थंड करून , त्यात  मावेल एवढी कणिक आणि तांदूळ पिठी निम्मी निम्मी घ्यावी, (अंदाजाने १ वाटी पीठ लागेल.) त्यात थोडे मीठ, थोडे गरम तूप घालून पीठ हलक्या हाताने मऊसर भिजवून ,लगेच  पुऱ्या  करून त्या तळून घ्याव्यात. पुऱ्या थोड्या तुपाच्या हाताने प्लास्टिक पेपर वर थापाव्यात.
 ह्या पुऱ्या  नैवेद्याला पण करता येतात.

 असो, असेच सणवार येत राहतील, आणि छान  छान  पदार्थ बनत राहतील!

Sunday, 20 July 2014

पावसाळ्यातले चमचमीत खाणे

आषाढ महिना संपता संपता आता श्रावणाचे वेध  लागायला लागलेले आहेत. पाउस  दाखल झाला  आहे, सगळीकडे  मस्त हिरवेगार झालेले आहे आणि   पानाफुलांनी डवरलेले  वृक्ष  बघितले   की मूड पण मस्त होतो नाही का?

'मनीं धरावें तें होतें | विघ्न अवघेचि नासोन जातें |
कृपा केलिया रघुनाथे | प्रचित  येते ||'

हे समर्थांचे वचन अगदी खरे आहे, प्रचीती घेण्या सारखे आहे. म्हणजे भगवंताचे अधिष्ठान  ठेऊन कोणतेही कार्य केले तर   कार्यातील विघ्ने नष्ट होतात आणि सफलता मिळते, हे नक्की.  थोडक्यात, भगवंताची कृपा झाल्याची प्रचीती येते!  आयुष्यात इतर  अनेक प्रसंगी देखील  भगवंताची कृपा आपल्यावर कशी असते ह्याची  प्रचीती येते...
 
माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगते. मी लखनौला असतांना, एकदा मोटरसायकल चालवीत असतांना,    मागून   वेस्पाने  धडक दिली. चालवणारे दोघे 10 वीचे विद्यार्थी होते,त्यांच्याकडे  लायसेन्स देखील नव्हते., आणि गाडीचे ब्रेक फेल होते!(हे त्यांनी नंतर काबुल केले ) तर माझ्या   गाडीने  एकदम वेग पकडला, आणि डावीकडे वळली, आणि रस्त्याच्या कडेला जे नाले असतात, त्या नाल्याकडे निघाली! तिथेच दोन माणसं  मोटरसायकल पार्क करून गप्पा मारीत होते. मी गाडी सोडून दिली, आणि त्यातल्या एकाला घट्ट  पकडले. आम्ही दोघे पडलो, पण मी वाचले, कारण पुढे नाल्यात बघितले, तर फक्त मोठे मोठे दगड होते, आणि मी जर  तिथे पडले असते तर काय झाले असते ह्याची कल्पना न केलेलीच बरी! तर मला नंतर असं  वाटलं, की मला गाडी सोडून देण्याची बुद्धी त्या भगवंतानेच दिली, आणि ते दोन गृहस्थ देखील  तिथे बहुधा मला वाचवण्यासाठीच उभे होते! भगवंताची कृपा म्हणते ती हीच!
मला आजही हा प्रसंग आठवला तर मी लगेच हात जोडून भगवंताचे आभार मानते!

 असो, आता महत्वाचा मुद्दा असा की पाउस पडत असतो तेंव्हा आपल्याला काहीतरी चटपटीत खावेसे वाटते, आणि तयारी पण जास्त असू नये असे वाटते नाही का? आजकाल बऱ्याच बसिक वस्तू रेडीमेड मिळतात त्यामुळे काहीतरी झटपट बनवणे सोपे झाले आहे,

रेडीमेड शेझवान चटणी चे नूडल्स
मी परवा  ' शेझवान चटणी ' चे रेडीमेड पाकीट आणले, आणि नूडल्स शिजवून त्यात  ही पेस्ट घालून फटाफट   नूडल्स बनवले होते. आणि गरम गरम खायला काय मजा येते, वाह! , हेच नूडल्स घरी  मसाला करून बनवायचे ठरवलं तर किती काम असतं मला माहिताय ना. म्हणून हे रेडीमेड पाकीट आणून केल्या नूडल्स . जुन्याच गोष्टीं मध्ये अडकून न पडता बदलणाऱ्या  जमान्या बरोबर आपण चालायला शिकलं पाहिजे . 

पालकाची मोठी जुडी स्वस्त मिळाली म्हणून  आणली,पण एवढ्या पालकाचे करायचे काय?
पालकाच्या पुऱ्या
मग आठवलं , पालकच्या पुऱ्या ! पुऱ्या करून लोणचं आणि दह्या सोबत खाऊन फस्त केल्या!


Saturday, 12 July 2014

गुरु पौर्णिमा

।।जय जय रघुवीर समर्थ ।।


 'गुरु ब्रह्मा गुरु विष्णू। गुरु देवो महेश्वरः ।
गुरु साक्षात परब्रह्म। तस्मै श्री गुरुवे नमः' ।।'

आज 'गुरु पोर्णिमा ' ,आपल्या गुरुजनांना   आठवावे, त्यांना वंदन करावे, प्रत्यक्ष जाऊन भेटता आले तर त्यांना नमस्कार  करून, फोन वरून संपर्क करून , त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, त्यांनी दिलेली शिकवणीची शिदोरी पुन्हा एकदा उघडावी, आणखीन काही नवीन सापडते  काय ते पाहावे.  मंडळी, नक्की नवीन काहीतरी सापडेतेच  बर का !

समर्थांनी दासबोधात   गुरूंचे सतरा प्रकार  सांगितले आहेत. मंत्रगुरु, तंत्रागुरू , उस्तादगुरु, राजगुरू , कुळगुरु , विद्यागुरु, , कुविद्यागुरु , असदगुरू , यातीगुरू, मातागुरु, पितागुरु, देवगुरु , जगद् गुरु, असे सतरा प्रकारचे गुरु आहेत
पण ह्या शिवाय असे गुरु पण असतात जे आपल्याला आपल्या  व्यवसायात,जीवनात  मार्गदर्शन करतात, आपल्या  प्रगतीत त्यांचे मोलाचे स्थान असते. मुल जन्मल्या पासून आई  पहिली गुरु असते असे म्हणतात. तिथून आयुष्भर अनेक गुरु लाभतात, पण कुणाला   गुरुस्थानी मानण्या साठी, आधी  आपण उपकृत झालो आहोत ह्याची जाणीव असायला हवी, किंवा तेवढे आपण संवेदन शील असायला हवे.

आपल्यांला  गुरु कोठेही मिळू  शकतो. त्याला वयाचे, ज्ञानाचे, अनुभवाचे कुठलेच बंधन असत नाही. जो आपल्याला एखाद्या विद्येचे ज्ञान देईल, एखाद्या अडचणीतून मार्ग दाखवेल,  असा एखादा बोल बोलेल ज्यामुळे आपल्याला मदत होईल असा तो गुरूच जाणावा, आणि त्याचा योग्य तो आदर ठेवावा. आदर ठेवायचा  म्हणजे दर वेळी नमस्कार वगैरे केला पाहिजे असे नाही, पण आभार मानले, किंवा आपल्या मुखाने त्याचे कौतुक केले, दोन शब्दांनी कृतज्ञता व्यक्त केली, तरी चालते. पण मुख्य गोष्ट म्हणजे कधीही ह्या गुरूचा विसर न पडावा हे ध्यानात असू द्यावे .अशा सर्व गुरुंचे  स्मरण करण्याचा आजचा हा दिवस.

समर्थ पुढे म्हणतात की एवढे गुरु असूनही सदगुरू शिवाय मोक्ष प्राप्ती नाही, तेंव्हा सदगुरूच श्रेष्ठ गुरु.
'असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारू \
परी जो मोक्षदाता सदगुरू ।तो वेगळाचि  असे ।'

माझ्या आईनी  शिकवलेले चिरोटे म्हणजे बेस्ट ! आज तेच चिरोटे जेंव्हा जेंव्हा करते तेंव्हा तेंव्हा तिची आठवण काढते, आणि असे चिरोटे शिकवल्या बद्दल मनातल्या मनात तिला वंदन करते.शिवाय बोलून शुभेच्छा देते ते वेगळेच! आजच चिरोटे केले, गुरु पोर्णिमे साठी ….

खुसखुशीत चिरोटे
१ वाटी मैदा, १/४ वाटी एकदम बारीक रवा, १ टीस्पून कॉर्नफ्लोर आणि २ टेबलस्पून तूप गरम करून  घट्ट कणिक  मळून,२ तास ठेवावी .
थोडे कॉर्नफ्लोर आणि तूप नीट   घोटून गुलगुलीत करून ठेवावे.
कणकेचे छोटे गोळे करावेत. एक एक पोळी लाटून, त्यावर घोटलेले तूप नीट पसरावे. वरती दुसरी पोळी ठेवावी. अशा ५ पोळ्या त्यावर तूप लावून एकमेकावर ठेवून, त्याची घट्ट  गुंडाळी करावी. आडवे कापून छोट्या लाट्या करून हलक्या हाताने रेषा वरती येतील असे लाटून, हे चिरोटे तुपात तळून घ्यावेत. शेवटी   पिठी साखर भुरभुरावी , आणि सर्व्ह करावेत.

माझ्या सर्व गुरुजनांना वंदन! त्रिवार वंदन!!

Tuesday, 17 June 2014

आंब्याचा सरता सीजन

माझ्या ब्लॉगचे १११ पोस्ट्स झाले,  उत्साह पण  वाढतो आहे. लोणचे घालून झाले , आणि आंबे पण संपत आले. तेंव्हा म्हटलं, आत्ता आणखीन काही पदार्थ करायचे असले तर करून घ्यावेत. मग आंब्याच्या पुऱ्या केल्या .
आंब्याच्या पुऱ्या
१ वाटी आंब्याच्या  रसात १ १/२ वाटी साखर घालून रस आटवून घ्यावा.  थंड झाल्यावर त्यात मावेल एवढी कणिक आणि  तांदूळ पिठी घालावी, थोडे मीठ घालून, त्यात वेलची  पूड,घालून पीठ मऊसर मळून घ्यावे. प्लास्टिक शीटवर छोट्या पुऱ्या हाताने   थापून तळून घ्याव्यात. तूप घालून सर्व्ह कराव्यात.

आता  शाळा सुरु झाल्या आहेत, आणि सर्व आयांची पण धडपड पुन्हा सुरु झाली आहे. आता पुन्हा शाळेची तयारी, डबा , डब्याचे पदार्थ रोज काय करायचे हा प्रश्न रोजच  राहणार !! असो, मला ह्यातली कोणतीच चिंता  नाही,त्यामुळे मी आपली वेगवेगळे पदार्थ   करायला मोकळी आहे न!!

म्हणजे बघा हं , पर्वा सुरणाचे कटलेट्स बनवले …
सुरण शिजवून   mash करून त्यात मीठ,  तिखट,हिरवी मिरची तुकडे, गरम मसाला , कोथिंबीर आणि त्यात मावेल  एवढे बेसन घालून, कटलेट्स बनवून डीप   फ्राय करून sauce बरोबर सर्व्ह करावेत.

 

Tuesday, 10 June 2014

आंबा, आंबा, ....आणि आणखीन आंबा

हापूस आंबे आणले की   काय काय करता येईल त्याचे विचार चालू होतात. माझी एक आवडती रेसिपी म्हणजे आंब्याचा सुधारस …. इतर वेळी  पटकन साखरेचा पाक करून केळीचे तुकडे टाकून सुधारस करतेच, पण आंबा असला की मात्र आंब्याचाच सुधारस …
आंब्याचा सुधारस

साखरेचा पातळसा  पाक  करून ,  त्यात वेलची पूड, केशर, काजू तुकडे, , बेदाणे, आणि हापूस आंब्याचे तुकडे घालून वरून साजूक तूप घालून पोळी  सोबत  द्यावे.

साखरांबा
आंब्याचा जसा गुळांबा, तसा साखरांबा केला आणि भार छान जमून गेला !

१ वाटी कैरीचा कीस थोडा परतून शिजवून घ्यावा , ३ ते ४ मिनिटे लागतात. नंतर १ १/२ वाटी साखर घालून, मंद आचेवर ढवळून साखर आळे पर्यंत   ठेवून उतरवावे.  ४ मिनिटे सरासरी लागतील .  सोडियम बेन्झोएट  चिमुटभर घालून ठेवावे.

  तसा आता आंब्याचा  सीझन संपत येईल, आणि त्या आधी आंब्याचे वर्षभराचे लोणचे घालायचे आहे !

Wednesday, 14 May 2014

निसर्गाचे अनेक चमत्कार !


आज सकाळी आंब्याच्या झाडाकडे बघता बघता, मला अचानक एक घरट दिसलं!! इतकं  छान वाटलं ते घरट पाहून ! आणि जवळ जाऊन डोकावून पहिल तर त्यात पक्षाने अंड पण दिलं होतं !! लगेच फोटो काढला आणि माझ्या ब्लॉग वर टाकला! बघा किती कुशलतेनं घरट बांधतात पक्षी !!

साधं गवताच्या काड्या पण गोल सुरक्षित घरट , आणि त्यात उबेसाठी कापूस, पंखांचे तुकडे ! वाह ! मानलं ह्या पक्ष्याला!!

असाच चिमणीच्या घरट्याचा आभास निर्माण करणारी चाटची रेसिपी …. 

बटाटे किसून घ्यावेत, १ वाटी बटाटा कीस  असेल,तर १ टेबलस्पून कॉर्नफ्लोर आणि थोडे मीठ घालून, घट्ट  मळून घ्यावे. चहाच्या स्टील च्या गाळणीला आतून हा लगदा गोल  लावून,दाबून बसवावा. तसाच गरम तेलात  सोडून,खरपूस तळून घ्यावा. ही घरटी थंड   झाली, की त्यात भेळ, किंवा मिक्स्ड बॉईल्ड भाज्या, कॉर्न भेळ , असे कोणतेही फिलिंग भरून द्यावे. उन्हाळ्यासाठी उत्तम डिश आहे.

आज दुपारी ठीक १२ वाजून ३० मिनिटांनी बाहेर सुर्य उजेडात उ भे राहिले असता, आपली सावली आपल्या पायाच्या खाली दिसणार होती . म्हणून उठून  गेले,पहिलं  आणि खरच तसचं दिसलं ! हा खगोलशास्त्रीय चमत्कार! हे लहानपणी देखील आमच्या वडिलांनी दाखवल्याचं चांगलं आठवतंय! 

३_४ दिवसां पूर्वी आकाशात मंगळ आणि शनि हे ग्रह दिसले. ह्यातला शनी उघड्या डोळ्याने सहसा दिसत नाही, आणि तो पृथ्वीच्या अगदी जवळ होता , म्हणून हा चमत्कार बघून आनंद वाटला . तसं धुमकेतू पण बघितला आहे, फार exciting moment असतो तो पण, कारण काही क्षणातच  धुमकेतू नाहीसा होतो !! 

आणखीन थोडे आंबा महात्म्य

चाणक्य, कौटिल्य , विष्णुगुप्त , ही सर्व नवे कुणाची ? अर्थात अर्थशास्त्रावर 'कौटिल्य अर्थशास्त्र ' ह्या महान ग्रंथाचे लेखक चाणक्य!  त्यांची ही कथा म्हणजे आजच्या लूटमारी करणाऱ्या मंडळींना कानउघडणी किंवा डोळे उघडणी म्हणता येईल. आजकाल दुसऱ्या च्या जीवावर आपले कल्याण करण्याकडे कल व वाढलेला दिसतो. म्हणजे फुकट जे जे घेत येईल, ते ते घ्यावे, आपल्या खिशाला चाट न  लावता, दुसऱ्याच्या खिशातून कसे लुटता येईल हे बघितले जाते. फार भयंकर परिस्थिती आहे ही फुकटेपणाची .

तर कौटिल्य जेंव्हा ह्या वरील ग्रंथाचे लेखन करीत  होते,त्या वेळची ही गोष्ट आहे. एक रात्री समईच्या उजेडात लिखाण करीत बसले असता, एक विद्वान त्यांच्या सोबत काही महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्या साठी आले असता, चाणक्य यांनी त्यांस बसायला सांगितले. त्यांचे लेखन  झाले,तसे त्यांनी समोरची समई विझवली, आणि दुसरी  समई लावली . तेंव्हा त्या विद्वानांना  आश्चर्य वाटले आणि ते विचारते झाले  की, असे करण्याचे काय कारण ?

चाणक्य म्हणाले, 'मी अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहितो आहे, तो मी  माझ्या राजा साठी लिहित आहे, आणि ह्या कामासाठी मला राजाने ही समई आणि तेल दिले आहे. हे सर्व हे राजकार्या साठीच वापरतो. तुम्ही माझ्या कडे दुसऱ्या कामासाठी आलेले आहात, जे राजकार्य नाही. म्हणून मी ही समई विझवली, आणि माझी समई लावली. ह्यातली वात आणि तेल माझ्या खर्चाने आणले आहे. '

विद्वान म्हणाले 'एवढ्याश्या खर्चाने राजाला काही नुकसान होणार का ? त्यांची समई तेल तुम्ही व्यक्तिगत कामासाठी वापरलेत हे त्यांना कळणार आहे का ? आणि कळले तरी ते तुम्हाला काही म्हणतील का ? मग हे सर्व कशा साठी ?'

तेंव्हा चाणक्य उत्तरले,' प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने असा विचार केला तर खर्च आकाशाला भिडायला वेळ नाही   लागणार. आणि राजाला जरी माझे वागणे कळले नाही तरी माझ्या मनाला कळणारच की ! माझ्या मनाला हा राजद्रोह वाटतो. मग मी असे का वागावे ?' विद्वान खजील झाले!

असो, खूप बोधामृत झाले आता जरा शांत बसून मस्त थंडगार पन्ह प्यावं,  हो ना ?

पन्ह्यासाठी कैरीचा   गर
हे पन्हे  करण्या साठी : मस्त हिरव्यागार कैऱ्या आणल्या, उकडून घेतल्या, गर काढला . १ वाटी   गराला २ वाट्या साखर  घालून,मिक्स करून रात्रभर ठेवून दिले.  सकाळी मिक्सर मधून  फिरवून घेतला, त्यामुळे त्यात रेषा किंवा गुठळ्या रहात नाहीत. शेवटी वेलची  पूड,केशर पूड घातली , आणि बॉटल मध्ये ठेवून दिले.

आंबा पन्हे
आता पाहिजे तेंव्हा हा गर, पाणी, आणि बर्फ घातला, की गारेगार पन्हे  तयार !बाजारात मिळणाऱ्या बाटलीबंद  पन्ह्याला ह्या घरी  केलेल्या पन्ह्याची सर नाहीच येणार !

Thursday, 8 May 2014

आंबेच आंबे चोहीकडे !

बाबा : 'बाळू, खर खर सांग, ही शंभरची नोट कुठून  आणलीस ?खर सांग नाहीतर मार खाशील.'
बाळू : 'बाबा, गल्लीत पडली होती . तुम्हाला खोटं वाटत असेल, तर बघून या.  एक माणूस अजूनही नोट शोधतोय!!'

हा! हा! हा! किती प्रामाणिक मुलगा  आहे नाही ?
असो,तर आपल्या आंबा पुराणातले पुढचे दृश्य पहा …
आंब्याचे ताजे लोणचे

 काय ? लोणचं पाहून तोंडाला पाणी सुटल नां ? कालच कैरीचं ताजं , चालू चालू लोणचं केलं . कैऱ्या यायला लागल्या पासून दुसऱ्यांदा केलं !
लोणच्याचा तयार मसाला, थोडे जास्त  तिखट,मीठ, आणि वरून फोडणी थंड करून घातली, की लोणचं तयार! पण थोडे   विनेगर  घातले,तर खार सुटायला मदत होते.
डाळ  ढोकळी  हा पदार्थ संध्याकाळी झटपट होण्यासारखा आहे. कालच केला आणि अक्षरशः  चट झाला  मिनिटातच!

 आधी १/२ वाटी कणिक, १/४ वाटी बेसन,मीठ, तिखट, हळद , ओवा, कोथिंबीर घालून घट्ट मळून घ्यावी..

तुरीची डाळ  शिजवून घ्यावी. तेल गरम करून ,  त्यात मोहरी, जिरे,  हिंग,कढीपत्ता,  लाल सुकी मिरची घालून,  नंतर डाळ घालावी. पाणी घालुन थोडी पात्तळ करून घ्यावे. तिखट, मीठ, गोडा  मसाला,गुळ , चिंच कोळ आणि कोथिंबीर घालून उकळू द्यावे .

वरील कणकीची एक मोठी  पोळी लाटून,  शंकरपाळे कापून उकळत्या   आमटीत हळू हळू टाकीत जावे .  ही फळं शिजली की वरती येतात . मग आमटी बंद करून,  वरून तूप घालून थोडी कोथिंबीर पेरून गरम गरम खावी .
भाता  सोबत छान लागतात.

असो, आता पुन्हा दुसरा एखादा आंब्याचा पदार्थ सुचला की लगेच बनवणार, आणि ब्लॉग वर टाकणार!

Wednesday, 7 May 2014

वांगी पुराण

नुकतीच रामनवमी आणि पाठोपाठ हनुमान जयंती देखील साजरी केली गेली, तेंव्हा त्या निमित्ताने  समर्थ रामदासांची एक कथा वाचनात आली ती सांगावीशी वाटते ….

एक ब्राह्मण समर्थाचा शिष्य होता , आणि समर्थां बरोबरच रहात असे. त्याला वाटले  होते,शिष्य  झाले,म्हणजे  मठात आरामात राहायला मिळेल, आणि  काम पण करायला लागणार नाही! पण समर्थांना  माणसांची पारख होतीच, पण ते अंतर्ज्ञानी होते, त्यांनी  ब्राह्मणाची चाल ओळखली. आळशी आणि निरुद्योगी माणसांचा समर्थांना राग यायचा.
मग, समर्थ त्याला आपल्या बरोबर   नेऊ लागले, आणि मग हा ब्राह्मण कंटाळला. गुरूबद्दलची आस्था कमी  झाली,आणि तो तिथून निघून प. पु. निगडीकर स्वामींकडे आला आणि अनुग्रह द्या असे म्हणून मागे लागला. स्वामींनी  विचारले, 'तू  ह्या पूर्वी कुणाचा अनुग्रह घेतला  होतास का ?'  तेंव्हा ब्राह्मण म्हणाला , 'होय,मी समर्थ रामदासांचा अनुग्रह घेतला होता , पण मला तिथे बरे वाटले नाही, म्हणून निघून आलो. '
स्वामी त्याला म्हणाले  की,तू समर्थांकडे  जा, आणि तुझा अनुग्रह परत  करून ये. ब्राह्मण समर्थांकडे गेला, आणि अनुग्रह परत घ्या असे म्हणाला . समर्थ म्हणाले, 'पाण्याची एक चूळ   भर,आणि त्या समोरच्या खडकावर टाक म्हणजे अनुग्रह परत घेतल्या सारखे होईल.'
ब्राह्मणाने चूळ  खडकावर टाकली, त्याच क्षणी त्याच ठिकाणी रामाच्या त्रयोदशाक्षरी मंत्राची, म्हणजेच 'श्री राम जय राम जय जय राम ' ही अक्षरे उमटली, आणि त्याच क्षणी ब्राह्मणाची वाचा देखील गेली ! त्याची ही दयनीय अवस्था पाहून निगडीकर स्वामी पुन्हा त्याला घेऊन समर्थांकडे  गेले,आणि त्याची वाचा परत येऊ द्या म्हणून विनंती केली. समर्थांनी ब्राह्मणाला त्या ख्द्कावरची   उमटलेली अक्षरे जिभेने चाटायला सांगितली . आणि काय आश्चर्य… ब्राह्मणाची  गेलेली वाचा त्याला परत मिळाली !!!

 ही कहाणी उंब्रजच्या मारुती मठातील घडलेली आहे, आणि ह्या मारुतीला गेले, तर हा खडक पहायला मिळेल.

असो,  माझाही किस्सा सांगण्यासारखा आहे. मी पूर्वी म्हणजे साधारण २५ वर्षां पूर्वी पर्यंत वांग्याची भाजी अजिबात खायची नाही. एकदा  माझ्या आजोबा आणि आजी बरोबर सज्जनगडावर जाण्याचा  आला. त्या दिवशी दर्शन झाल्या  नंतर,आम्ही प्रसादाचे जेवण घेण्यासाठी  बसलो, तर काय ? जेवणात भात, वांग्याची भाजी आणि पोळी !! आली का पंचाईत ? माझ्या एका बाजूला  आजोबा आणि एका बाजूला आजी बसले होते, आणि पानात  काही टाकायचं नाही हा   दंडक अंगवळणी पडलेला ! मग काय, खाल्ली भाजी आणि खर सांगते, तेंव्हा पासून  वांग्याची   भाजी खायला लागले!!

सांगायचं कारण हे की आज वांग्याची रसभाजी केली, छान  जमली म्हणून तुमच्या सोबत शेअर केला हा किस्सा.  सांगलीची फेमस वांगी मिळाली  त्याची भाजी कशी केली तर ही रेसिपी …

३ छोटी वांगी, २ छोटे बटाटे देठ न तोडता, +असे कापे मारून   पाण्यात ठेवा.
मसाला करण्यासाठी:  १ मोठा कांदा तेलावर brown करून घ्या ,लगेच त्यातच ५ ते ६ लसूण  पाकळ्या  परतून घ्या , २ सुक्या मिरच्या पण परतून घ्या, १/४ वाटी सुकं खोबरं  भाजून घ्या, २ टेबलस्पून तीळ भाजून घ्या,  हे  सर्व वाटून पेस्ट बनवून, वांग्यात भरून   घ्या.
 तेल गरम करून,थोडा  हिंग, मोहरी, थोडे मेथी दाणे आणि लाल तिखट घाला.  त्यात ही वांगी आणि बटाटे  सोडून,परतून, घ्या. नंतर पाणी घालून शिजू द्या. थोडी  मसाला पेस्ट   घाला, पूर्ण शिजले, की त्यात,१ टेबलस्पून   गोडा  मसाला, किंवा काळा मसाला, २ चमचे तिखट ,   २ टेबलस्पून गूळ , १ टीस्पून चिंच कोळ ,२ टेबलस्पून दाण्याचे कूट , कोथिंबीर घालुन सर्व्ह करा भाकरी किंवा   पोळी सोबत.

ह्यात ओलं खोबरं देखील  घालता येते.

आता मस्त  वांग्याच्या भाजी पोळीवर ….तोपर्यन्त भेटूयात !!!

Tuesday, 6 May 2014

आला रे आला ---फळांचा राजा ! आंबा महोत्सव सुरु झाला !

'[आंबा पिकतो, रस गळतो,
कोकणचा राजा बाई   झिम्मा खेळतो !!!'

उन्हाळा सुरु झाल्या झाल्या आठवण होते कैऱ्या , आंबा, फणस, ह्या वस्तूंची! मस्त हिरवी गार कैरीची फोड  तिखट, मीठ लावून खायची…… वाह तोंडाला पाणी सुटतच की नाही ?
आणि आंबा  कोणताही चालतो,…   म्हणजे चोखून खायला रायावळा , आमरस करायला पायरी , किंवा  फोडी करून खायला, आणि राजाधिराज,  खरी रसनेची तृप्ती करणारा हापूस आंबा!   वाह वा ! मला स्वतःला हापूस आणि फक्त हापूसच आवडतो  बर का ,  काय असेल ते असो.

पूर्ण मोसमात एकदाच पोटभर हापूस आंबा ,खाल्ला, की मी परत आंब्याकडे बघणार देखील नाही!  ही आपली गम्मत बर का,  कारण पुन्हा दुकानात हापूस आंबा  दिसणार,तो मला खुणावणार, आणि मग मी जादू केल्या सारखी दुकानातून आंबा विकत घेणार , आणि पुन्हा ताव मारून खाणार!!

परवाच गुळांबा  केला आणि दर वर्षी  प्रमाणे, माझ्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या!
आंब्याचा राजा _ हापूस
मामाकडे सुट्टीत रहायला जायचो, तेंव्हा मोठ्या  मामाने आंब्यांची भली मोठी अढी रचलेली असायची ! आणि धाकटा मामा म्हणायचा , ' खा लेको, किती आंबे खाता ते खां!' तेंव्हा ह्या वाक्याचं  खूप हसू यायचं, पण आता उरल्यात फक्त आठवणी!  पण ती आठवण  जरी झाली, तरी मी मनाने त्या वाड्यातल्या  पोहोचते, आणि ती रचलेली अढी मनाने  पाहते, वास  घेते, आणि खाते सुद्धा!! म्हणून असेल कदाचित मला फक्त हापूसच मनापासून आवडतो !

आणि पाठोपाठ आठवतो तो मामीच्या हातचा गुळांबा ! वाह! असा गुळांबा पुन्हा  होणे नाही, खरच !

कच्च्या कैरीचा गुळांबा
 म्हणजे पोहून वगैरे यायचं , आणि मग जेवायला बसायचं… मस्तपैकी गुळांबा  घ्यायचा,वरती भरपूर साजूक तूप ओतायचं,( हो,हो, ओतायचं म्हणजे चक्क ओतायचं  बर !) आणि पोळी बरोबर खायचा हा गुळांबा! म्हणजे पोळीसाठी गुळांबा, का गुळांब्या साठी पोळी, का तुपासाठी गुळांबा, का गुळांब्यासाठी तूप हेच समजेनासं होत!!

 दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी गुळांबा केला,  आणि तो मस्त झाला !   असो, तर ह्या गुळांब्याची ही गोड रेसिपी …

गुळांबा :

१ वाटी कैरीचा कीस पातेलीत घेवून,झाकण न ठेवता ३ ते ४ मिनिटे शिजू द्यायचा ,  नंतर कीस हाताला मऊ  लागला, की त्यात १ १/२ ते २ वाट्या गूळ  घालायचा, नीट  ढवळून पातळ  पाक बनेपर्यंत बारीक gas वर शिजू द्यायचा. ३ ते ४ मिनिटे लागतात. शेवटी २ लवंगा टाकायच्या . पाक भरपूर हवा, घट्टसर पण पळीने वाढता येण्यासारखा  झाला पाहिजे.

कैरीची एक खास चटणी उत्तर भारतात प्रसिद्ध  आहे.

कैरीची चटणी

 ही कैरी चटणी    करण्या साठी, १ वाटी पाणी कढईत  उकळत ठेवावे . त्यात १ टीस्पून आलं   पेस्ट,१ टीस्पून लसूण  पेस्ट, २ सुक्या मिरचीचे  तुकडे,आणि १ वाटी किसलेला कांदा घालावा. थोडे आटल्यावर १ वाटी कैरीचा कीस  शिजू घावे. शेवटी १ tsp  तिखट, १/२ tsp मीठ, २  tsp साखर, १ tsp भाजलेल्या बडीशेपेची पूड, १/२ tsp तळलेल्या मेथी दाण्याची पूड, आणि १/२ tsp विनेगर  घालून gas  बंद करावा . नंतर १/२ tsp  acetic  acid  घालून, नीट  मिक्स करून, प्लेट टेस्ट करून नंतर बाटलीत भरून ठेवावी.
हा आंबा महोत्सव असाच  आणखीन बरेच दिवस चालणार आहे, त्यामुळे नवीन नवीन रेसिपीज येतच राहतील … Enjoy  the mangoes  to your heart's  content !!

Sunday, 27 April 2014

आवडीचा बेत _ म्हणून आनंद !

समर्थांचे एक वचन आहे ,
'आळसे  राहिला विचार ,  आळसे  बुडाला  आचार। 
आळसे  नव्हे पाठांतर,   काही केल्या । '
खरच, कधी कधी इतका आळस   येतो, काही करू नये  असं  वाटतं, पण लगेच डोळ्यां समोर दिवसभराची काम दिसायला लागतात, आपल्यावर अवलंबून असलेली इतर मंडळी दिसतात आणि एकदम मनातून आळस  वगैरे पळून जातो आणि आपण कामाला लागतो!!

आज  साधा पण आमचा सर्वांचा आवडता इडली डोसा सांभारचा बेत केला होता. सगळा बेत मस्त जमला आणि ताव मारून नंतर ब्लॉग  लिहायला बसले.
इडली सांभार आणि मोलागापोडी चटणी

पण गरम गरम डोसे खायची  औरच  असते बर का! म्हणजे दोन तीन डोसे बनवून, प्लेट मध्ये  घ्यायचे,त्यावर गरम गरम सांभार ओतायचं ., वरून मोलगापोडी  चटणी घालायची, मस्तपैकी तूप टाकायचं , आणि  हाताने डोसा ओरपायचा!  हे खर सुख!!
म्हणजे इडली चटणी सांभार थोडे साहेबी पद्धतीने म्हणजे काट्या  चमच्याने वगैरे   खावे, पण डोसा सांभार मात्र भारतीय  पद्धतीनेच खावा, हे  समीकरण माझ्या डोक्यात आहे बर का!
असो, प्रत्येकाची आपापली आवड निवड असतेच की. महत्वाचं  काय असतं , की समोर आलेले अन्न हे पूर्ण ब्रम्ह समजून खावे, ताटात आवश्यकते पेक्षा जास्त अन्न वाढून घेऊ नये, आणि प्रसन्न  चित्ताने  भोजन करावे, म्हणजे मग अंगी लागते,  आणि त्या अन्नदात्याला  विसरू नये, उलट, जेवणा नंतर त्याचे आभार मानावेत म्हणून, ताटाला हाताने नमस्कार करायची पद्धत आहे ती पुन्हा रुजू द्या! जुने संस्कार पुन्हा नव्याने रुजणे गरजेचे झाले आहे. 'अन्नदाता सुखी भव '  असे देखील म्हणण्याची पद्धत आहे, त्याला कारण ज्यांनी हे अन्न बनवून  वाढले,त्या सर्वांना सुखी ,ठेव अशी परमेश्वरापाशी प्रार्थना करणे हा उद्देश होय .

काल आणखीन एक आवडता पदार्थ केला होता, माझ्या आत्याचा हातखंडा असलेल्या गुळपापडीच्या वड्या! मला  जाम आवडतात ह्या वड्या …
गूळ पापडी च्या वड्या
१ वाटी साधी कणिक, किंवा जाडसर दळलेली कणिक, १/२ वाटी तुपावर खरपूस भाजून घ्यावी .  १ १/२ वाटी  गूळ आणि १/२ वाटी पाणी घालून, दोन तारी पाक तयार करावा आणि गरम पाक, गरम कणकेत घालून, gas वरून खाली काढून , नीट  ढवळून  घ्यावे,आणि थोडी  घालावी. तूप लावलेल्या थाळीत सेट करावे. वड्या  ,पाडून घ्याव्यात.  की सर्व्ह करव्यात.  हवे असल्यास,  वेलची पूड  घालावी, आणि आवडत असल्यास, वरून खसखस भुरभुरावी. 
       

Thursday, 17 April 2014

MOODS AND FOODS

'I  hate my moods,
They never ask permission before they change!'

हा! हा !हा !  असो, jokes apart , मूड्स म्हणजे भयंकर गोष्ट आहे! कधी बदलतील काही नेम नाही! म्हणजे खरच आपली  परवानगी न घेताच बदलतात. पण  स्वतः वर थोडा ताबा ठेवला तर ह्या मूड्सच्या
अनियमितपणा वर काबू करता येतो   हे नक्की.

बेसिक केक  विथ truffle sauce

काल  एक साधा केक बनवला होता . केक पण छान जमून आला होता . संध्याकाळी एक friend आला आणि त्याने माझ्या केकसाठी truffle sauce बनवून दिलं , आणि आम्ही केक sauce ने decorate केला, कापला आणि एन्जॉय केला! वाह! मजा आली कारण मला हा sauce येत नव्हता, तो मला काल शिकायला मिळाला ! तर गरम गरम पास्ता आणि त्यानंतर हा truffle केक!  मूड एकदम  मस्त  झाला! म्हणजे बघा एखादी छोटीशीच  गोष्ट , पण त्या गोष्टीने आपल्यातली एखादी रिकामी जागा एकदम चमकून गेली, उजळून गेली तर किती छान मूड  होतो न ?

कधी कधी एखादी डिश किंवा आत्ताचा   विषय घ्यायचा  झाला तर एखादे  दिवशी केक फसला, तर माझा मूड पार खराब होऊन जातो . माझा मूड चांगला असेल, तेंव्हा मी केक करायला घेते, आणि मग केक बघून माझा मूड एकदम छान !  ! म्हणजे मूड भी खुश  ! और पेट भी खुश !

 तेंव्हा,लक्षात ठेवा मूड ठीक करायचा  असेल,तर चांगलं चुंगल खा, प्या आणि मस्त रहा!

Saturday, 8 March 2014

स्त्री शक्तीचा जागर

महिला सक्षम आहेत हे पटवून देण्यासाठी   नेहमीच घराबाहेर पडूनच काम  केलं असं  मुळीच नाही बरं . आपलं घर, घरातील सदस्य, आपल्या आजूबाजूचा समाज ,त्या समाजातील घटक ह्यांना अनेक   प्रकारे मदत लागते,  लागत असते. तर, खंबीरपणे त्यांच्या पाठीशी  राहूनत्यांना अशी मदत  करणाऱ्या महिला देखील सक्षमच  असतात!

आपल्या  शारीरिक , मानसिक, बौद्धिक, भावनिक सामर्थ्याने  आणि क्वचित प्रसंगी आपल्यातील आध्यात्मिक सामर्थ्याने आपण दुर्बल आणि असहाय घटकांची मदत केली तरी ते देखील आपल्या सक्षम असण्याचाच पुरावा नाहीका ?

स्त्रीचे नैसर्गिक गुण म्हणजे प्रेम, स्नेह, वात्सल्य, सर्वांना जोडून ठेवण्याचे कौशल्य… हे आणि असे अनेक गुण. त्यांचा वापर करून आपल्या अवतीभवती प्रगती आणि उन्नत्ती घडवून आणणारी स्त्री ही सक्षमच!

आपल्यातील कला गुणांनी लोकांचे मनोरंजन करणारी महिला सक्षम आहे, तसेच दुसऱ्याच्या सुप्त कला गुणांना फुलवणारी स्त्री देखील सक्षमच आहे. एखाद्या सामान्य उत्पन्न असणाऱ्या घरातील स्त्री अनेक प्रकारे  पैशांची बचत करीत करीत आपल्या  घराला घरपण आणि भौतिक सौंदर्य आणण्यासाठी झटते तेंव्हा ती पैसा तर वाचवतेच, पण स्वतः सक्षम असल्याची ग्वाही पण देते,  हो ना?

मजुरी करणाऱ्या स्त्रीचे तान्हे मूल ती करीत असलेल्या कामाच्या ठिकाणीच एखाद्या झाडाच्या फांदीचा झोका करून, झोळीत झोपते, आणि त्याच्यावर एक नजर ठेऊन ही स्त्री आपले काम करीत राहते.   म्हणजे पैसे   कमवून घरही चालवते आणि मुलाबाळांची काळजी पण घेते. ही महिला नाही का सक्षम? आहेच मुळी .

घरी राहून घरच्यांसाठी काम करणाऱ्या महिलांना आपल्या लोकांची   तृप्त झालेली भूक, घरातील सुव्यवस्था, सर्वांची निकोप वाढ , आणि घरातील आनंद आणि त्यामुळे झालेले त्यांचे प्रसन्न चेहरे बघणे म्हणजे पण तिच्याच सुद्दृढ आणि सक्षम असण्याचा पुरावा आहे.

तेंव्हा आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्यातील  बलस्थान आणि कमजोरी ओळखून त्यांचा योग्य मेळ घालीत स्वतः प्रगती करणे आणि दुसऱ्यांना मदतीचा हात देणे , व त्यांना प्रगतीपथावर नेणेहाच  हाच स्त्रीशक्तीचा जागर होय .

    

WOMAN'S DAY

''HAPPY  WOMAN'S  DAY'

आज खूप  गाजा वाजा  होतो आहे महिला सक्षमीकरणाचा, परंतु महिला पूर्वी पासून सक्षमच आहेत  राहणार आहेत. कस असतं  ना, सक्षम  आहोत हे दाखवण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, पण  सरते शेवटी सक्षम राहून बाजी मारली की   आपोआपच सिद्ध होऊन जातं!

कुणी संसाराचे तुटलेले धागे गोळा करण्यासाठी सक्षम बनतात, कुणी उपेक्षितांचे दुःख  करण्यासाठी सक्षम बनतात.   काही जणी समाजाला दान देण्यासाठी सक्षम होतात,  किंवा   दान देत देत सक्षम होतात…  मग ते दान कोणतंही असेल, शिक्षण, पैसा, प्रापंचिक गरजा, योग्य सल्ला, योग्य माहिती, मार्गदर्शन इत्यादी. उत्तेजन देण्यासाठी प्रेमाचा हात पाठीवर फिरवणे, किंवा निराशेला आशेचा किरण दाखवणे,  वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणे हे देखील सक्षम असल्याची   प्रतीकंच आहेत की!

कुणी कुणी छुप्या अन्यायाला तोंड देण्यासाठी ,त्या अन्यायाच्या समोरच उभे राहून त्याच   अन्यायाला प्रतिकार करीत  राहतात, ते देखील सक्षमच असतात म्हणूनच ना?

तेंव्हा महिला सक्षम आहेत हे दाखवण्या साठी घराच्या बाहेरच पडलं  पाहिजे असं  काही गरजेचं नाही.

पण प्रश्न कुठे येतो माहिताय का? महिला सक्षम आहेत हे मान्य करता न येणे, किंवा मान्य करण्याचे टाळणे, किंवा आपला ego जोम्बाळत बसण्या साठी महिलांच्या प्रयत्नांवर पाणी फेरणे  ह्या गोष्टी मुळे प्रश्न निर्माण होतात.

पण महिलांनी ह्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करावं आणि आपलं काम चोखपणे बजावीत पुढे जात राहावं! मग वेगळा महिला दिन साजरा कशाला करावा लागेल?

सो, आपल्या   मनाचे ऐका, मन सांगेल तेच सत्य असतं हे लक्षात ठेवा आणि चांगल्या मनाने सर्वांसाठी चांगलेच करीत रहा! पुन्हा एकदा सर्व महिलांना आजच्या जागतिक महिला दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Thursday, 6 March 2014

महिलां साठी ब्रेकफास्ट रेसिपीज

माझ्या हे बऱ्याच वेळा पाहण्यात  आले आहे, की महिला वर्ग  हा सकाळी न्याहारी किंवा ब्रेकफास्ट घेत नाही. सबब काय? तर म्हणे 'वेळच  होत नाही', 'ह्यांची डब्याची घाई असते', मुलाचं करण्यात लक्षातच येत नाही ', देवपूजा झाल्या शिवाय काही खात नाही', (आणि  देवपूजा कधी होते हे विचारा, की सांगतात दुपारी १२ ते १ च्या  दरम्यान!, कठीणच आहे बाबा!) ह्या महिलांना पटत की ब्रेकफास्ट केला पाहिजे, रात्रीच्या ११ ते १२ तासांच्या विश्रांती नंतर पोटाला अन्न मिळालच पाहिजे नाहीतर   त्रास होतो वगैरे वगैरे…. पण …. हे असे स्वतः कडे दुर्लक्ष करून ह्यांना काय वाटत घरातले लोक ह्यांचा उदो उदो करतील? कौतुक करतील? नाही, असं  काहीही होतांना दिसत नाही. माझं  तर म्हणण आहे की त्यांच्या कुणाच्या हे लक्षात सुध्दा येत नसेल , म्हणजे नाहीच येत   लक्षात. मग तुम्ही कशाला   हुतात्मा बनता? मस्त खा, प्या, खुश रहा की!

 असो,तर  महिलां साठी काही झटपट ब्रेकफास्ट रेसिपीज …

मसाला रवा इडली

रवा इडली करण्या साठी १ वाटी  बारीक रवा घेऊन त्यात १ वाटी  घट्ट  दही, मीठ,कोथिंबीर,मिरची  पेस्ट,आलं पेस्ट घालून  इडली साठी पीठ भिजवावं, लागलं तर थोडं  पाणी किंवा दही घालावं. आणि लगेच इडल्या   बनवाव्यात. इडली बनायला १० मिनिटे लागतात. ह्याला चटणी वगैरे काही नको.  खायची बस!

 तिखट मिठाच्या पुऱ्या: कणिक घेऊन त्यात तिखट, मीठ, ओवा, जिरे, कोथिंबीर, पुदिना चिरून,हवी  असल्यास अगदी थोडी लसूण घालून पीठ घट्ट माळून पुऱ्या तळून घ्याव्यात . शेंगदाण्याच्या चटणी सोबत किंवा भाजी सोबत खाव्यात. नाहीतर नुसत्या चहा बरोबर सुध्दा मस्त तोंडाला चव आणतात.
ह्यात पालक प्युरी किंवा पाने कापून घाला. टोमेटो च्या रसात कणिक भिजवलीत तर टोमेटोच्या पुऱ्या होतील. चीज किंवा पनीर किसून टाका, गाजर, फ्लोवर,  मटार , बटाटा थोडा शिजवून mash करून घाला ! कितीतरी options असतात , फक्त मनात इच्छा हवी  की ब्रेकफास्ट करायचा म्हणजे करायचा!

पोहे नेहमीच केले जातात, पण  ह्याच  भिजवलेल्या पोह्यात थोडा उकडलेला बटाटा,  कांदा,मिरची कोथिंबीर, मीठ घालून छोटे वडे करून तळून घ्यावेत, sauce सोबत खावे. 

इतरांना खाऊ घालतो तर आपणही चांगला भरपेट नाश्ता करावा हेच मला सांगायचं आहे.

आणि हो, देवपूजे नंतर खायचं म्हणाल, तर कुणीतरी म्हटलेलंच आहे…आधी  पोटोबा मग विठोबा…. मग हाच आदेश शिरसावंद्य मानून चालायला काय हरकत आहे? विचार करा


Wednesday, 5 March 2014

100 TH POST!FEELS NICE!

आज १०० वा पोस्ट!!! मस्त वाटतय! आजच माझा birthday पण आहे !!
 म्हणून थोड्या वेळापूर्वी केक बनवला, आणि मस्त डिश  मध्ये घेऊन  खायला बसले! Divine ! bliss! आरामात केकचा आस्वाद  घेत ब्लॉग लिहायला घेतला .

chocolate fondue cake
CHOCOLATE FONDUE CAKE ;हा केक बनवण्यासाठी …
३/४ measuring cup मैदा,२ टेबलस्पून कोको पावडर, १/२ cup पिठी साखर , १ cup बटर/मलई/ तेल,१ टीस्पून  बेकिंग पावडर , १/२ टीस्पून सोडा  सर्व साहित्य एकत्र करून whisk करून, त्यात २ अंडी घालून फेटून बेकिंग डिश  मध्ये  ओतावे.
एकीकडे १/२ cup पाणी, १/२ cup साखर, आणि २ टेबलस्पून कोको पावडर एकत्र करून gas  गरम करावे. boil झाले, की वरील  batter वर ओतून केक microwave मध्ये १००% वर ७ मिनिटे बेक करावा. chocolate sauce घालून   गरम गरम  सर्व्ह करावा.

Tuesday, 4 March 2014

थंडीतील पौष्टिक जेवण

खारीक खोबऱ्याचे लाडू
 फ्रेंड्स, थंडी  काही कमी होत नाही, हो ना? त्यामुळे, थंडीतले म्हणून खास खारीक खोबऱ्याचे लाडू  आज केले आणि त्याची ह्या फोटो द्वारे तुम्हा सर्वांना मेजवानी!

थंडीमध्ये डिंक,,खारीक, खोबरं, बदाम, काजू ,  ड्राय फ्रुट्स, तीळ , खसखस, मेथी  दाण् याचे लाडू खास थंडीत केले जातात . पौष्टिकता,  शरीरातील स्निग्धता, आणि थंडीतील शरीराची  रोग  प्रतिकारक   शक्ती आणि उष्मांक वाढविण्यासाठी  ह्या  सर्व वस्तूंचा उपयोग  होतो.

थंडीत पंजाबी स्टाईल ने भरवाँ  भिन्डी, भरवाँ करेला,  मजा येते,  कारण बाजारात भाज्या  पण  विविध प्रकारच्या आलेल्या असतात, आणि रंगसंगती साधायला भरपूर  वाव असतो.

 भरलेली भेंडी पंजाबी स्टाईल
कोवळी अख्खी गवारीची भाजी  मराठी पध्दतीने केली, मस्त झाली होती!
अख्खी गवारीची  भाजी मराठी स्टाईल
काल सकाळी कोवळ्या  उन्हात ब्रेकफास्ट केला….
मसुराची उसळ आणि गरमागरम पुऱ्या
मसुराची उसळ आणि पुऱ्या …. गरम गरम … सोबत आंब्याचं लोणचं … वाह!

तेंव्हा थंडीला नावं  न ठेवता, छान छान पदार्थ करून खा आणि खिलवा!

Thursday, 13 February 2014

MAST SOUTH INDIAN DINNER!

Wow! आणखीन एखाद दोन posts नंतर १०० वा पोस्ट लिहायची वेळ येत आहे, ह्या  विचाराने फार छान वाटते आहे! वर्ष सव्वा वर्षात बरीच मजल मारली मी म्हणायची! असो, रुचिरेचा हा रुचकर  प्रवास असाच चालू  राहो!

सौथ इंडिअन जेवण

काल टिपिकल साऊथ इंडिअन पध्दतीने स्वयंपाक केला होता. 'मोरकोलुम्बु' म्हणजे दहीभेंडी , 'पिकलेल्या केळ्याची पचडी, मोळगापोडी आणि साधा भात! सोबत डाळ टोमेटो चं  रस्सम! वाह! मजा आली.

पिकलेल्या केळ्याची पचडी म्हणजे आपल्या केळ्याच्या गोड कोशिंबिरी सारखा प्रकार…

केळ्याची पचडी
ओलं खोबरं, हिरवी मिरची, जिरं, आणि आलं ह्याचे वाटण  ठेवावे. pan मध्ये केळ्याचे मध्यम आकाराचे  तुकडे,  मीठ,हळद, थोडं  तिखट आणि पाणी घालून केळ्याचे तुकडे शिजवावेत . ह्यावर नारळाचे वाटण (नारळाचा चव, हिरवी मिरची,  आलं आणि जिरं)    घालून परतावे. तिखट, मीठ adjust  करावे.  नंतर थोडेसे दही घालून gas बंद करावा. कोथिंबीर आणि किंचित साखर घालून सरबरीत करावे. खोबऱ्याचे तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल सुख्या मिरच्या घालून ही फोडणी पचडी वर घालून सर्व्ह करावे.

भेंडीची भाजी पण  करायची पध्दत थोडी वेगळी. म्हणजे भेंडीचे तुकडे तेलावर कुरकुरीत परतून घ्यायचे. शिजवलेली तुरीची डाळ आणि नारळ, हिरवी मिरची, आणि जिरं मिक्स करून वाटण करून   घ्यायचं.पाणी आणि हळद घालून शिजू   द्यायचं. पूर्ण शिजलं की दही घालून नंतर परतलेल्या भेंड्या घालाव्यात. खोबरेल  तेल गरम करून मोहरी, जिरं , हिंग,  मिरची, [फोडणी वरून ओतून, आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.    




ANNACHI NASADI MHNJE PAAPCH!

काल सकाळी ब्रेकफास्ट साठी पोहे केले, आणि चव घेतली मात्र….
पोहे खारट झाले होते! मग  करता? पण मग माझं  kitchen मधलं  disaster management कधी का कामाला   येणार? तर संध्याकाळी त्याच पोह्यात थोडा उकडलेला  बटाटा, मिरची  तुकडे,कोथिंबीर,  कांदा, तिखट, मीठ आणि थोडेसे बेसन  कटलेट्स बनवले, आणि बघता बघता संपले की सर्व कटलेट्स!

पोह्याचे कटलेट्स
 खर तर,पदार्थ   बिघडला की मगच खरा challenge असतो! साधा सरळ, माहित असलेल्या पध्दतीने पदार्थ सगळेच करतात, पण बिघडलेल्या पदार्थातून नवीन आणि चविष्ट पदार्थ तयार करायचा आणि तो सर्व मंडळींनी शंका न येता नवीनच पदार्थ समजून खायचा ह्यासाठी खास प्राविण्य कमवावं लागतं हे मी अनुभवावरून सांगू शकते!

मी कुठलीच वस्तू   वाया घालवीत नाही, अगदी बिघडली तरी! कारण जिन्नस, वेळ, मेहनत, कष्टाचे पैसे वाया जातातच, शिवाय, अन्नाची नासाडी म्हणजे पाप हॊय. पण साधं  अन्न देखील दुरापस्त असणाऱ्या मंडळींचा नुसता विचार  जरी मनात आला, तरी आपण किती नशीबवान आहोत ह्याची जाणीव होते आणि मग समोरचा बिघडलेला पदार्थ देखील अमुल्य वाटायला लागतो.  करून!  

Wednesday, 12 February 2014

FOOD BANAYE MOOD!!!!

"खुशियां बरसे वहाँ वहाँ
तू कदम रखे जहाँ जहाँ। …।
यह दुआ मांगी हमने
ना जाने कहाँ कहाँ "

अपनों के लिए ऐसी दुवाएं  हमेशा निकलती है। लेकिन कभी किसी राह चलते जरूरतमंद मुसाफिर के तकलीफ की घड़ी में, उसके लिए दुआ माँगके देखना, बड़ा सुकून  मिलता है! और यदी किसीको जानते हों, या पहचानते हों, और उसके लिए दुआ जो की और क़ुबूल हो गयी , तब तो दिल को  बहुत ख़ुशी मिलती है!

कभी किसी दोस्तसे मिलने जाना हों, उसे बधाई देना हों, उसकी हौसला अफजाई करनी हों, उसकी नाराजग़ी दूर करनी हों, तो मेरी मानिये, मीठे  पकवान का  कोई मुकाबला नहीं हो सकता।

कल मेरी बेटी बिमार  थी, दो दिनसे कुछ ढंगसे खाया भी नहीं था, तो   उसके मनपसंद मफिन्स बनाये, और वह प्लेट देखके उसके चेहरेपे जो मुस्कान खिली, उससे दिल खुश हो गया, और सारी  मेहनत रंग लायी। तभी सोचा क्यों ना  ये मफिन्स की रेसिपी शेयर की जाय!


मफिन्स के लिए हमें चाहिए। ....
१२५ ग्राम मैदा, १२५ ग्राम पीसी चीनी, १२५ ग्राम बटर,२ अंडे, १ १/२ टीस्पून बेकिंग पाउडर, १/२ टीस्पून बेकिंग सोडा,  वनीला एसेंस, २ टेबलस्पून दूध (जरुरत पड़नेपर डालें) 

सभी सामग्री मिलकर व्हिप करें, या अट्टा मेकर में डालकर smooth batter तैयार कर लें.। मफिन मोल्ड्स में ३/४   हिस्सा भरें , और १८० डिग्री पर २० मिनट बेक करें। तुरंत ग्रिल पर २ मिनट रखें और फिर निकालके ठन्डे करें।

आइसिंग करने के लिए १ अंडेकी सफेदी लें, उसमें करीब करीब  ४ से ५ टेबलस्पून आइसिंग शुगर डालें, और सख्त(stiff peeks ) होनेतक फेंटें।(आइसिंग शुगर की मात्रा कम ज्यादा हो सकती है)  इसे  मफिन्स पर लगाएं, गिला है तबतक चेरी, टूटी फ्रूटी, शुगर फलावर्स से सजाएं, और परोसें।


Tuesday, 28 January 2014

PHASLELE PADARTH AANI TYACHE DISASTER MANAGEMENT

पाककला हे  शास्त्र आहे असं  मानलं जातं  ते उगीच नाही. But  still,  it  is not rocket science! कला आणि शास्त्र  ह्यांच्या सुरेख संगमातून होणारा हा रसना रंजन करणारा अविष्कार म्हणावा लागेल. पण  त्यामुळेच की   काय, कधी कधी शास्त्रात चूक नसतांनाही कलेचा अविष्कार मात्र  मनासारखा होत नाही! अहो, म्हणजे सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगायचं तर आपण केलेला पदार्थ फसतो!!!!

अनेक वेळेला व्यवस्थित केलेला एखादा पदार्थ एखादवेळी मात्र सपशेल फसतो, हे कितीतरी लोकांनी अनुभवलं असणार, नाही का? मला तर असा पदार्थ फसला, की अगदी depression च येतं. म्हणजे मन एकदम उदास होऊन जातं, निराश वाटतं. मग पुन्हा हा पदार्थ नीट झाला की मगच हे नैराश्य दूर होतं. आणि हा पदार्थ परत करे पर्यंत हे माझ्या डोक्यातून जात नाही.

माझ्यासाठी baking म्हणजे theraputic आहे. If I am feeling low, I start baking a  cake, and if   it turns out well baked, I feel happy! केक  चांगला  झाला, मनासारखा झाला, तर मी तो खात  सुध्दा नाही! very funny na?  पण चांगला झालेला पदार्थ पाहूनच मला समाधान होतं.  specially विथ केक. 

एवढं सगळं सांगायचं कारण असं की,परवा   छान Peanut Butter cake बनवायला घेतला, बनवला आणि हायरे देवा! केक फुलायच्या ऐवजी बसला! आणि त्याबरोबरच माझा मूड पण बसला!म्हणजे ingredients तेच, माप तेच, microwave तोच, सगळं काही तेच, मग का बर बिघडला केक? नो idea!(get idea!) just  joking यार!

तर Peanut Butter cake साठी:

१०० grms मैदा, १५०gms पिठी साखर, ११/२ टीस्पून बेकिंग पावडर, १/२ टीस्पून सोडा, १०० gms peanut butter, १०० gms बटर, १ संत्र्याची  किसलेली साल, ५० gms melted white chocolate,
१ टीस्पून vanila essence, आणि २ अंडी नीट whisk करून १८० degrees वर ३० मिनिटे बेक करावा.

आता हा केक फसला! मग disaster management! ह्याच केकचा चुरा केला, त्यात गोल्डन सिरप,( किंवा थोडा साखरेचा पाक करून) थोडं मेल्ट केलेलं व्हाईट चोकलेट, आणि हवी असल्यास थोडी रेड वाईन  घालून,छोटे छोटे balls तयार करायचे. वरून व्हाईट चोकोलेटने आणि चेरीजने   सजवायचे.झाले …. chocolate balls ready!

chocolate balls
तर  महत्वाचे काय की , वस्तू वाया घालवायची नाही, तर तिचं स्वरूप बदलून पुन्हा खाण्या योग्य बनवायची. म्हणजे केक बनवला तो शास्त्रा प्रमाणे, पण हे chocolate balls बनवले ते कलेने! म्हणजेच शास्त्र आणि कलेचा संगम म्हणतात तो असा!

        

Saturday, 18 January 2014

SUCCESSFUL RECIPE KASHI OLKHAYCHI?

'कुणी बघणार असेल….  तर दाढी करण्यात अर्थ आहे…….
कुणी बघणारच  नसेल, तर अंघोळ देखील करणे व्यर्थ आहे !'

आलं ना हसू?  म्हणजे बघा, मनुष्य किती 'attention seeking' असतो ते. प्रत्येकाला वाटतं की   आपल्याकडे कुणी तरी बघावं, कुणीतरी आपलं  कौतुक करावं, कुणीतरी smile द्यावं , कुणीतरी जवळ बसून चार गप्पा माराव्यात……

अर्थात काहींना हे सुख मिळत नाही असं होतं, पण बहुतेकांना   ते कमीजास्त प्रमाणात मिळतंच. काय आहे न, आपण कुणाकडे सुख मागतो, किंवा कुणाकडून सुखाची अपेक्षा करतो हे महत्वाचे नसते.  आपल्याला कोण सुख देतो किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण करतो हे महत्वाचे असते.   अपेक्षा केली की अपेक्षाभंग आलाच, आणि अपेक्षाभंग झाला की दुःख आलंच! त्यामुळे अपेक्षा न ठेवता सुख मिळालं तर त्या सुखाची किंमत कळते! पण अपेक्षा नाही ठेवल्या तर मग तो   माणूस कसला?

आता आपण एखादा  पदार्थ करायला घेतो, तेंव्हा हा पदार्थ चांगलाच होईल ही अपेक्षा ठेवून केला, आणि तो पदार्थ फसला, तर आपल्याला खूपdemotivated व्हायला होतं, खर ना?  पुढचे काही तास, दिवस त्यातल्या चुका शोधण्यात आणि हळहळ व्यक्त करण्यात जातात. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख ते हेच.

तेंव्हा कोणताही पदार्थ करतांना पहिले प्रथम ती रेसिपी मनातल्या मनात करून बघायची, म्हणजे सर्व जिन्नस आपल्या मनातून घालीत जाऊन पदार्थ तयार करायचा. ह्या procedure मुळे   प्रथम पदार्थ बनवण्यात काही त्रुटी आहेत का ते लक्षात येतं. मग त्यांची नोंद करून ठेवायची.  मग ह्या त्रुटी   कमी करून पुन्हा  procedure करून बघायची मनातल्या मनात, आणि तयार पदार्थाचा अंदाज घ्यायचा, नाकानी  सुवास घ्यायचा, जिभेने चाखायचा, तो देखील मनातल्या मनात  बर का!  मग एवढे केल्यावर आपल्याला तो पदार्थ actually  करण्यास योग्य आहे किंवा नाही ते लक्षात येतं. त्यानुसार मग तयारी करून पदार्थ करावा, शक्यतोवर बिघडत नाही, किंवा फारच थोडे बिघडते! हा माझा अनुभव आहे, तुम्ही पण try करून बघा आणि तुमचा experience मला जरूर कळवा.

एक चिकनची मस्त रेसिपी…. ही मी अशीच आधी मनात करून बघितली आणि तोंडाला पाणी सुटल! म्हणजे its a  sure sign of a  successful recipe!  मग केली!

नारळाच्या दुधातली चिकन:

१ चमचा तेल आणि १ चमचा  तूप दोन्ही एकत्र    गरम करायचे. त्यात मोहरी, सुकी लाल  मिरची , आणि लांब चिरलेला कांदा १ वाटी टाकून ब्रोव्न करून घ्यावे . २ वाट्या boneless चिकन चे तुकडे टाकून परतावे. आधी १/२ वाटी नारळाचे पातळ दूध   घालून,झाकण   ठेवून ४ ते ५ मिनिटे चिकन शिजवावे. नंतर नारळाचे घट्ट दूध घालून  शिजवावे. gas  बंद करून  मीठ,तिखट किंवा हिरवी मिरची तुकडे, चिंच कोळ १टीस्पून, आणि रसम पावडर घालावी.
तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची तुकडे घालून फोडणी चिकनवर ओतून,  कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह   करावी.

    

Friday, 17 January 2014

AAJCHA SOUTH INDIAN MENU

 शायर  ने कहा…

हमें तो अपनोंने  लूटा, ग़ैरोंमें कहाँ दम था.।
हमारी कश्ती वहाँ   डूबी , जहाँ पानी कम था ।'

इसपर शायर  की बिवीने कहा.....

'तुम तो थे ही गधे, तुम्हारे भेजेमें कहाँ  दम था.।
वहाँ कश्ती लेके गए ही क्यूँ, जहाँ पानी कम था।'

 
खरं म्हणजे बायकांना जरा जास्तीचा म्हणजे सगळ्या लोकांना ६वा सेन्स असतो ना? तर त्यांना ७ वा
सेन्स असतो! असं  म्हणतात बर! पण मग ,आपला नवरा 'गधा' आहे हे त्यांना लग्न व्हायच्या आधीच  का बरं  कळत नाही? बर आणि सारखं असं  त्याला म्हणत राहायचं म्हणजे मेलेल्याला किती  मारायचं हो? असो.

काल डोसा आणि सांबार केलं आणि त्याच बरोबर इडीय्प्पम   बनवलं  होतं,  टेस्टी झाले होते! तसं  मला साऊथ इंडिअन डिशेस जरा जास्तच आवडतात. आणि ही इडीयाप्पाम ची रेसिपी देते आहे, ती जरूर try   करण्या सारखी आहे….

इडीयाप्पाम:


किंचित मीठ आणि १ चमचा  तेल किंवा तूप घालून २ वाट्या पाणी उकळावे . त्यात १ वाटी मोदकाची पिठी (किंवा साधी तांदुळाची पिठी पण चालेल ),घालून, थोडे मिक्स करावे. २ मिनिटांनी पिठी शिजली की gas बंद करावा, पिठी झाकून  ठेवावी. २ मिनिटांनी पिठी तेलाच्या हाताने नीट  मळून घ्यावी. मोदकपात्रात पाणी भरून गरम करावे. इडली stand वर, सोऱ्याला तेल लावून, पिठी भरून, जाड शेवेच्या चकतीने शेव पाडावी.  stand मोदकपात्रात ठेवून ३ ते ४ मिनिटे उकडावे. गरम गरम इडीयाप्पाम डिश मध्ये  केळीच्या पानावर घेवून, त्यावर गरम सांबार आणि चटणी सोबत द्यावे.
variation:  हे इडीयाप्पाम चण्याच्या कोरमा बरोबर पण सर्व्ह करतात.




Thursday, 16 January 2014

TEELGUL GHYAA, GOAD GOAD BOLAA!

मित्रहो,
 'तिळगुळ घ्या, गोड बोला'

मध्यंतरी बरेच दिवस काही लिहिले नाही कारण घराचे रेनोव्हेशन करत होते.  आता काम पूर्ण झाले त्यामुळे परत लिहायला सुरुवात केली आहे.  मकर संक्रांत झाली, तिळगुळ खाऊन  झाला आणि बऱ्याच  मंडळींचे  गुळाच्या पोळ्या पण खाऊन पोट भरले   असेलच. गुळाची पोळी फक्त थंडीतच खाता येते कारण ती उष्ण असते, आणि इतर वेळी खाल्लेली पचणार नाही, तोंड येईल, उष्णता वाढेल असे त्रास होण्याची शक्यता असते.

त्यामुळे मी जे नेहमी माझ्या  ब्लॉगमधून सांगत असते ते असे की भारतीय संस्कृती मध्ये सण,उत्सव आणि त्यावेळचा आहार ह्याचे नाते असते. ह्या उत्सवाचा आपल्या  भावनिक, शारीरिक,  सामाजिक, आणि इतर काही अध्यात्मिक, किंवा वैज्ञानिक   घडामोडींशी संबंध  असतो, आणि तो संबंध आपल्या त्या ऋतूतल्या आहारातून व्यक्त होतो.

संक्रांति च्या सुमारास पतंग उडविण्याचे कारण पण तसेच आहे. ह्यावेळी हवा छान असते, दुपारचे ऊन   आल्हाददायक असते, म्हणून मग सगळ्यांनी पतंग उडवायचे, त्यासाठी गच्चीत किंवा मोकळ्या पटांगणात जायचे, वातावरणाचा  मनसोक्त आनंद घ्यायचा, मजा करायची!

उंधियो, मिक्स भाज्यांचे पदार्थ, गरम गरम हलवा, खीर, गुलाबजाम अशा गोड पदार्थांचा भरपूर साजूक तूप घालून   आस्वाद घ्यायचा, आणि मग भरपूर exercise पण करायचा आणि तब्येत उत्तम ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे!

संक्रांतीच्या आदल्या दिवशी 'भोगी' , भोगी च्या दिवशी घरातील अडगळीच्या, नको असलेल्या वस्तू फेकून देवून नवीन   खरेदी करावी.म्हणजे जुने  हेवेदावे, भांडणे,रुसवेफुगवे सोडून नव्याने प्रेम वाटावे हा संदेश! ह्या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत किंवा भाजी, आणि साधी तांदूळ_मुगडाळीची खिचडी करतात.

मकर संक्रांतीला तीळगुळाच्या वड्या, लाडू करतात.
ते तिळगुळ एकमेकांना देऊन "तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणण्याची प्रथा आहे. गुळाच्या पोळ्या भरपूर तूप घालून खाव्यात.
भरपूर रानमेवा म्हणजे बोरं, ऊस, मटार, हरबरा, गाजर, इत्यादी खावे. शिवाय सुकामेवा,  चिक्की,गजक सारखे पदार्थ पण भरपूर खावेत.

आणि संक्रांत म्हटली की काटेरी हलवा आलाच! तीळ  फोडून हलवा केला जातो. नंतर त्या हलव्याचे दागिने केले जातात आणि लहान मुलांचे बोरनहाण केले जाते!


म्हणजे छोट्या मुलांना काळ्या रंगाचे पण सुंदर सुंदर   कपडे आणि हलव्याचे दागिने, मुकुट वगैरे घातला जातो,  आणि त्याच्या डोक्यावर रानमेव्याचा पाऊस पाडतात! आणि त्याच्या ह्या बोरनहाणसाठी आलेल्या बालमित्रांना तो सर्व मेवा लुटू द्यायचा! काय मज्जा! पोरं खुश होतात अगदी!

नववधुंसाठी देखील ह्या सणाचे महत्व आहे बर का!


पहिल्या संक्रांतीला  सुनेला हलव्याच्या दागिन्यांनी सजवतात, तिचे लाड पुरवतात! शिवाय त्यांना काही भेटवस्तू  पण देतात.

 संक्रांतीचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे 'संक्रांतीचे वाण' लुटणे! महिला वर्गाचा हा आवडता भाग! सवाष्णींना  हळदी  कुंकू, तिळगुळ, काटेरी हलवा आणि वस्तू 'वाण' म्हणून  लुटायची! पुढे वर्षभर येणाऱ्या  सुबत्ते साठी हे 'वाण' द्यायचे. ह्यात महिला चमचे, बाउल, रुमाल ह्या सारख्या छोट्या वस्तू, किंवा धान्याची पाकिटे, सुबक कुंकवाचे करंडे, किंवा अनेक विध वस्तू लुटतांना दिसतात. कल्पकतेने वाण देणे ही सुध्दा एक कला आहे.

पौष शुध्द चतुर्दशी म्हणजे मकर संक्रांत आणि संक्रांतीचा हा सण  माघ शुध्द सप्तमी पर्यंत चालतो. म्हणजे बोरनहाण, हळदीकुंकू,  वगैरे सर्व उत्सव ह्या २१ दिवसात केंव्हाही करता येतात.

संक्रांत स्पेशल गुळाची पोळी ……

२ वाट्या बेसन कोरडे भाजून ठेवावे. १ वाटी गुल पाघळून घ्यावा. २ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून खसखस कोरडी भाजून घ्यावी, आणि भरड कुटावे. सर्व वस्तू एकत्र कराव्यात, त्यात वेलची पूड घालून सारण तयार   करावे. गव्हाची कणिक तेल आणि किंचित मीठ घालून घट्ट  मळून घ्यावी.

कणकेची छोटी गोळी घेऊन, उंडा  करावा, सारण भरावे, आणि हलक्या हाताने पोळी लाटावी. तव्यावर भाजून घ्यावी . थंड झाली की पोळी कडक होते, ती  थंडच खायची असते. पण खातांना भरपूर   तूप घालून खावी.