आपण अनेक सभा समारंभात जातो, तिथल्या कार्यक्रमात सहभागी होतो , संगीत, नाट्य, परिसंवाद, भाषणे, विविध कला दर्शन, इत्यादींचा मनमुराद आनंद घेतो, कधी लग्न, मुंज, वाढदिवस इत्यादी घरगुती किंवा सामाजिक कार्यात शुभेच्छा देण्यासाठी जातो, तिथे भोजनाची व्यवस्था असते,आपण यथेच्छ जेवतो , आणि तिथून निघतो.
अशा वेळी बरेचसे अन्न वाया गेल्याचे विदारक दृश्य आपल्याला दिसते. समर्थांनी म्हटलेले आहेच….
'आपण यथेष्ट जेवणे। उरले ते अन्न वाटणे।
परंतु वाया दवडणे। हा धर्म नव्हे । ।'
असो, आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीचा परिणाम आपल्या आहारावर . अनेक आपल्या मूड प्रमाणे वागत असतो. म्हणजे कधी रागात असलो, रागावतो, कधी आनंदात असलो,तर सगळ्यांशी जरा जास्तच गोडीनं आणि आनंदात बोलतो. कधी संकटात असू, किंवा प्रॉब्लेम असेल, तर ते टेन्शन आपल्या चेहऱ्यावर लगेच दिसून येते, आणि मग समोरच्याशी धडपणाने आपण बोलत नाही, किंवा कधी कधी वडाचं तेल वांग्यावर निघतं! मूडचा परिणाम आपल्या तर होतोच,पण आपल्या आहारावर पण होतो.
आपण चार लोकात असलो,आणि मंडळी आपल्या आवडीची असली,मित्र परिवार असेल, नातलग असतील आणि त्यांची कंपनी आपल्याला आवडत असेल,तर अशा ठिकाणी प्रसन्न मनःस्थितीत आपल्याला चार घास जास्तच जातात, हो ना? हेच जर आपण एकटच बसून खायची वेळ आली, तर पाहिलं तर मूडच रहात नाही, आणि मग कमीच खाल्लं जातं. शिवाय मूड पण चांगला रहात नाही. म्हणजेच मूडचा परिणाम शारीरिक,मानसिक,भावनिक अशा सर्व पातळींवर होतो. तेंव्हा जास्त मूडी बनू नये, ह्यातच आपलं हीत आहे हे लक्षात घ्यायला हवं.
ज्यांना नेहमीच एकट खावं लागतं ना,त्यांना तर असं मूडी बनून चालणारच नाही, कारण ते अतिशय घातक आहे. असे लोक जर मूडी असतील, तर त्यांनी स्वतःची मानसिकता त्वरित बदलायचा प्रयत्न करायला हवा. मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते कि, अशा व्यक्तीने जे काही अन्न त्याच्याकडे असेल,ते अन्न ताटात नीट वाढून घ्यावे, एकदा अन्नाला नमस्कार करावा, आणि लक्ष जेवणात ठेवून, एकाग्र चित्ताने जेवावे. आणि आपल्या समोर आपली आवडती व्यक्तीच बसली आहे अशी कल्पना केली तर जेवण केंव्हाच होतं! जेवण तर पोटभर होतंच , मन देखील तृप्त होतं! अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे महत्व कशाला द्यायचं? जेवण जेवण्याला, की कुणा बरोबर जेवतोय ह्याला, की जेवणात काय काय पदार्थ आहेत ह्याला, हे एकदा ठरवलं, की पुढच काम सोप होतं. अर्थात, आपल्या जेवणालाच महत्व द्यायला शिकलं पाहिजे.
काल सांज्याची पोळी केली होती, मस्त झाली होती! कित्ती तरी पोळ्या करून खाल्ल्या कालपासून, अगदी तूप लावून खरपूस भाजून, पण मन काही भरत नाहीये अजून! पेट भर गया, पर मन नहीं भरा! माझी तर बहुतेक वेळा अशीच अवस्था असते!(खरच आहे,खोटं नाही सांगत!)
अशा वेळी बरेचसे अन्न वाया गेल्याचे विदारक दृश्य आपल्याला दिसते. समर्थांनी म्हटलेले आहेच….
'आपण यथेष्ट जेवणे। उरले ते अन्न वाटणे।
परंतु वाया दवडणे। हा धर्म नव्हे । ।'
असो, आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीचा परिणाम आपल्या आहारावर . अनेक आपल्या मूड प्रमाणे वागत असतो. म्हणजे कधी रागात असलो, रागावतो, कधी आनंदात असलो,तर सगळ्यांशी जरा जास्तच गोडीनं आणि आनंदात बोलतो. कधी संकटात असू, किंवा प्रॉब्लेम असेल, तर ते टेन्शन आपल्या चेहऱ्यावर लगेच दिसून येते, आणि मग समोरच्याशी धडपणाने आपण बोलत नाही, किंवा कधी कधी वडाचं तेल वांग्यावर निघतं! मूडचा परिणाम आपल्या तर होतोच,पण आपल्या आहारावर पण होतो.
आपण चार लोकात असलो,आणि मंडळी आपल्या आवडीची असली,मित्र परिवार असेल, नातलग असतील आणि त्यांची कंपनी आपल्याला आवडत असेल,तर अशा ठिकाणी प्रसन्न मनःस्थितीत आपल्याला चार घास जास्तच जातात, हो ना? हेच जर आपण एकटच बसून खायची वेळ आली, तर पाहिलं तर मूडच रहात नाही, आणि मग कमीच खाल्लं जातं. शिवाय मूड पण चांगला रहात नाही. म्हणजेच मूडचा परिणाम शारीरिक,मानसिक,भावनिक अशा सर्व पातळींवर होतो. तेंव्हा जास्त मूडी बनू नये, ह्यातच आपलं हीत आहे हे लक्षात घ्यायला हवं.
ज्यांना नेहमीच एकट खावं लागतं ना,त्यांना तर असं मूडी बनून चालणारच नाही, कारण ते अतिशय घातक आहे. असे लोक जर मूडी असतील, तर त्यांनी स्वतःची मानसिकता त्वरित बदलायचा प्रयत्न करायला हवा. मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते कि, अशा व्यक्तीने जे काही अन्न त्याच्याकडे असेल,ते अन्न ताटात नीट वाढून घ्यावे, एकदा अन्नाला नमस्कार करावा, आणि लक्ष जेवणात ठेवून, एकाग्र चित्ताने जेवावे. आणि आपल्या समोर आपली आवडती व्यक्तीच बसली आहे अशी कल्पना केली तर जेवण केंव्हाच होतं! जेवण तर पोटभर होतंच , मन देखील तृप्त होतं! अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे महत्व कशाला द्यायचं? जेवण जेवण्याला, की कुणा बरोबर जेवतोय ह्याला, की जेवणात काय काय पदार्थ आहेत ह्याला, हे एकदा ठरवलं, की पुढच काम सोप होतं. अर्थात, आपल्या जेवणालाच महत्व द्यायला शिकलं पाहिजे.
| सांज्याची पोळी आणि वर साजूक तूप! वाह!वाह! |
काल सांज्याची पोळी केली होती, मस्त झाली होती! कित्ती तरी पोळ्या करून खाल्ल्या कालपासून, अगदी तूप लावून खरपूस भाजून, पण मन काही भरत नाहीये अजून! पेट भर गया, पर मन नहीं भरा! माझी तर बहुतेक वेळा अशीच अवस्था असते!(खरच आहे,खोटं नाही सांगत!)
No comments:
Post a Comment