Tuesday, 16 July 2013

NAVIN SHATAKAATLYAA AANKHEEN KAHEE AATHVANEE

happy golden anniversary!
बघता बघता नवीन शतकाची काही वर्ष संपली सुद्धा!   ह्या सरत्या दशकातला हा कार्यक्रम! आई बाबांचा लग्नाचा ५० वा वाढदिवस! ८ सप्टेंबर२००९ ला हा कार्यक्रम झाला…….
 

 अनेक सिनियर मन्डळी जमली होती, त्यामुळे छान झाला कार्यक्रम. अभिष्टचिंतनाचा नुसता वर्षाव!

आजी आजोबांचे अभिनंदन करताना निशांत आणि अनिकेत
मुल, नातवंड, नातेवाईक, सगळ्यांनी मिळून काही आठवणीना उजाळा दिला, काही मजेदार किस्से सांगितले, एकूण काय, तर धमाल केली!

 ५० ज्योतींनी ओवाळणी,वा!














५० ज्योतीं नी सवाष्णींनी ओवाळले, मोठ्यांनी आशीर्वाद दिले, लहानांनी आशीर्वाद घेतले!
असा साकारला आठवणीनचा कोलाज!

ह्या नंतर…….   _  आधी केक कापला ,नंतर फोटो ,आणि मग? मेजवानी! आणि  फोटो! ऑफ कोर्स!
























 ह्या कार्यक्रमा नंतर २७ जून २०१२ ला बाबांना ८१ वर्ष पूर्ण झाली म्हणून एक सहस्र्चन्द्रदर्शन सोहळा   करण्यात आला! हा पण  कार्यक्रम  बहारदार  झाला हे वेगळे सांगायला नको!  आधी सत्यविनायक पूजा झाली.


त्यानंतर होम हवन झाले.












नंतर थोडे देवदर्शन, आणि नंतर भटकंती!

 २१ ऑक्टोबर २०१०ला नवरात्रीत अष्टमी पूजा झाली. 

हा एक अनोखा कार्यक्रम होता. अतिशय सुंदर आणि सुबक असा  देवीचा मुखवटा बनवला जातो,
तिला साडी,चोळी,दाग दागिन्यांनी नटवले जाते, नैवेद्य दाखवला जातो.
 
आणि विशेष म्हणजे घागरी मध्ये धूप घेवून, घागरी फुंकल्या जातात. आई आणि बाबांनी घागर फुंकली, फार तेजस्वी वाटत होत ते दृश्य!

ह्या ही कार्यक्रमाला सर्वांची दमदार हजेरी होतीच!

३ फेब्रुवारी २० १३…। मी, भानुप्रिया, आई आणि बाबांचा जोधपूरला प्रमोदिनी कडे जाण्याचा एक मस्त योग जुळून आला! मुंबईहून जोधपूरची   flight  पकडायच्या आधी, आम्ही गिरगावात जिथे ब्रेकफास्ट करीत होतो, तिथून जवळच  बाबा लहान असताना रहात असलेली 'तारा बाग' ही बिल्डींग  होती. मग काय? आम्ही तिकडे जायचं ठरवलं. तिथे गेलो, ते आणि आमचे आजी आजोबा ज्या खोलीत रहात होते, ती खोली बघितली.
सर्व चाळ  जशीच्या तशीच आहे अजून!फक्त रंगरंगोटी नवीन आहे. आणि बाबांना तर  फारच  आनंद   झाला असणार हे नक्की, कारण ती   खोली सोडली, तेंव्हा ते फक्त आठ वर्षांचे होते पण त्यांना सर्व आठवत होते! मग आम्ही त्या खोलीत राहणाऱ्या  लोकांशी थोड बोललो, त्यांना हे सगळ सांगितलं , तर त्या बाई   पण खूष झाल्या, आणि जवळ जवळ ८० वर्षांनंतर कुणी व्यक्ती त्याचं जुन  घर पहायला येते,ह्याचं  त्यांना फार आश्चर्य वाटलं! फोटो  काढले, कारण हे म्हणजे सुवर्ण संधी होती, कारण  बाबां बरोबर त्यांची बायको , मुलगी आणि नात पण त्याचं लहानपणच घर बघायला एकत्र जमले होते!

असे हे आठवणींचे मणी  आपल्या आयुष्याच्या  माळेत गुंफतच राहणार!  पण आपल्यातून निघून गेलेल्या   सर्व आप्तेष्टांना,त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून,पुढच्या पर्वास सुरुवात करणार आहे.

 ह्यातील प्रत्येक व्यक्ती प्रिय होती,आणि प्रत्येकाने केलेल्या योगदानाने आपले जीवन समृद्ध झाले आहे, ह्याची प्रचीती त्या त्या वेळीच होते. कधी न कधी, कुठे न कुठे, कोणत्या तरी गोष्टी साठी कुणीतरी आठवतच!

तेंव्हा आपला हा आठवणींचा खजिना समृद्ध करायचा असेल तर, एकच करायचं, आपल्या सान्निध्यात येणार्या प्रत्येक व्यक्ती कडून चांगले घेत जावे!
सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःखम आप्नुयात
          

No comments:

Post a Comment