Wednesday, 17 July 2013

JEVAN BANVNYACHE SHASTR

अन्न तयार  म्हणजे स्वतःला तयार करणे, असे मी म्हटले  होते. ते कसं? जेंव्हा आपण स्वयंपाकघरात अन्न शिजवतो, तेंव्हा आपल्याला अनेक क्रियांमधून जावं  लागतं, हे तर आपण जाणतोच. सुरुवात होते ती स्वयंपाकघरातील स्वच्छते पासून . त्यानंतर आवश्यकते प्रमाणे जेवणाचे नियोजन करणे, त्यासाठी सामग्री एकत्रित करणे,विविध उपकरणे सज्ज करणे,त्यानंतर अंदाजा प्रमाणे अन्न्पदार्थाची जुळवाजुळव करणे, भाज्या,डाळी, मसाले,सर्व तयार ठेवणे. ह्यानंतर प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरुवात करणे!हा  हा स्वयंपाक दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याकडे कटाक्ष असायला हवा. अन्न योग्य आणि चांगल्या पद्धतीने शिजवलेलं  हवंच! 

तयार जेवण वाढण्यासाठी,बैठकीची  व्यवस्था योग्य असावी, ह्यासाठी येणारे पाहुणे,त्यांचा दर्जा,त्यांची आवड,त्यांच्या काही विशेष आवडी, ह्या सर्वांचा विचार केलेला हवा. जेवणासाठी वापरात येणारी भांडी, ही कोणती असावीत, त्यांचा दर्जा ह्याचा देखील विचार व्हावा लागतो. पंगत सुशोभित करणे पण तितकेच महत्वाचे असते. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे हसून स्वागत करून ,किंवा घरच्या लोकांना गोडीने बोलावून, जेवणास बसवावे आणि सुरु करण्यास सांगावे. अन्यथा, कधी कधी  पाहुणे रेंगाळलेले आढळून येते. आणि आता खरी परीक्षेची वेळ! म्हणजे पानात गरम,सकस,रुचकर,आणि ताज अन्न पाडाव!  प्रत्येकाने म्हटले पाहिजे 'अन्नदाता सुखी भवं'. 

आता हे सगळ करीत असताना  बघा, आपल्या लक्षात येईल कि आपण किती एकाग्रतेने,कल्पकतेची जोड देऊन, हे सर्व कार्य करीत होतो! ही एक प्रकारची साधनच नाही का?सगळ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेवून, पथ्यपाणी, अन्य विशिष्ट गरजा लक्षात ठेवून, स्वयंपाक करणे म्हणजे एक प्रकारची उपासनाच कि नाही? ह्या उपासनेतून आनंद तर मिळतोच,शिवाय समाधान लाभते! आणि हे सर्व करीत असताना जर मुखी नामस्मरण ठेवले, तर परमेश्वराची वेगळी उपासना करावीच लागत नाही!

आता असाच एक सात्विक मेनू…… 

मक्याच्या दाण्याची कढी:   १ वाटी मका दाणे  शिजवून,मिक्सर मधून वाटून,गाळून घ्यावे. ह्या पेस्ट मध्ये १/ ४ वाटी घोटलेले दही मिक्स करावे.तेल गरम करून मोहरी, जिर हिंग,लसूण, करीपत्ता, हिरवी मिरची तुकडे,लाल सुकी मिरची तुकडे,घालून नंतर मका पेस्ट घालावी. गरम झाले कि, मीठ,मिरेपूड,कोथिंबीर घालून  गरम गरम वाढावे.  ही कढी उकळू  नये.

सोबत भरलेल्या भेंडीची भाजी, आणि सोया परोठा द्यावा. 

सोया परोठा:१ बटाटा उकडून लगदा करावा. १ वाटी सोया granules  शिजवून घ्यावेत. तेल गरम करून कांदा,हिरवी मिरची,हिंग,घालून परतावे. नंतर बटाटा आणि सोया घालून परतावे. मीठ,गरम मसाला कोथिंबीर घालून मिक्स करून थंड करावे.पोळीच्या कोल्या मध्ये स्टफ करून परोठ करून भाजावा. तेल किंवा तूप हवे असल्यास घालावे. गरम परोठे लोण्या सोबत द्यावेत.   

   

No comments:

Post a Comment